शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

चाळीस गावांतील गरिबांच्या घरात प्रकाश; वेळे आधीच झाली सौभाग्य योजनेची उद्दिष्ट पूर्तता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 11:59 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनापासून राज्यात ग्रामस्वराज अभियानांतर्गत ‘सौभाग्य’ योजनेतून वीजजोडणी देण्याचा संकल्प महावितरणने केला होता.

ठळक मुद्देऔरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत ४० गावांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना वीजजोडणी देण्यात आलीमहावितरणने या अभियानाच्या उद्दिष्टाची पूर्तता निर्धारित वेळेअगोदरच केली आहे. 

औरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनापासून राज्यात ग्रामस्वराज अभियानांतर्गत ‘सौभाग्य’ योजनेतून वीजजोडणी देण्याचा संकल्प महावितरणने केला होता. राज्यातील १९२ गावांपैकी औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत ४० गावांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना वीजजोडणी देण्यात आली. विशेष म्हणजे, महावितरणने या अभियानाच्या उद्दिष्टाची पूर्तता निर्धारित वेळेअगोदरच केली आहे. 

या अभियानातून महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत ४० गावांमध्ये वीजजोडणी देण्यात आली. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात गलवाडा, जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील पाडळी दुधा, बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात ब्रह्मगाव, केज तालुक्यात सोडाळा, अंबाजोगाई तालुक्यात दैठणा राडी, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात नांदुरा बु., जळकोट तालुक्यात मेवापूर, येउरी, देवणी तालुक्यात भोपणी, उदगीर तालुक्यात हंगरगा कुदर, कसराळ, नागलगाव, उस्मानाबाद तालुक्यातील पोहनेर, उमरगा तालुक्यात मुरली, नांदेड तालुक्यातील पिंप्री महिपल, किनवट तालुक्यात अमवाडी, हदगाव तालुक्यात शिरूर, लायहारी, दोरली, डिग्रज, रावणगाव तामसा, अधार्पूर तालुक्यात लोणी खु., उमरी तालुक्यात राहती खु., धमार्बाद तालुक्यात पांगरी, बिलोली तालुक्यात येसगी, कंधार तालुक्यात राऊतखेडा, मुखेड तालुक्यात पांडुरणी, करणा, केरूर, माखणी, प्रतापपूर, देगलूर तालुक्यात माणस हंगरगा, मूळगाव, चाकूर, हिंगोली तालुक्यात दैठणा, काळगाव, सेनगाव तालुक्यात सिंदीफळ, कळमनुरी तालुक्यात टुपा, वसमत तालुक्यात कौंडगाव, जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वडगाव आदी गावांचा समावेश आहे. 

पाचऐवजी एक तारखेलाच उद्दिष्टाची पूर्तताकेंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल ते ५ मेपर्यंत राज्यामध्ये ‘ग्रामस्वराज अभियान’ राबविण्यात आले.या अभियानात ‘सौभाग्य’ योजनेतून राज्यातील १९२ गावांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक दलित वस्ती आहे व गावात आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची संख्या अधिक आहे, अशा गावांतील कुटुंबांना शंभर टक्के वीजजोडणी देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार राज्यातील २३ जिल्ह्यांतील १९२ गावांमध्ये वीजजोडणी नसलेल्या कुटुंबांना ५ मेपर्यंत वीजजोडणी दिली जाणार होती. तथापि, हे काम १ मे रोजीच पूर्ण करण्यात महावितरणला यश आले. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणState Governmentराज्य सरकारgovernment schemeसरकारी योजनाelectricityवीज