शेतकऱ्यांमुळे हरणाला जीवदान

By Admin | Updated: July 3, 2016 00:30 IST2016-07-02T23:53:40+5:302016-07-03T00:30:55+5:30

निटूर : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शेंद शिवारात १ महिन्याच्या हरणाच्या पाडसावर कुत्र्यांनी हल्ला केला़ या कुत्र्यांच्या तावडीतून शेतकऱ्यांनी त्यास सोडविले़

Livelihood by the Farmers | शेतकऱ्यांमुळे हरणाला जीवदान

शेतकऱ्यांमुळे हरणाला जीवदान


निटूर : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शेंद शिवारात १ महिन्याच्या हरणाच्या पाडसावर कुत्र्यांनी हल्ला केला़ या कुत्र्यांच्या तावडीतून शेतकऱ्यांनी त्यास सोडविले़ यामुळे हरणाच्या पाडसाचे प्राण वाचले आहेत़ या जखमी हरणाला गावकऱ्यांनी वन विभागाकडे सुपूर्द केले आहे़
शेंद शिवारातील एका शेतात साडेसहा वाजण्याच्या सुमारास हरणांचा कळप चरत होता़ दरम्यान, काही कुत्र्यांच्या टोळक्यांनी या कळपावर हल्ला केला़ कुत्र्यांच्या तावडीत हरणाचे एक महिन्याचे पाडस सापडले़ हा प्रकार शेतात असलेल्या राहूल मोगरगे व वैजनाथ सूर्यवंशी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या पाडसाला सोडविण्यासाठी प्रयत्न केले़ काही वेळानंतर या दोघांनी या पाडसाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडविले़ जखमी पाडसाला निलंगा येथील वनविभागाच्या कर्मचाऱ्याकडे सुपूर्द करण्यात आले़ जखमी पाडसावर वनविभाग उपचार करणार आहे़

Web Title: Livelihood by the Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.