शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पात्र असूनही चार वर्षांपासून कर्जमाफी का लटकली? शेतकऱ्यांची थेट मुख्यमंत्र्यांना विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 19:08 IST

मागील चार वर्षापासून सतत सरकारी कार्यालयाच्या खेटा मारत असूनही का कर्जमाफी झाली नाही अशी विचारणा या शेतकऱ्यांनी केली आहे. 

फुलंब्री : महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनामध्ये कर्जमाफीस पात्र असूनही आमचे कर्ज माफ झाले नाही,  असा सवाल करीत तालुक्यातील पिरबावडा येथील सात शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे . मागील चार वर्षापासून सतत सरकारी कार्यालयाच्या खेटा मारत असूनही का कर्जमाफी झाली नाही अशी विचारणा या शेतकऱ्यांनी केली आहे. 

फुलंब्री तालुक्यातील पिरबावडा येथील शेतकरी दिनकर विश्वनाथ  काळे ,दत्तू नामदेव काळे, कारभारी कडूबा काळे, प्रकाश मोहनाजी बकाल, उत्तम विश्वनाथ काळे, ठगनाबाई तातेराव बोकील, नवनाथ कोंडीबा मीसाळ यांनी २०१९ मध्ये महात्मा जोतीबा फुले कर्जमुक्ती योजना मध्ये कर्ज माफी व्हावी म्हणून अर्ज दाखल केला होता.  

१४ ऑक्टोबर २०२० ला सहायक निबंधक यांनी पत्र पाठवून तुमचे कर्ज माफ झालेले आहे, याद्या प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यामध्ये आपले नाव येईल असे कळविले होते. मात्र, शेतकऱ्यांची कर्जमाफी काही झाली नाही. तेव्हापासून सदर शेतकरी तहसीलदार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयाच्या खेटा मारत आहेत. पण त्यांना कोठूनही मदत मिळाली नाही. दरम्यान, ३ नोव्हेंबरला सातही शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषी मंत्री धनंजय मुंढे यांना पत्र पाठवून आम्ही कर्ज माफीत पात्र ठरवून ही आमचे कर्ज का माफ झाले नाही अशी विचारणा केली. तसेच याची चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. 

१३ ऑगस्ट २०१८ मध्ये शेतीकरीता ९५ हजार रुपये पिक कर्ज घेतले होते. २०१९ च्या  कर्जमाफीमध्ये पात्र ठरलो असे पत्र देखील मला मिळाले. पण कर्ज माफ  झालेले नाही. या करिता सतत शासन दरबारी चकरा मारत आहे.  पण अजूनतरी मदत मिळाली नाही. आज रोजी माझ्याकडे १ लाख ३४ हजार रुपये असल्याचे दाखविण्यात आले व चार महिन्यापूर्वी बँकेने माझे खाते गोठवले आहे, अशी माहिती शेतकरी कारभारी कडूबा मिसाळ यांनी दिली

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबाद