शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती करणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 15:46 IST

Manoj Jarange Patil : काल प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.

Manoj Jarange Patil  ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांची सर्व पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज महाविकास आघाडीला धक्का दिला. स्वबळावर लढण्याची घोषणा करत पहिली यादी जाहीर केली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाचे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत लोकसभेबाबत चर्चा झाल्याचे आंबेडकर यांनी सांगितलं. याबाबत आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Prakash Ambedkar मोठी बातमी: प्रकाश आंबेडकरांचा मविआला धक्का; पहिली उमेदवार यादी जाहीर

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत काल काय चर्चा झाली, यावर आज मनोज जरांगे पाटील माहिती दिली. "प्रकाश आंबेडकर यांनी काय भूमिका मांडली हे मी पाहिलेलं नाही. आमची भूमिका ३० तारखेला जाहीर होणार आहे. आमच्या बैठकीत निवडणूक लढवायचे हे पक्क आहे, आता आम्ही गावागावातील मराठा लोकांचे मत मागवले आहे. यावर आता आमचं पुढचं ठरणार आहे. आमच्या कालच्या भेटीत राजकीयही चर्चा झाली. ३० तारखेपर्यंत आमचे कोणतेही मत नाही. ३० तारखेला जो निरोप तेव्हा आम्ही जाहीर करणार, आता आम्ही पाठिंबा आणि उमेदवारीचीही घोषणा केलेली नाही, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

"आमच्यात काल समोरासमोर चर्चा झाली आहे. अजूनही आम्ही पाठिंबा दिलेला नाही. आमच्या समाजासोबत चर्चा करुन निर्णय घेणार आहे. राजकारणात बहुमताला किंमत आहे, जर मराठा समाजाचा होकार आला तर राजकारणात मोठ्या घडामोडी घडतील, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

३० तारखेला जाहीर करणार

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आम्ही सर्व जाती एकत्र आलो तर मोठी उलथापालथ होईल. मराठा समाजाची मत ग्राह्य धरली जात होती, हे आमचेच आहेत असं म्हणत होते. पण यांना निवडून देऊनही आरक्षण देत नाहीत. आता बैठका, रॅली काढली तरीही गुन्हे दाखल करत आहेत. गृहमंत्र्यांनी आता असं काही करु नये. या दहा वर्षात मराठा समाजात भाजपकडे सरकला आहे, मोठं मोठे नेते भाजपकडे आहेत. आम्ही कुणालाच मदत करणार नाही, आपण आपले बघू, असंही जरांगे पाटील म्हणाले. 

"मी एकदा शब्द दिला की दिला, पण ३० तारखेपर्यंत मराठ्यांची भूमिका स्पष्ट भूमिका झाल्याशिवाय ना कोणता उमेदवार आम्ही निवडला आहे. ना कोणाला पाठिंबा दिला ३० तारखेनंतर सगळं क्लिअर होईल. आम्हीही ठरवलं आहे, म्हणूनच मी देवेंद्र फडणवीस आणि  मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितलं होतं मला राजकारणात हलक्यात घेऊ नका, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलBJPभाजपाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMaratha Reservationमराठा आरक्षण