शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

९०० मिमी जलवाहिनीला लिकेज; कंत्राटदाराने गाठला निकृष्टतेचा कळस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 12:12 IST

२०० कोटी रुपये खर्चून टाकण्यात आलेल्या २०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून गेवराई गाव येथे पाणी वाहत आहे.

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तब्बल २०० कोटी रुपये खर्चून जायकवाडी ते फारोळा पर्यंत ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी आठ महिन्यांपूर्वी टाकली. आता या जलवाहिनीला ठिकठिकाणी लिकेज असल्याचे उघडकीस येत आहे. जलवाहिनीचे जॉइंट व्यवस्थितपणे जोडण्यात आले नसल्याचे समोर येत आहे.

२,७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत शहराला पुरेसे पाणी मिळावे, या उदात्त हेतूने २०० कोटी रुपयांची जलवाहिनी अत्यंत घाईघाईत टाकण्यात आली. या जलवाहिनीतून शहराला ७५ एमएलडी पाणी मिळेल, असा दावा करण्यात आला होता. प्रत्यक्षात सहा महिन्यांपासून फक्त १८ ते २० एमएलडी पाणी येत आहे. सध्या ही जलवाहिनी टाकून शहराला फारसा दिलासा मिळालेला नाही. या जलवाहिनीसाठी २६ एमएलडी क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र फारोळा येथे तयार करण्यात येत आहे. दोन वर्षे होत आली तरी जलशुद्धीकरणाचे काम काही होईना. कंत्राटदाराला वारंवार मुदतवाढ दिल्यानंतरही हे काम होत नाही. त्यातच आता जलवाहिनीच्या गुणवत्तेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. गेवराई गाव येथे जलवाहिनीला लिकेज असल्याचे उघडकीस आले. त्यातून पाणी वाहत आहे. जलवाहिनी बंद केल्यावर दूषित पाणी पुन्हा त्यात जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अद्याप जलवाहिनी मनपाकडे हस्तांतरित केली नाही.

जलवाहिनीवर फक्त १ पंप सुरूमागील सहा महिन्यांपासून जलवाहिनीवर सध्या एकच पंप चालविण्यात येत आहे. त्यातून १८ ते २० एमएलडी पाणी जलवाहिनीतून येत आहे. जेव्हा तीन पंप सुरू करून ७५ एमएलडी पाणी जलवाहिनीतून आणण्याचे काम सुरू होईल, तेव्हा अनेक ठिकाणी जलवाहिनी फुटणार हे निश्चित. या जलवाहिनीचे जॉइंट अत्यंत कमकुवत दर्जाचे आहेत. फक्त एक पाईप दुसऱ्या पाईपमध्ये अडकवून सोडून देण्यात आले. प्रत्येक जॉइंट व्यवस्थित बसविला नसल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाWaterपाणीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर