शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

चाळीस गावांतील गरिबांच्या घरात प्रकाश; वेळे आधीच झाली सौभाग्य योजनेची उद्दिष्ट पूर्तता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 11:59 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनापासून राज्यात ग्रामस्वराज अभियानांतर्गत ‘सौभाग्य’ योजनेतून वीजजोडणी देण्याचा संकल्प महावितरणने केला होता.

ठळक मुद्देऔरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत ४० गावांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना वीजजोडणी देण्यात आलीमहावितरणने या अभियानाच्या उद्दिष्टाची पूर्तता निर्धारित वेळेअगोदरच केली आहे. 

औरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनापासून राज्यात ग्रामस्वराज अभियानांतर्गत ‘सौभाग्य’ योजनेतून वीजजोडणी देण्याचा संकल्प महावितरणने केला होता. राज्यातील १९२ गावांपैकी औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत ४० गावांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना वीजजोडणी देण्यात आली. विशेष म्हणजे, महावितरणने या अभियानाच्या उद्दिष्टाची पूर्तता निर्धारित वेळेअगोदरच केली आहे. 

या अभियानातून महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत ४० गावांमध्ये वीजजोडणी देण्यात आली. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात गलवाडा, जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील पाडळी दुधा, बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात ब्रह्मगाव, केज तालुक्यात सोडाळा, अंबाजोगाई तालुक्यात दैठणा राडी, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात नांदुरा बु., जळकोट तालुक्यात मेवापूर, येउरी, देवणी तालुक्यात भोपणी, उदगीर तालुक्यात हंगरगा कुदर, कसराळ, नागलगाव, उस्मानाबाद तालुक्यातील पोहनेर, उमरगा तालुक्यात मुरली, नांदेड तालुक्यातील पिंप्री महिपल, किनवट तालुक्यात अमवाडी, हदगाव तालुक्यात शिरूर, लायहारी, दोरली, डिग्रज, रावणगाव तामसा, अधार्पूर तालुक्यात लोणी खु., उमरी तालुक्यात राहती खु., धमार्बाद तालुक्यात पांगरी, बिलोली तालुक्यात येसगी, कंधार तालुक्यात राऊतखेडा, मुखेड तालुक्यात पांडुरणी, करणा, केरूर, माखणी, प्रतापपूर, देगलूर तालुक्यात माणस हंगरगा, मूळगाव, चाकूर, हिंगोली तालुक्यात दैठणा, काळगाव, सेनगाव तालुक्यात सिंदीफळ, कळमनुरी तालुक्यात टुपा, वसमत तालुक्यात कौंडगाव, जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वडगाव आदी गावांचा समावेश आहे. 

पाचऐवजी एक तारखेलाच उद्दिष्टाची पूर्तताकेंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल ते ५ मेपर्यंत राज्यामध्ये ‘ग्रामस्वराज अभियान’ राबविण्यात आले.या अभियानात ‘सौभाग्य’ योजनेतून राज्यातील १९२ गावांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक दलित वस्ती आहे व गावात आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची संख्या अधिक आहे, अशा गावांतील कुटुंबांना शंभर टक्के वीजजोडणी देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार राज्यातील २३ जिल्ह्यांतील १९२ गावांमध्ये वीजजोडणी नसलेल्या कुटुंबांना ५ मेपर्यंत वीजजोडणी दिली जाणार होती. तथापि, हे काम १ मे रोजीच पूर्ण करण्यात महावितरणला यश आले. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणState Governmentराज्य सरकारgovernment schemeसरकारी योजनाelectricityवीज