शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लग्नसराईत कायदा पायदळी; नवरीच मिळत नसल्यामुळे २४ वर्षांनी लहान मुलीसोबत विवाहाचा घाट

By राम शिनगारे | Updated: May 24, 2023 16:19 IST

बालकल्याण समितीसमोर १५ दिवसात ११ बालविवाहाची प्रकरणे सादर

छत्रपती संभाजीनगर : सध्या सगळीकडे लग्नाची धूम सुरू आहे. त्यात अल्पवयीन मुलींचे लग्न आई-वडील लावून देत असल्याचे समोर येत आहे. बालकल्याण समितीसमोर मागील १५ दिवसांमध्ये ११ बालविवाह रोखल्याची प्रकरणे सादर झाली. त्यात एका विवाहात नवरीचे वय १६, तर नवरदेव ४० वर्षांचा प्रौढ होता. ४० वर्षांच्या जरठ प्रौढास लग्नासाठी मुलगीच मिळत नसल्यामुळे त्याने गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलीला शोधून लग्नाचा घाट घातल्याचे बालकल्याण समितीच्या चौकशीत समोर आले आहे.

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६नुसार मुलीचे वय १८ आणि मुलाचे २१ वर्षे होणे आवश्यक आहे. दोघांपैकी एकाचेही वय पूर्ण झालेले नसेल तर लग्न बेकायदेशीर ठरते. त्यात दोन वर्षांची शिक्षा आणि एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे. सध्या लग्नसराई असल्यामुळे पोलिस, बालविकास अधिकारी, बालकल्याण समिती दक्ष आहेत. बालविवाहाची माहिती मिळताच संबंधित ठिकाणी पोलिसांसह इतर विभागांचे अधिकारी जाऊन बालविवाह रोखतात. त्यानंतर संबंधितांना बालकल्याण समितीसमोर हजर करावे लागते. मागील १५ दिवसात बालकल्याण समितीसमोर बालविवाहाची ११ प्रकरणे आली. यातील सर्वच मुलींचे वय १८ वर्षांखालील होते, अशी माहिती बालकल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. आशा शेरखाने - कटके यांनी दिली.

दोघांमध्ये १२ ते १५ वर्षांचे अंतररोखलेल्या बालविवाहात नवरा आणि नवरीत सरासरी १२ ते १५ वर्षे एवढे वयाचे अंतर होते. नवरीचे सरासरी वय १६ असून, होणारा पती हा ३० वर्षांचा असल्याचेही स्पष्ट झाले.

गरिबी हेच मुख्य कारण१८ वर्षांच्या आत मुलीचा विवाह लावून जबाबदारीतून मुक्त होण्याची घाई आई - वडिलांना झालेली असते. त्यात गरिबी, मुलींची सुरक्षितता, पालकांचा अशिक्षितपणा ही विवाहाची मुख्य कारणे आहेत.

बालविवाहाची माहिती कळवाबालविवाह राेखल्यानंतर वधू - वरांच्या आई - वडिलांना बालकल्याण समितीसमोर बोलवले जाते. त्यांना विश्वासात घेऊन बालविवाहाचे धोके सांगण्यात येतात. मुलीचा बालविवाह केल्यास तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तिचे सर्व प्रकारे शोषण होते. अल्पवयातच अपत्य होण्याच्या शक्यतेमुळे मुलीच्या जिवालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोठेही बालविवाह होत असेल तर समितीला कळवावे.-ॲड. आशा शेरखाने-कटके, अध्यक्षा, बालकल्याण समिती

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारी