शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

इतरांचे आयुष्यही व्हावे प्रकाशमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:16 IST

रक्तदानाइतकेच दृष्टिदान (नेत्रदान) महत्त्वाचे आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन व्यक्तींना दृष्टी येऊ शकते, याचे महत्त्व समाजाला कळू लागले आहे. त्यामुळे नेत्रदानाचे प्रमाण वाढण्यास मदत होत आहे. गेल्या १४ महिन्यांत जिल्ह्यातील १४३ लोकांच्या नेत्रदानामुळे १५३ जणांना दृष्टी मिळाली. मृत्यूनंतरही या लोकांनी इतरांच्या नेत्रज्योती प्रज्वलित करून इतरांचे आयुष्य प्रकाशमय केले.

ठळक मुद्देजागतिक दृष्टिदान दिन : १४ महिन्यांत १४३ लोकांच्या नेत्रदानाने १५३ जणांना मिळाली दृष्टी

संतोष हिरेमठ ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : रक्तदानाइतकेच दृष्टिदान (नेत्रदान) महत्त्वाचे आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन व्यक्तींना दृष्टी येऊ शकते, याचे महत्त्व समाजाला कळू लागले आहे. त्यामुळे नेत्रदानाचे प्रमाण वाढण्यास मदत होत आहे. गेल्या १४ महिन्यांत जिल्ह्यातील १४३ लोकांच्या नेत्रदानामुळे १५३ जणांना दृष्टी मिळाली. मृत्यूनंतरही या लोकांनी इतरांच्या नेत्रज्योती प्रज्वलित करून इतरांचे आयुष्य प्रकाशमय केले.दरवर्षी १० जून हा जागतिक दृष्टिदान दिन म्हणून पाळण्यात येतो. जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) नेत्र विभागासह सहा ठिकाणी नेत्रपेढी आहेत. या ठिकाणी नेत्रदान, नेत्रसंकलन आणि प्रत्यारोपण होते.राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नेत्र विभागातर्फे नेत्रपेढींबरोबर समन्वय ठेवून नेत्रदान वाढीसाठी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येतात. दृष्टिदानाएवढे मोठे दान नाही. एखाद्या अंधव्यक्तीच्या जीवनात प्रकाश पोहोचवून नेत्ररूपाने आयुष्य उजळविण्याचे कार्य मरणोत्तर पाडता येते. नेत्रदानाबाबत समाजात आजही काही गैरसमज आहेत. त्यातील एक म्हणजे मृत्यूनंतर नेत्रदानामुळे व्यक्ती विदू्रप दिसेल, ही वाटणारी सर्वात मोठी भीती. यामुळे नेत्रदानासाठी स्वेच्छेने येणाऱ्यांची संख्या अगदीच अल्प होती; परंतु गेल्या काही वर्षांत आरोग्य विभागाकडून होत असलेल्या जागृतीमुळे नेत्रदानाचे महत्त्व समाजाला कळू लागले आहे.सहा नेत्रपेढींमध्ये गेल्या १४ महिन्यांत १४३ व्यक्तींचे मरणोत्तर २८६ नेत्रसंकलन करण्यात आले. संकलन झालेल्या नेत्रांच्या प्रत्यारोपणाने १५३ जणांना दृष्टी प्राप्त झाली. आजारपणासह विविध कारणांमुळे संकलित केलेल्या अनेक नेत्रांचे प्रत्यारोपण अशक्य असते. अशी नेत्र संशोधनासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. त्यामुळे दृष्टी देण्यासह वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी हातभार लावण्याचे कार्य नेत्रदानाच्या माध्यमातून होत आहे.नेत्रदानासाठी ही काळजी घ्याव्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्याचे डोळे सहा तास जिवंत असतात. त्यामुळे हे सहा तास अत्यंत महत्त्वाचे असतात. व्यक्तीच्या मृत्यूनंतर नजीकच्या नेत्रपेढीबरोबर संपर्क केल्यानंतर काही मिनिटांत नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण होते. नेत्रदानासाठी मृत व्यक्तीचे डोळे लगेच बंद करून डोळ्यावर स्वच्छ ओले कापड ठेवले पाहिजे. खोलीमध्ये असलेला पंखा बंद करावा. खोलीमध्ये एसी असेल तर तो सुरू ठेवावा. डोक्याखाली उशी ठेवावी. सहा तासांच्या आत नेत्र काढल्यास ते बुब्बुळरोपण करण्यास उपयोगी पडू शकतात.देशभरात ६१२ ठिकाणी नेत्रदानाचा प्रचारनेत्रदान प्रचारक म्हणून ओळखले जाणारे अ‍ॅड. किशोर सोनी हे १९९९ पासून नेत्रदानासाठी जनजागृतीचे क ाम करीत आहेत. केवळ औरंगाबाद शहरच नव्हे तर देशभरातील ६१२ ठिकाणी त्यांनी नेत्रदानाचा प्रचार-प्रसार केला आहे. यात्रा असो की उत्सव, त्या ठिकाणी हातात फलक धरून नेत्रदानाविषयी जनजागृती करण्याचे कार्य ते अवितरपणे करीत आहेत. त्यांच्यामुळे अनेकांनी नेत्रदानाचा संकल्प केला.अ‍ॅड. किशोर सोनी म्हणतात, आजघडीला वृद्धांचे नेत्रदान करण्याचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये अनेकांचे नेत्र प्रत्यारोपणासाठी योग्य नसतात. त्यामुळे केवळ संशोधनासाठी नेत्रांचा वापर होतो. त्यामुळे सशक्त नेत्र मिळण्याची गरज आहे. त्यासाठी मृत्यू पावणाºया तरुण, प्रौढ व्यक्तींच्या नेत्रदानातही वाढ होण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक व्यक्तीने नेत्रदानाच्या संकल्पाबरोबर आयुष्यात एका व्यक्तीचे तरी नेत्रदान करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबादMedicalवैद्यकीय