शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

साताऱ्यातील पोस्टात आधार कार्ड नोंदणीसाठी तारीख पे तारीख 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 15:46 IST

कनेक्टिव्हिटी आणि तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे केले जातेय

- साहेबराव हिवराळे 

औरंगाबाद : आधार कार्ड लिंक करा, त्यातील तांत्रिक दुरुस्ती किंवा नवीन कार्ड काढण्यासाठीचे अनधिकृत आधार कार्ड नोंदणी सेंटर शासनाने बंद केले आहेत. त्यामुळे नागरिकांची लूट थांबली, असे असले तरी टपाल कार्यालयात आधार कार्डवरील दुरुस्ती वा नवीन नोंदणीसाठी तीन महिने वेटिंग आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

सातारा, देवळाई या दोन्ही वॉर्डांत ७५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असून, नागरिकांना सेवासुविधा संघर्षाशिवाय मिळत नाहीत. शाळा, कॉलेज प्रवेश, शासकीय योजना, बँक खाते उघडणे इत्यादी महत्त्वाच्या सेवासुविधांसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. घाईगडबडीत काढलेल्या आधार कार्डवर चुका राहत असल्याने आॅनलाईन अर्ज भरताना आधार लिंक होत नाही. त्यामुळे अनेकांना योग्य स्पेलिंग जुळविण्यासाठी आधार केंद्रावर जावे लागते; परंतु त्याठिकाणीही आज सर्व्हर डाऊन आहे, तुम्ही उद्या या, अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेली जात आहे. 

शाळा, महाविद्यालयांना सुटीमुळे गर्दीशाळा, महाविद्यालयांना सुट्या असल्याने विद्यार्थी व पालक आधार कार्डमधील चुकांची दुरुस्ती किंवा नवीन कार्ड बनविण्यासाठी सातारा टपाल कार्यालयात जातात; परंतु त्यांना काही तरी कारण सांगून तीन महिन्यांपुढची तारीख देऊन परत पाठविले जात आहे. तीन महिन्यांपर्यंतची प्रतीक्षा या केंद्रावर असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.  इतरत्र आधार केंद्रे बंद झाल्याने शासकीय यंत्रणा असलेल्या ठिकाणी नागरिकांना खात्रीलायकपणे नोंदणी व दुरूस्ती करता यावी म्हणून हा उपक्रम राबविला आहे;परंतु येथे सोयी पेक्षा गेैरसोयीचे ठरत आहे. याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

वरिष्ठ अधिकारी लक्ष घालणारआधार सेंटरविषयी येथील अधिकाऱ्यांची कार्यालयीन चौकशीदेखील करण्यात आलेली आहे. सातारा टपाल कार्यालयातील तांत्रिक बाबी तपासणीसाठी मुख्यालयातून अधिकारी पाठविला जाणार आहे. या ठिकाणी गतिमान नवीन यंत्रणा बसविण्याचेही प्रयोजन आहे. या ठिकाणी भेट देऊन खरी परिस्थिती तपासणार आहोत, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAurangabadऔरंगाबादAdhar Cardआधार कार्डPost Officeपोस्ट ऑफिस