शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

भुयारी पुलाच्या कामामुळे शिवाजीनगर बाजारपेठेत ‘लाॅकडाऊन’; दुकानदारांवर दिवाळीपूर्वी 'संक्रांत'

By प्रशांत तेलवाडकर | Updated: October 27, 2023 12:47 IST

दैनंदिन ७० टक्के उलाढाल घटली, भाडे भरणेही कठीण

छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर रेल्वेगेटवर भुयारी मार्गाच्या कामास अखेर मुहूर्त लागला आणि नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून पुढील वर्षभरासाठी रेल्वे गेट बंद करण्यात आले. यामुळे देवळाई व सातारातील रहदारी संग्रामनगर उड्डाणपुलाकडे वळली. परिणामी, शिवाजीनगर बाजारपेठेवर दिवाळीआधी ‘संक्रांत’ आली आहे. दैनंदिन उलाढालीवर तब्बल ७० टक्के परिणाम झाला. वर्दळीच्या ठिकाणी भर दिवसा ‘लॉकडाऊन’सदृश चित्र दिसते. दिवाळीनंतर हे काम सुरू केले असते तर आम्ही वर्षभराची जगण्याची तरतूद केली असती, अशी प्रतिक्रिया येथील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

उलाढाल घटलीशिवाजीनगरात आजघडीला २०० ते २५० दुकाने आहेत. यातील ९५ टक्के दुकाने भाड्याची आहेत. भुयारी मार्गाचे काम सुरू होण्याआधी दररोज २० ते २५ लाखांची उलाढाल बाजारपेठेत होत असे. आता ३० टक्क्यांवर येऊन ठेपली आहे.- जगदीश एरंडे, कॅट, सहसचिव

ऐन दसरा-दिवाळीतच फटकाभुयारी मार्ग सुरू होण्यास दीड वर्ष लागेल. यामुळे येथील व्यापारी चार ते पाच वर्षे पाठीमागे जातील. आधी रहदारीमुळे व्यवसाय कमी झाला होता. आता रहदारी नसल्याने व्यवसायावर परिणाम झाला.- दीपक सरोदे, इलेक्ट्रॉनिक्स व्यापारी

नुसते खड्डे खोदून ठेवलेप्रशासनाने रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूंनी खड्डे खोदण्याची घाई केली; पण प्रत्यक्षात भुयारी मार्गाचे काम सुरू झाले नाही. याचा फटका व्यापाऱ्यांना बसत आहे. देवळाई व सातारातील मोठे ग्राहक शिवाजीनगरपासून दूर गेले.- सुधीर व्यास, व्यापारी

भाड्याची दुकाने सोडण्याचा विचारव्यवसाय घटल्याने भाडे देणेही कठीण जाणार आहे. यामुळे शिवाजीनगरातील अनेक दुकानदार जागा सोडण्याच्या मनस्थितीत आहेत.- मधुकर नेरकर, व्यापारी

राजकीय नेत्यांनी पुढाकार घ्यावादिवाळीनंतर भाड्याचे दुकान सोडणार आहे. मात्र, दुकानाचे मालक म्हणतात की, दुसरा नवीन व्यापारी आल्यानंतरच तुम्हाला डिपॉझिट परत मिळेल. या दिवाळीपर्यंत तरी प्रशासनाने काम पुढे ढकलावे, राजकीय नेत्यांनी यासाठी प्रयत्न करावे.- विजय खरात, व्यापारी

शिवाजीनगरातील व्यापाऱ्यांच्या मागण्या१) प्रशासनाने दिवाळीपर्यंत भुयारी मार्गाचे काम थांबवून रेल्वेगेट उघडावे.२) स्थानिक राजकीय नेत्यांनी पुढाकार घेऊन प्रशासनाचे मन वळवावे.३) भुयारी मार्गाचे काम सहा महिन्यांत पूर्ण करावे.४) काम सुरू केले, तर त्यात खंड पडू देऊ नये.५) दुकानदारांना भाड्यात सवलत द्यावी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMarketबाजारrailwayरेल्वे