शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

Lok Sabha Election 2019 : तरुणांना हवे शिक्षण, रोजगार आणि तंत्रज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 8:35 PM

‘लोकमत’ने जाणून घेतल्या नवमतदारांच्या अपेक्षा

औरंगाबाद : औरंगाबाद मतदारसंघाचा विचार केल्यास यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुण उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे ‘लोकमत’ने नवमतदारांशी संवाद साधला आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींबद्दल असणाऱ्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यातून रोजगार, महिलांची सुरक्षा, शिक्षण आणि तंत्रज्ञान, असे प्रश्न प्रामुख्याने समोर आले. 

महिलांची सुरक्षा महत्त्वाची आज औरंगाबाद शहरात महिला सुरक्षित आहेत; पण या सुरक्षिततेत अजून वाढ होण्याची गरज आहे. बलात्कार, छेडछाडीच्या घटना शहरात वाढत असून, यावर नियंत्रण हवे. त्याचप्रमाणे महिलांसाठी स्वच्छतागृह आणि महिला कक्षाची निर्मिती व्हायला हवी. -श्रेया रतन 

नागरी सुविधांची गरजरस्ते, पाणी व वीज, असे शहरातील प्रश्न ऐरणीवर आले असून, या प्रश्नांवर तोडगा काढण्याची गरज आहे. सर्वप्रथम नागरी सुविधा सोडवाव्यात आणि त्यानंतर औरंगाबाद शहर स्मार्ट सिटी कसे होईल यादृष्टीने लोकप्रतिनिधींनी विचार करावा.-प्रथमेश दीक्षित  

बेरोजगारी कमी करणारा नेता हवातरुणांना रोजगार मिळावा म्हणून अनेक सरकारी योजना आहेत; पण या योजनांचा लाभ सर्वसामान्य तरुणांना मिळताना दिसत नाही, अशा योजना तरुणांपर्यंत पोहोचवून आणि नवीन रोजगारनिर्मिती करून बेरोजगारी कमी करणारा लोकप्रतिनिधी असावा.     -सोमीनाथ दगडघाटे 

तंत्रज्ञानाची कास धरावीलोकसभा निवडणूक म्हणजे देशाच्या दृष्टीने विचार केल्यास तंत्रज्ञानाची कास धरणारा लोकप्रतिनिधी असण्याची गरज आहे. वैज्ञानिक प्रगती आणि तंत्रज्ञानात झालेले बदल, सोशल मीडियाची गरज लक्षात घेऊन त्यादृष्टीने पावले उचलणारा नेता हवा.     -अजिंक्य दहीवड  

शिक्षण क्षेत्रात बदल अपेक्षितलोकसभा निवडणुकीत निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे फक्त शहरी भागाचा विचार न करता ग्रामीण भागाच्या विकासावरही लक्ष देणे गरजेचे आहे.  -उमेश ठोंबरे

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादStudentविद्यार्थी