शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

ऐका हो ऐका! एक मेपासून ७ जलकुंभांद्वारे पाणीपुरवठा; कंत्राटदाराचे खंडपीठात निवेदन

By प्रभुदास पाटोळे | Updated: April 3, 2024 17:51 IST

१९७२ नंतरच्या या सर्वात मोठ्या पाणीपुरवठा योजनेसाठी सर्वांचेच सहकार्य अपेक्षित

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पाणीपुरवठा योजनेंतर्गत कंत्राटदाराने यापूर्वी मनपाला सोपविलेले हनुमान टेकडी आणि टीव्ही सेंटर येथील दोन जलकुंभ कार्यान्वित झाले आहेत. हिमायतबाग येथील जलकुंभ १५ एप्रिलपर्यंत आणि प्रतापनगर, दिल्ली गेट, शाक्यनगर आणि शिवाजी मैदान येथील जलकुंभ ३० एप्रिलपर्यंत हस्तांतरित करण्याचे कंत्राटदारातर्फे खंडपीठात निवेदन करण्यात आले.

यामुळे एक मेपासून एकूण ७ जलकुंभांद्वारे शहराला पाणीपुरवठा होणार असल्याचे सुनावणीदरम्यान स्पष्ट झाले. यापूर्वी शहराची तहान भागविण्यासाठी सुरू करण्यात आलेली ‘समांतर पाणीपुरवठा योजना’ शहरवासीयांसाठी दिवास्वप्नच ठरली. मात्र, १९७२ नंतर सध्या राबवण्यात येणारी सुधारित २७४० काेटी रुपयांची ही सर्वात माेठी पाणीपुरवठा याेजना आहे. ती पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. त्यासाठी सर्वांनीच सहकार्य करावे, अशी अपेक्षा खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. आर. एम. जाेशी यांनी मंगळवारी व्यक्त केली.

कंत्राटदाराने वाळूच्या उपलब्धतेसंदर्भात विषय उपस्थित केला. त्यावर सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, कंत्राटदाराची वाळू उपशाची मुदत संपली आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही कंत्राटदार वाळू उपसा करू शकले नाहीत. आता नवीन वाळू उपशाची मागणी करीत आहेत. दुसऱ्या ठेकेदारांकडे नक्षत्रवाडी येथे ५ हजार ब्रास आणि जिल्ह्यातील इतर डेपोंमध्ये २ हजार ब्रास वाळूसाठा आहे. कंत्राटदाराने रॉयल्टी भरली तर त्यांना शासकीय डेपाेंतून वाळू मिळू शकेल.

मात्र, त्यांना नवीन साठा हवा असल्यास कंत्राटदार कंपनीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. त्यावर केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयामार्फत अधिसूचना जारी करण्यात येईल. संबंधित अधिसूचनेनंतर राज्य शासन दाेन समित्यांची स्थापना करतील. त्या समित्या कंत्राटदार कंपनीच्या प्रस्तावावर विचार करून वाळू उपसा करण्यासाठी मान्यता प्रदान करू शकेल. पर्यावरणीय परवानगीशिवाय वाळू उपसा करता येणार नाही, असे गिरासे यांनी सांगितले.

त्यावर केंद्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाने पुढील १५ दिवसांत दोन समित्या स्थापन करण्याची अधिसूचना जारी करावी. त्यानंतर राज्य शासनाने त्या समित्या नेमून वाळू उपशासाठीचे प्रस्ताव मान्यतेसाठी सदर समितीसमोर ठेवावेत, असे निर्देश खंडपीठाने दिले. पुढील सुनावणी १६ एप्रिलला होईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीHigh Courtउच्च न्यायालय