शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कर्ज घेऊ पण जायकवाडीच्या कालव्याची दुरुस्ती करू : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 7:20 PM

जायकवाडीचा उजवा कालवा १३२ कि.मी. आणि डावा कालवा २०८ कि.मी.चा आहे. या कालव्यांची अवस्था खराब झालेली आहे.

औरंगाबाद : जायकवाडीचे ( Jayakwadi Dam ) दोन्ही कालवे दुरस्त करण्यासाठी ३ हजार कोटींपर्यंत खर्च आला तरी चालेल. जागतिक बँकेकडून कर्ज घेऊ, परंतु दोन्ही कालवे आधुनिक पध्दतीने बांधू, असा विश्वास व्यक्त करीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी पाणीपट्टीचे प्रमाण वाढविण्याच्या आणि पाणीवाटपात पारदर्शकपणा आणण्याच्या सूचना रविवारी संबंधित यंत्रणेला केल्या. ते एमजीएम येथील कार्यक्रमात बोलत होते.

जलसंपदा मंत्री पाटील म्हणाले, जायकवाडीचा उजवा कालवा १३२ कि.मी. आणि डावा कालवा २०८ कि.मी.चा आहे. या कालव्यांची अवस्था खराब झालेली आहे. अनेक ठिकाणची पाणी वितरण परिस्थिती वाईट झालेली आहे. जायकवाडी धरणाचे दोन्ही कालवे अत्याधुनिक करणे, आहे ती गळती बंद करणे, त्याला आधुनिक स्वरूप देणे, पाणी वाटप पारदर्शक करण्यासाठी सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे. दोन्ही कालव्यांचे सर्वेक्षण करून आधुनिक पद्धतीने हे काम होणार आहे. परंतु वापरलेल्या पाण्याची पट्टी येणेदेखील गरजेचे आहे. फक्त १६ टक्के पाणीपट्टी वसुली होत आहे. जायकवाडी धरण निम्म्यावर येते, तरी वसुली होत नाही. पाणीवाटप कार्यक्षमतेने होते, तसेच वसुलीदेखील व्हावी. कालवे दुरुस्त होईपर्यंत पाणी वाटपात पारदर्शीपणा आणावा लागेल.

‘ब्रम्हगव्हाण’ ला मान्यता देणारदोन आठवड्यात मंत्रिमंडळासमोर जाईल. सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव जाणे गरजेचे आहे. असे पाटील म्हणाले. १ हजार कोटींची सुधारीत मान्यता ब्रम्हगव्हाणसाठी असणार आहे. असे जलसंपदा मंत्री पाटील यांनी सांगितले.

५० टक्क्यांपेक्षा कमी सिंचनजायकवाडीच्या कालव्यांना गळती लागल्यामुळे ५० टक्के पाणी सिंचनाला मिळते आहे. ३२०० क्युसेसची कालव्यांची क्षमता आहे. १२०० क्युसेस पाणीदेखील त्यातून शेवटच्या घटकापर्यंत पोहचत नाही. दरवर्षी १०० ते ५० कोटी डागडुजीला देऊन वेळ मारून नेली जाते. असे करीत राहिलो तर ५० वर्षांतही कालवे दुरुस्त होणार नाही, असे आ. सतीश चव्हाण प्रास्ताविकात म्हणाले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणJayant Patilजयंत पाटीलAurangabadऔरंगाबाद