शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लेवा पाटीदार समाजाला हवी उद्योगधंद्यासाठी सरकारची मदत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 17:45 IST

इ.स. बाराशेमध्ये गुजरातेतून स्थलांतरित होऊन विशेषत: जळगाव व बुलढाणा जिल्ह्यात स्थायिक झालेला लेवा पाटीदार समाज आता औरंगाबादेतही बर्‍यापैकी दिसू लागला आहे. या समाजाची सुमारे साडेपाच हजार कुटुंबे म्हणजे जवळपास २५ हजार लोकसंख्या औरंगाबादेत  असून, हा समाज उद्योगधंद्यात  स्थिरावू इच्छितो.

औरंगाबाद : इ.स. बाराशेमध्ये गुजरातेतून स्थलांतरित होऊन विशेषत: जळगाव व बुलढाणा जिल्ह्यात स्थायिक झालेला लेवा पाटीदार समाज आता औरंगाबादेतही बर्‍यापैकी दिसू लागला आहे. या समाजाची सुमारे साडेपाच हजार कुटुंबे म्हणजे जवळपास २५ हजार लोकसंख्या औरंगाबादेत  असून, हा समाज उद्योगधंद्यात  स्थिरावू इच्छितो. नोकर्‍यांमध्येही आहे. पण या समाजाच्या तरुणांना, व नोकर्‍यांमधून बाहेर पडून उद्योगधंदे करू इच्छिणार्‍यांसाठी शासकीय मदत मिळावी, त्यांना एमआयडीसीत प्राधान्याने भूखंड उपलब्ध व्हावेत, योग्य कर्जपुरवठा व्हावा अशी अपेक्षा लोकमतच्या बिरादरीत व्यक्त करण्यात आली. 

विकास चौधरी, व्ही.आर. महाजन, मधुकर सरोदे, ओमप्रकाश चौधरी आणि सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक जगन्नाथ किनगे आदींनी बिरादरीच्या या चर्चेत लेवा पाटीदार समाजाच्या समस्यांना वाचा फोडली.लेवा पाटीदार मित्र मंडळ व लेवा पाटीदार प्रोफेशनल असोसिएशनचे  हे सारे जण प्रमुख. गुजरातमध्ये आमचा समाज खुल्या प्रवर्गात आहे. पण महाराष्ट्रात ओबीसीमध्ये आहे, याचे  समाधान त्यांनी व्यक्त केला. लेवा पाटीदार हा मूळचा शेतकरी समाज. जळगाव जिल्ह्यात केळीचे उत्पादन घेणारा. पण अलिकडे पाण्याचीपातळी खाली खाली जात असल्याने केळीच्या उत्पादनावरही परिणाम होत आहे. औरंगाबादेत स्थायिक झालेल्या समाजासाठी सामाजिक सभागृह वा मंगल कार्यालय हवे. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह हवे. यासाठी सरकारने जागा उपलब्ध करुन द्यावी अशी आग्रही मागणी यावेळी विकास चौधरी व सर्वांनी केली. 

माजी शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी, एकनाथ खडसे, खा. रक्षा चौधरी, आ. राजू भोळे, आ. हरिभाऊ जावळे, प्रख्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी, साहित्यिक भालचंद्र नेमाडे अशी नामवंत मंडळी लेवा पाटीदार समाजातून येतात, याबद्दलचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.

मुला- मुलींचे विषम प्रमाण ही मोठी समस्या...अन्य समाजाप्रमाणेच लेवा पाटीदार समाजही आज मुला- मुलींच्या विषम प्रमाणास सामोरे जात आहे. जळगाव  व बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी कुटुंबातील मुलांना आज  मुली मिळत नाहीत म्हणून ते विवाह करु शकत नाहीत. मुलांपेक्षा मुली खूप शिकलेल्या आहेत. पण एक हजार मुलांमागे आठशे मुली असे प्रमाण आहे. गावाकडे ५० एकर शेती आहे, पण त्या मुलाला मुलगी मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. तसेच मुला- मुलींचे जमत नाही म्हणून घटस्फोटाचे प्रमाणही जास्त आहे.यासंदर्भात योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून औरंगाबादेत लवकरच एक शिबीर घेण्यात येणार आहे. त्याआधी २४ डिसेंबर रोजी नाशिक येथे असे शिबीर होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद