साडेतेरा लाखांची लूट

By Admin | Updated: August 6, 2015 01:04 IST2015-08-06T01:01:13+5:302015-08-06T01:04:53+5:30

कन्नड : महाराष्ट्र बँकेच्या कन्नड तालुक्यातील कालिमठ (उपळा) येथील शाखेत मंगळवारी रात्री चोरट्यांनी धाडसी चोरी केली. खिडकीचे गज कापून

Loot of six and a half lakhs | साडेतेरा लाखांची लूट

साडेतेरा लाखांची लूट


कन्नड : महाराष्ट्र बँकेच्या कन्नड तालुक्यातील कालिमठ (उपळा) येथील शाखेत मंगळवारी रात्री चोरट्यांनी धाडसी चोरी केली. खिडकीचे गज कापून आत शिरलेल्या चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने बँकेची तिजोरी फोडली. त्यात असलेले तब्बल १३ लाख ६९ हजार २६२ रुपयांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले. बुधवारी सकाळी हा प्रकार उजेडात येताच एकच खळबळ उडाली.
घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, महाराष्ट्र बँकेची ही शाखा उपळा गावाच्या अगदी बाहेर आहे. बँकेच्या पुढे एकही घर, वस्ती नाही. नित्याप्रमाणे मंगळवारी सायंकाळपर्यंत बँकेत कामकाज सुरू होते. सायंकाळी बँक बंद करून कर्मचारी घरी निघून गेले. त्यावेळी बँकेच्या तिजोरीत साडेतेरा लाखाच्या वर रोख रक्कम ठेवण्यात आलेली होती. दरम्यान, बुधवारी
चोरट्यांनी बँक इमारतीच्या जवळून जाणाऱ्या पितळखोरा रस्त्याकडील खिडकीची तकलादू लोखंडी जाळी कापून आत प्रवेश केल्याचे दिसते. या चोरट्यांनी सोबत गॅस कटरही आणलेले होते.
४या कटरच्या साहाय्याने त्यांनी तिजोरी कापली व तिजोरीतील १३ लाख ६९ हजार २६२ रुपये रोख रक्कम घेऊन धूम ठोकल्याचे स्पष्ट झाले. या चोरी प्रकरणी शाखा प्रबंधक धनंजय पाटणकर यांनी कन्नड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
या बँक प्रशासनाने सुरक्षाबाबत अक्षरश: हलगर्जीपणाचा कळसच केलेला दिसतो. एक तर ही बँक गावाच्या अगदी बाहेर आहे. बँकेला ना वॉचमन ठेवण्यात आलेला आहे, ना सीसीटीव्ही कॅमेरे तेथे बसविण्यात आलेले आहेत. बँकेच्या खिडकीचे गजही अत्यंत तकलादू होते. विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वीच पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या हद्दीतील बँकेच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवून सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावा, सुरक्षारक्षक तैनात करा, अशा सूचना केलेल्या होत्या. त्याकडेही बँकेने दुर्लक्ष केले.

Web Title: Loot of six and a half lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.