शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

‘भाजप सरकार चले जाव’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 17:19 IST

राष्ट्रवादी शहर जिल्हा अध्यक्ष विजय साळवे यांच्या नेतृत्वात गुरूवारी दुपारी गुलमंडी येथे  ‘भाजप सरकार चलेजाव’  आंदोलन  करण्यात आले.

औरंगाबाद : राष्ट्रवादी शहर जिल्हा अध्यक्ष विजय साळवे यांच्या नेतृत्वात गुरूवारी दुपारी गुलमंडी येथे  ‘भाजप सरकार चलेजाव’  आंदोलन  करण्यात आले. या आंदोलनाला राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशातील जनतेचा विश्‍वासघात केला असल्याने या केंद्र शासनाने सत्तेवर राहण्याचा हक्क पूर्णपणे गमावला असल्याचे विजयराव साळवे यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, समाजात अविश्‍वासाची भावना दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. महिला तसेच गोरगरीबांवर रोज अत्याचार होत आहे. देशातील केंद्र शासन तसेच भाजपा पक्षाच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारे जनतेच्या हक्कासाठी काही न करता जनतेवर हुकुमशाही पद्धतीने दडपशाही करीत आहे. बेरोजगार युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने या युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्य येऊन ते नाईलाजाने गुन्हेगारी व देशविघातक कृत्यांकडे वळत आहेत.

देशातील कायदा सुव्यवस्था, न्याय व्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली असल्याने केंद्र शासनाच्या विरुद्ध ‘भाजपा सरकार चले जाव’ हे आंदोलन करण्यात येत असल्याचे साळवे यांनी नमूद केले. कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, सरचिटणीस सलीम शेख, पूर्व विधानसभा कार्याध्यक्ष अय्युबखान, उपाध्यक्ष रफीक शेख, हरषद पाटील, महिला जिल्हाध्यक्ष छाया यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्याची व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :agitationआंदोलनBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAurangabadऔरंगाबाद