शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सुशिक्षितांचे बेजबाबदार वर्तन; मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तब्बल २३ हजार मते ठरली बाद

By सुमेध उघडे | Updated: December 4, 2020 12:58 IST

Marathwada Graduate Constituency Election : मतपत्रिकेवर चुकीचा पसंती क्रम, सह्या, खुणा, मजकूर, घोषणा लिहिलेला आढळून आल्याने मतदान बाद ठरविण्यात आले 

ठळक मुद्देमहाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना पहिल्या पसंतीचे १ लाख १६ हजार ६३८ मते मिळाली दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे शिरीष बोराळकर राहिले . त्यांना ५८ हजार ७४३ मते पडली. तिसऱ्या क्रमांकावर २३ हजार ०९२ अवैध मते होती.

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तब्बल २३ हजार मते बाद ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. पदवीधरसाठी नाव नोंदणी केलेल्या ३ लाख ७३ हजार १६६ पैकी २ लाख ४० हजार ७९६ मतदारांनी मतदान केले होते. यातील ९.५ टक्के मते बाद ठरली आहेत. यामुळे पदवीधरांच्या या निवडणुकीत मतदान करताना सुशिक्षितांचे बेजबाबदार वर्तन दिसून आले. 

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत झालेल्या मराठवाडा पदवीधर निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार अशी चर्चा होती. मात्र मतदारांनी 'सच' का साथ देत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना पहिल्या पसंतीचे १ लाख १६ हजार ६३८ मते देत ५७ हजार ८९५ मतांनी विजयी केले आहे. दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे शिरीष बोराळकर राहिले . त्यांना ५८ हजार ७४३ मते पडली. लक्षणीय बाब म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर २३ हजार ०९२ अवैध मते होती. म्हणजेच एकूण मतदान झालेल्या २ लाख ४० हजार ७९६ मतांमध्ये ९.५ टक्के मते बाद ठरली आहेत. मतमोजणीच्या पोस्टल मतांच्या फेरीपासून पाचही फेऱ्यांमध्ये अवैध मतांची संख्या मोठी होती. मतपत्रिकांवर चुकीचे पसंती क्रम टाकणे, सह्या करणे यासह मराठा आरक्षण मागणी, अनुदान मागणी अशा घोषणा लिहिलेल्या आढळून आल्या आहेत. यामुळे ही मते बाद ठरविण्यात आली. 

पहिल्या चार फेऱ्यांमध्ये ५ हजाराच्यावर मते अवैध सुरुवातीला १०७३ पोस्टल मतांची मोजणी सुरु झाली. यातील १ हजार ४४ मते वैध तर २९ मते अवैध ठरली. यानंतर ५६ हजार १ मतांच्या पहिल्या फेरीत ५ हजार ३८१, ५६ हजार मतांच्या दुसऱ्या फेरीत ५ हजार २६०, ५६ हजाराच्या तिसऱ्या फेरीत ५ हजार ३७४, ५६ हजार मतांच्या चौथ्या फेरीत ५ हजार ३४४ आणि १६ हजार ८३४ मतांच्या पाचव्या फेरीत १ हजार ७०४ मते बाद ठरली. एकूण मतदानाच्या ९. ५ टक्के मते बाद झाली आहेत.   

अशी झाली मतमोजणी प्रक्रियासकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होताच सर्व मतपेट्यांमधील मतपत्रिका या एका दहा बाय दहाच्या मिक्सिंग ड्रममध्ये टाकण्यात आल्या. त्यानंतर दोन सभागृहांमध्ये प्रत्येकी २८ टेबलवर २५ मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे मोजणी करण्यात येत आहे. हे करीत असतानाच वैध मतपत्रिका काढण्यात आल्या. त्यानंतर ३५ उमेदवारांच्या पसंतीनुसार मतपत्रिका पिजन बॉक्समध्ये वर्ग करण्यास येतात. मतमोजणीच्या एकूण पाच फेऱ्या झाल्या. त्यामध्ये वैध मतांची बेरीज करून पहिल्या पसंतीच्या मतानुसार विजयी होण्यासाठी कोटा ठरविण्यात आला. वैध मतांच्या संख्येला दोनने भागून त्यात १ अधिक केल्यानंतर जी संख्या येईल, ती संख्या विजयासाठी कोटा म्हणून निश्चित करण्यात येते.

टॅग्स :ElectionनिवडणूकMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद