शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भुयारी पुलाच्या कामामुळे शिवाजीनगर बाजारपेठेत ‘लाॅकडाऊन’; दुकानदारांवर दिवाळीपूर्वी 'संक्रांत'

By प्रशांत तेलवाडकर | Updated: October 27, 2023 12:47 IST

दैनंदिन ७० टक्के उलाढाल घटली, भाडे भरणेही कठीण

छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर रेल्वेगेटवर भुयारी मार्गाच्या कामास अखेर मुहूर्त लागला आणि नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून पुढील वर्षभरासाठी रेल्वे गेट बंद करण्यात आले. यामुळे देवळाई व सातारातील रहदारी संग्रामनगर उड्डाणपुलाकडे वळली. परिणामी, शिवाजीनगर बाजारपेठेवर दिवाळीआधी ‘संक्रांत’ आली आहे. दैनंदिन उलाढालीवर तब्बल ७० टक्के परिणाम झाला. वर्दळीच्या ठिकाणी भर दिवसा ‘लॉकडाऊन’सदृश चित्र दिसते. दिवाळीनंतर हे काम सुरू केले असते तर आम्ही वर्षभराची जगण्याची तरतूद केली असती, अशी प्रतिक्रिया येथील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

उलाढाल घटलीशिवाजीनगरात आजघडीला २०० ते २५० दुकाने आहेत. यातील ९५ टक्के दुकाने भाड्याची आहेत. भुयारी मार्गाचे काम सुरू होण्याआधी दररोज २० ते २५ लाखांची उलाढाल बाजारपेठेत होत असे. आता ३० टक्क्यांवर येऊन ठेपली आहे.- जगदीश एरंडे, कॅट, सहसचिव

ऐन दसरा-दिवाळीतच फटकाभुयारी मार्ग सुरू होण्यास दीड वर्ष लागेल. यामुळे येथील व्यापारी चार ते पाच वर्षे पाठीमागे जातील. आधी रहदारीमुळे व्यवसाय कमी झाला होता. आता रहदारी नसल्याने व्यवसायावर परिणाम झाला.- दीपक सरोदे, इलेक्ट्रॉनिक्स व्यापारी

नुसते खड्डे खोदून ठेवलेप्रशासनाने रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूंनी खड्डे खोदण्याची घाई केली; पण प्रत्यक्षात भुयारी मार्गाचे काम सुरू झाले नाही. याचा फटका व्यापाऱ्यांना बसत आहे. देवळाई व सातारातील मोठे ग्राहक शिवाजीनगरपासून दूर गेले.- सुधीर व्यास, व्यापारी

भाड्याची दुकाने सोडण्याचा विचारव्यवसाय घटल्याने भाडे देणेही कठीण जाणार आहे. यामुळे शिवाजीनगरातील अनेक दुकानदार जागा सोडण्याच्या मनस्थितीत आहेत.- मधुकर नेरकर, व्यापारी

राजकीय नेत्यांनी पुढाकार घ्यावादिवाळीनंतर भाड्याचे दुकान सोडणार आहे. मात्र, दुकानाचे मालक म्हणतात की, दुसरा नवीन व्यापारी आल्यानंतरच तुम्हाला डिपॉझिट परत मिळेल. या दिवाळीपर्यंत तरी प्रशासनाने काम पुढे ढकलावे, राजकीय नेत्यांनी यासाठी प्रयत्न करावे.- विजय खरात, व्यापारी

शिवाजीनगरातील व्यापाऱ्यांच्या मागण्या१) प्रशासनाने दिवाळीपर्यंत भुयारी मार्गाचे काम थांबवून रेल्वेगेट उघडावे.२) स्थानिक राजकीय नेत्यांनी पुढाकार घेऊन प्रशासनाचे मन वळवावे.३) भुयारी मार्गाचे काम सहा महिन्यांत पूर्ण करावे.४) काम सुरू केले, तर त्यात खंड पडू देऊ नये.५) दुकानदारांना भाड्यात सवलत द्यावी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMarketबाजारrailwayरेल्वे