शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

लेवा पाटीदार समाजाला हवी उद्योगधंद्यासाठी सरकारची मदत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 17:45 IST

इ.स. बाराशेमध्ये गुजरातेतून स्थलांतरित होऊन विशेषत: जळगाव व बुलढाणा जिल्ह्यात स्थायिक झालेला लेवा पाटीदार समाज आता औरंगाबादेतही बर्‍यापैकी दिसू लागला आहे. या समाजाची सुमारे साडेपाच हजार कुटुंबे म्हणजे जवळपास २५ हजार लोकसंख्या औरंगाबादेत  असून, हा समाज उद्योगधंद्यात  स्थिरावू इच्छितो.

औरंगाबाद : इ.स. बाराशेमध्ये गुजरातेतून स्थलांतरित होऊन विशेषत: जळगाव व बुलढाणा जिल्ह्यात स्थायिक झालेला लेवा पाटीदार समाज आता औरंगाबादेतही बर्‍यापैकी दिसू लागला आहे. या समाजाची सुमारे साडेपाच हजार कुटुंबे म्हणजे जवळपास २५ हजार लोकसंख्या औरंगाबादेत  असून, हा समाज उद्योगधंद्यात  स्थिरावू इच्छितो. नोकर्‍यांमध्येही आहे. पण या समाजाच्या तरुणांना, व नोकर्‍यांमधून बाहेर पडून उद्योगधंदे करू इच्छिणार्‍यांसाठी शासकीय मदत मिळावी, त्यांना एमआयडीसीत प्राधान्याने भूखंड उपलब्ध व्हावेत, योग्य कर्जपुरवठा व्हावा अशी अपेक्षा लोकमतच्या बिरादरीत व्यक्त करण्यात आली. 

विकास चौधरी, व्ही.आर. महाजन, मधुकर सरोदे, ओमप्रकाश चौधरी आणि सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक जगन्नाथ किनगे आदींनी बिरादरीच्या या चर्चेत लेवा पाटीदार समाजाच्या समस्यांना वाचा फोडली.लेवा पाटीदार मित्र मंडळ व लेवा पाटीदार प्रोफेशनल असोसिएशनचे  हे सारे जण प्रमुख. गुजरातमध्ये आमचा समाज खुल्या प्रवर्गात आहे. पण महाराष्ट्रात ओबीसीमध्ये आहे, याचे  समाधान त्यांनी व्यक्त केला. लेवा पाटीदार हा मूळचा शेतकरी समाज. जळगाव जिल्ह्यात केळीचे उत्पादन घेणारा. पण अलिकडे पाण्याचीपातळी खाली खाली जात असल्याने केळीच्या उत्पादनावरही परिणाम होत आहे. औरंगाबादेत स्थायिक झालेल्या समाजासाठी सामाजिक सभागृह वा मंगल कार्यालय हवे. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह हवे. यासाठी सरकारने जागा उपलब्ध करुन द्यावी अशी आग्रही मागणी यावेळी विकास चौधरी व सर्वांनी केली. 

माजी शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी, एकनाथ खडसे, खा. रक्षा चौधरी, आ. राजू भोळे, आ. हरिभाऊ जावळे, प्रख्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी, साहित्यिक भालचंद्र नेमाडे अशी नामवंत मंडळी लेवा पाटीदार समाजातून येतात, याबद्दलचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.

मुला- मुलींचे विषम प्रमाण ही मोठी समस्या...अन्य समाजाप्रमाणेच लेवा पाटीदार समाजही आज मुला- मुलींच्या विषम प्रमाणास सामोरे जात आहे. जळगाव  व बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी कुटुंबातील मुलांना आज  मुली मिळत नाहीत म्हणून ते विवाह करु शकत नाहीत. मुलांपेक्षा मुली खूप शिकलेल्या आहेत. पण एक हजार मुलांमागे आठशे मुली असे प्रमाण आहे. गावाकडे ५० एकर शेती आहे, पण त्या मुलाला मुलगी मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. तसेच मुला- मुलींचे जमत नाही म्हणून घटस्फोटाचे प्रमाणही जास्त आहे.यासंदर्भात योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून औरंगाबादेत लवकरच एक शिबीर घेण्यात येणार आहे. त्याआधी २४ डिसेंबर रोजी नाशिक येथे असे शिबीर होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद