शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

'चालू द्या तुमची मजा, आमचीही मजा';रस्ते दुरवस्थेबद्दल अधिकाऱ्यांच्या वर्तनावर खंडपीठ संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 19:35 IST

रस्त्यांच्या दुरवस्थेकडे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात.

औरंगाबाद : शहरातील रस्त्यांचे वारंवार डांबरीकरण अथवा सिमेंटीकरण करणे आणि अल्पावधीतच त्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या दुष्टचक्राबाबत खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. अरुण पेडणेकर यांनी सोमवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. अशा रस्त्यांच्या कंत्राटदारांना ‘देखभाल दुरुस्ती कालावधी ’ (डीएलपी) दरम्यान बिलाचे पैसे अदा करू नका, असे स्पष्ट निर्देश खंडपीठाने दिले आहेत.

रस्त्यांच्या दुरवस्थेकडे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. खराब रस्त्याचे काम संबंधित कंत्राटदाराकडून करून घेण्याची माझीही जबाबदारी आहे, याची त्यांना जाणीवच नाही. ‘चालू द्या तुमची मजा आणि आमचीही मजा’ अशा आविर्भावात अधिकारी आणि कंत्राटदारांचे बेजबाबदार वर्तन चालू असते. अशा कंत्राटदारांना ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकण्याबाबत विचार केला जाईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

सिमेंटीकरण केलेल्या रस्त्याचा निर्धारित कालावधी ५ वर्षे तर डांबरीकरण केलेल्या रस्त्याचा निर्धारित कालावधी ३ वर्षे असतो. त्याला ‘दोष दायित्व कालावधी’ म्हणजे देखभाल दुरुस्तीचा कालावधी (डीएलपी) म्हणतात. या कालावधी दरम्यान नवीन रस्त्याच्या देखभालीची आणि रस्ता खराब झाल्यास त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराचीच असते.

शहराच्या हद्दीतील सा. बां.च्या अखत्यारीतील सिडको बसस्थानक ते हर्सूल टी-पॉइंट, महावीर चौक ते दिल्ली गेट ते हर्सूल टी-पॉइंट, मिल कॉर्नर-बीबीका मकबरा ते औरंगाबाद लेणी, नगर नाका ते दौलताबाद टी-पॉइंट, नगर नाका-महावीर चौक-चिकलठाणा विमानतळापर्यंत जालना रस्ता आणि केंब्रिज स्कूल, चिकलठाणा ते सावंगी बायपास या ६ रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम चालू असल्याचा अहवाल खंडपीठात सादर करण्यात आला. यातील बहुतांश रस्ते नुकतेच तयार केलेले असून त्यांच्याच दुरुस्तीचे काम सुरू आहे. गोलवाडी येथील रेल्वे उड्डाणपुलालगतच्या रस्त्यांचे काम ३० जानेवारी २०२३ पर्यंत पूर्ण करावयाचे होते. आता हे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाईल. पीडब्ल्यूडीतर्फे रस्त्यांची दुरुस्ती १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण केली जाईल, असे निवेदन ॲड. सुजीत कार्लेकर यांनी केले.

खड्ड्यांची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर टाकायाचिकाकर्ता ॲड. रुपेश जैस्वाल यांनी शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी ‘आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत’ जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदार धरलेले केरळ उच्च न्यायालयाचे निकालपत्र खंडपीठात सादर करून तसाच आदेश देण्याची विनंती केली. याबाबत पुढील सुनावणीवेळी विचार करू, असे खंडपीठाने सूचित केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ