शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
3
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
4
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
5
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
6
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
7
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
8
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
9
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
10
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
11
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
12
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
13
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
14
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
15
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
16
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
17
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
18
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
19
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
20
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?

ऐका हो ऐका! एक मेपासून ७ जलकुंभांद्वारे पाणीपुरवठा; कंत्राटदाराचे खंडपीठात निवेदन

By प्रभुदास पाटोळे | Updated: April 3, 2024 17:51 IST

१९७२ नंतरच्या या सर्वात मोठ्या पाणीपुरवठा योजनेसाठी सर्वांचेच सहकार्य अपेक्षित

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पाणीपुरवठा योजनेंतर्गत कंत्राटदाराने यापूर्वी मनपाला सोपविलेले हनुमान टेकडी आणि टीव्ही सेंटर येथील दोन जलकुंभ कार्यान्वित झाले आहेत. हिमायतबाग येथील जलकुंभ १५ एप्रिलपर्यंत आणि प्रतापनगर, दिल्ली गेट, शाक्यनगर आणि शिवाजी मैदान येथील जलकुंभ ३० एप्रिलपर्यंत हस्तांतरित करण्याचे कंत्राटदारातर्फे खंडपीठात निवेदन करण्यात आले.

यामुळे एक मेपासून एकूण ७ जलकुंभांद्वारे शहराला पाणीपुरवठा होणार असल्याचे सुनावणीदरम्यान स्पष्ट झाले. यापूर्वी शहराची तहान भागविण्यासाठी सुरू करण्यात आलेली ‘समांतर पाणीपुरवठा योजना’ शहरवासीयांसाठी दिवास्वप्नच ठरली. मात्र, १९७२ नंतर सध्या राबवण्यात येणारी सुधारित २७४० काेटी रुपयांची ही सर्वात माेठी पाणीपुरवठा याेजना आहे. ती पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. त्यासाठी सर्वांनीच सहकार्य करावे, अशी अपेक्षा खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. आर. एम. जाेशी यांनी मंगळवारी व्यक्त केली.

कंत्राटदाराने वाळूच्या उपलब्धतेसंदर्भात विषय उपस्थित केला. त्यावर सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, कंत्राटदाराची वाळू उपशाची मुदत संपली आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही कंत्राटदार वाळू उपसा करू शकले नाहीत. आता नवीन वाळू उपशाची मागणी करीत आहेत. दुसऱ्या ठेकेदारांकडे नक्षत्रवाडी येथे ५ हजार ब्रास आणि जिल्ह्यातील इतर डेपोंमध्ये २ हजार ब्रास वाळूसाठा आहे. कंत्राटदाराने रॉयल्टी भरली तर त्यांना शासकीय डेपाेंतून वाळू मिळू शकेल.

मात्र, त्यांना नवीन साठा हवा असल्यास कंत्राटदार कंपनीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. त्यावर केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयामार्फत अधिसूचना जारी करण्यात येईल. संबंधित अधिसूचनेनंतर राज्य शासन दाेन समित्यांची स्थापना करतील. त्या समित्या कंत्राटदार कंपनीच्या प्रस्तावावर विचार करून वाळू उपसा करण्यासाठी मान्यता प्रदान करू शकेल. पर्यावरणीय परवानगीशिवाय वाळू उपसा करता येणार नाही, असे गिरासे यांनी सांगितले.

त्यावर केंद्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाने पुढील १५ दिवसांत दोन समित्या स्थापन करण्याची अधिसूचना जारी करावी. त्यानंतर राज्य शासनाने त्या समित्या नेमून वाळू उपशासाठीचे प्रस्ताव मान्यतेसाठी सदर समितीसमोर ठेवावेत, असे निर्देश खंडपीठाने दिले. पुढील सुनावणी १६ एप्रिलला होईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीHigh Courtउच्च न्यायालय