शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

लाट नसल्याने शिवसेनेसमोर मोठे आव्हान; मतांच्या ध्रुवीकरणावरच विजयाचे गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 2:28 PM

उमेदवारांमध्ये एक खासदार; बाकी आमदार  

- नजीर शेख

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे आ. सुभाष झांबड, एमआयएमचे आ. इम्तियाज जलील, शिवसेनेचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार आ. हर्षवर्धन जाधव यांच्यात चौरंगी लढत होत आहे.  २०१४ सारखी लाट नसल्याने यंदा शिवसेनेसमोर मोठे आव्हान आहे. 

चारवेळा विजयी झालेले खासदार खैरे हे शिवसेनेचे प्रबळ दावेदार आहेत. मात्र, यंदा त्यांच्याविरुद्ध वातावरण असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांना काँग्रेसचे आ. झांबड यांनी आव्हान दिले आहे. मात्र, एमआयएमचे आ. जलील यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेससमोर अडचणी आहेत. दुसऱ्या बाजूला  आ. जाधव यांनी खैरेंविरुद्ध आघाडी उघडत दंड थोपटल्याने  निवडणुकीत रंगत आली आहे. 

मतदारसंघात एक गोष्ट दिसत आहे. आ. झांबड म्हणतात, माझी लढत खा. खैरे यांच्याशी आहे. आ. जलील म्हणतात, आम्ही शिवसेनेविरुद्ध लढा देत आहोत, तर आ. जाधव म्हणतात माझा मुकाबला केवळ खैरे यांच्याशी आहे. मात्र, शिवसेनेकडून आमची लढत एमआयएमशी असल्याचे मुद्दामहून सांगितले जात आहे. 

खैरे यांना आ. जाधव यांचा धोका आहे, तर आ. झांबड यांना आ. जलील यांची भीती आहे. आ. जाधव यांची भिस्त ही मुख्यत: ग्रामीण मराठा मतदारांवर आहे. आ. जलील यांना वंचित आघाडीमुळे दलित समाजाची ६० ते ७० टक्के मते मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे मुस्लिम समाजात त्यांच्याविषयीची नाराजी प्रकर्षाने पुढे येत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीप्रमाणे मुस्लिम समाजाची एमआयएमला भरभरून मते मिळणार नाहीत, असे सध्याचे चित्र आहे. शहरातील कचरा, पाणी समस्या आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची केंद्र आणि राज्य सरकारविरुद्धची  नाराजी याचा फायदा काँग्रेसचे उमेदवार आ. झांबड यांना होऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते  प्रचारात उतरल्याने काँग्रेसचे झांबड यांची बाजू भक्कम झाली आहे. मतांची विभागणी आणि जातीय  ध्रुविकरण कसे होते, यावर या चौरंगी लढतीचे भवितव्य अवलंबून आहे.

शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांच्या युतीचा हा किल्ला अभेद्य आहे. आतापर्यंत अनेकांनी हा किल्ला भेदण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. आगामी काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तसेच पाणी आणि रस्ते यावर आपला भर असेल. - चंद्रकांत खैरे, उमेदवार शिवसेना 

गेल्या वीस वर्षांत जिल्ह्यात विकासकामे झालीच नाहीत. कचरा आणि पाणीटंचाईने औरंगाबादकर वैतागले आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच नाही. त्यामुळे ग्रामीण भागातही युतीच्या विरोधात वातावरण आहे. आता बदल होणारच. - आ. सुभाष झांबड, उमेदवार, काँग्रेस

कळीचे मुद्दे- औरंगाबाद शहरातील पाणीप्रश्न आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी नाराजी. - मुद्यांवर फारसा प्रचार नाही. एकमेकांविरुद्ध असणाऱ्या घटकांना आपल्याकडे वळविण्याच्या गणितावर भर.

प्रमुख उमेदवारसुभाष झांबड । काँग्रेसचंद्रकांत खैरे  । शिवसेनाइम्तियाज जलील । एमआयएमहर्षवर्धन जाधव । अपक्ष 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019Lok Sabha Election Major Fightsलोकसभा निवडणूक टफ फाइट्स