शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

लेवा पाटीदार समाजाला हवी उद्योगधंद्यासाठी सरकारची मदत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 17:45 IST

इ.स. बाराशेमध्ये गुजरातेतून स्थलांतरित होऊन विशेषत: जळगाव व बुलढाणा जिल्ह्यात स्थायिक झालेला लेवा पाटीदार समाज आता औरंगाबादेतही बर्‍यापैकी दिसू लागला आहे. या समाजाची सुमारे साडेपाच हजार कुटुंबे म्हणजे जवळपास २५ हजार लोकसंख्या औरंगाबादेत  असून, हा समाज उद्योगधंद्यात  स्थिरावू इच्छितो.

औरंगाबाद : इ.स. बाराशेमध्ये गुजरातेतून स्थलांतरित होऊन विशेषत: जळगाव व बुलढाणा जिल्ह्यात स्थायिक झालेला लेवा पाटीदार समाज आता औरंगाबादेतही बर्‍यापैकी दिसू लागला आहे. या समाजाची सुमारे साडेपाच हजार कुटुंबे म्हणजे जवळपास २५ हजार लोकसंख्या औरंगाबादेत  असून, हा समाज उद्योगधंद्यात  स्थिरावू इच्छितो. नोकर्‍यांमध्येही आहे. पण या समाजाच्या तरुणांना, व नोकर्‍यांमधून बाहेर पडून उद्योगधंदे करू इच्छिणार्‍यांसाठी शासकीय मदत मिळावी, त्यांना एमआयडीसीत प्राधान्याने भूखंड उपलब्ध व्हावेत, योग्य कर्जपुरवठा व्हावा अशी अपेक्षा लोकमतच्या बिरादरीत व्यक्त करण्यात आली. 

विकास चौधरी, व्ही.आर. महाजन, मधुकर सरोदे, ओमप्रकाश चौधरी आणि सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक जगन्नाथ किनगे आदींनी बिरादरीच्या या चर्चेत लेवा पाटीदार समाजाच्या समस्यांना वाचा फोडली.लेवा पाटीदार मित्र मंडळ व लेवा पाटीदार प्रोफेशनल असोसिएशनचे  हे सारे जण प्रमुख. गुजरातमध्ये आमचा समाज खुल्या प्रवर्गात आहे. पण महाराष्ट्रात ओबीसीमध्ये आहे, याचे  समाधान त्यांनी व्यक्त केला. लेवा पाटीदार हा मूळचा शेतकरी समाज. जळगाव जिल्ह्यात केळीचे उत्पादन घेणारा. पण अलिकडे पाण्याचीपातळी खाली खाली जात असल्याने केळीच्या उत्पादनावरही परिणाम होत आहे. औरंगाबादेत स्थायिक झालेल्या समाजासाठी सामाजिक सभागृह वा मंगल कार्यालय हवे. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह हवे. यासाठी सरकारने जागा उपलब्ध करुन द्यावी अशी आग्रही मागणी यावेळी विकास चौधरी व सर्वांनी केली. 

माजी शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी, एकनाथ खडसे, खा. रक्षा चौधरी, आ. राजू भोळे, आ. हरिभाऊ जावळे, प्रख्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी, साहित्यिक भालचंद्र नेमाडे अशी नामवंत मंडळी लेवा पाटीदार समाजातून येतात, याबद्दलचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.

मुला- मुलींचे विषम प्रमाण ही मोठी समस्या...अन्य समाजाप्रमाणेच लेवा पाटीदार समाजही आज मुला- मुलींच्या विषम प्रमाणास सामोरे जात आहे. जळगाव  व बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी कुटुंबातील मुलांना आज  मुली मिळत नाहीत म्हणून ते विवाह करु शकत नाहीत. मुलांपेक्षा मुली खूप शिकलेल्या आहेत. पण एक हजार मुलांमागे आठशे मुली असे प्रमाण आहे. गावाकडे ५० एकर शेती आहे, पण त्या मुलाला मुलगी मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. तसेच मुला- मुलींचे जमत नाही म्हणून घटस्फोटाचे प्रमाणही जास्त आहे.यासंदर्भात योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून औरंगाबादेत लवकरच एक शिबीर घेण्यात येणार आहे. त्याआधी २४ डिसेंबर रोजी नाशिक येथे असे शिबीर होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद