शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

चाळीस गावांतील गरिबांच्या घरात प्रकाश; वेळे आधीच झाली सौभाग्य योजनेची उद्दिष्ट पूर्तता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 11:59 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनापासून राज्यात ग्रामस्वराज अभियानांतर्गत ‘सौभाग्य’ योजनेतून वीजजोडणी देण्याचा संकल्प महावितरणने केला होता.

ठळक मुद्देऔरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत ४० गावांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना वीजजोडणी देण्यात आलीमहावितरणने या अभियानाच्या उद्दिष्टाची पूर्तता निर्धारित वेळेअगोदरच केली आहे. 

औरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनापासून राज्यात ग्रामस्वराज अभियानांतर्गत ‘सौभाग्य’ योजनेतून वीजजोडणी देण्याचा संकल्प महावितरणने केला होता. राज्यातील १९२ गावांपैकी औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत ४० गावांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना वीजजोडणी देण्यात आली. विशेष म्हणजे, महावितरणने या अभियानाच्या उद्दिष्टाची पूर्तता निर्धारित वेळेअगोदरच केली आहे. 

या अभियानातून महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत ४० गावांमध्ये वीजजोडणी देण्यात आली. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात गलवाडा, जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील पाडळी दुधा, बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात ब्रह्मगाव, केज तालुक्यात सोडाळा, अंबाजोगाई तालुक्यात दैठणा राडी, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात नांदुरा बु., जळकोट तालुक्यात मेवापूर, येउरी, देवणी तालुक्यात भोपणी, उदगीर तालुक्यात हंगरगा कुदर, कसराळ, नागलगाव, उस्मानाबाद तालुक्यातील पोहनेर, उमरगा तालुक्यात मुरली, नांदेड तालुक्यातील पिंप्री महिपल, किनवट तालुक्यात अमवाडी, हदगाव तालुक्यात शिरूर, लायहारी, दोरली, डिग्रज, रावणगाव तामसा, अधार्पूर तालुक्यात लोणी खु., उमरी तालुक्यात राहती खु., धमार्बाद तालुक्यात पांगरी, बिलोली तालुक्यात येसगी, कंधार तालुक्यात राऊतखेडा, मुखेड तालुक्यात पांडुरणी, करणा, केरूर, माखणी, प्रतापपूर, देगलूर तालुक्यात माणस हंगरगा, मूळगाव, चाकूर, हिंगोली तालुक्यात दैठणा, काळगाव, सेनगाव तालुक्यात सिंदीफळ, कळमनुरी तालुक्यात टुपा, वसमत तालुक्यात कौंडगाव, जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वडगाव आदी गावांचा समावेश आहे. 

पाचऐवजी एक तारखेलाच उद्दिष्टाची पूर्तताकेंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल ते ५ मेपर्यंत राज्यामध्ये ‘ग्रामस्वराज अभियान’ राबविण्यात आले.या अभियानात ‘सौभाग्य’ योजनेतून राज्यातील १९२ गावांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक दलित वस्ती आहे व गावात आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची संख्या अधिक आहे, अशा गावांतील कुटुंबांना शंभर टक्के वीजजोडणी देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार राज्यातील २३ जिल्ह्यांतील १९२ गावांमध्ये वीजजोडणी नसलेल्या कुटुंबांना ५ मेपर्यंत वीजजोडणी दिली जाणार होती. तथापि, हे काम १ मे रोजीच पूर्ण करण्यात महावितरणला यश आले. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणState Governmentराज्य सरकारgovernment schemeसरकारी योजनाelectricityवीज