शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

९०० मिमी जलवाहिनीला लिकेज; कंत्राटदाराने गाठला निकृष्टतेचा कळस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 12:12 IST

२०० कोटी रुपये खर्चून टाकण्यात आलेल्या २०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून गेवराई गाव येथे पाणी वाहत आहे.

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तब्बल २०० कोटी रुपये खर्चून जायकवाडी ते फारोळा पर्यंत ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी आठ महिन्यांपूर्वी टाकली. आता या जलवाहिनीला ठिकठिकाणी लिकेज असल्याचे उघडकीस येत आहे. जलवाहिनीचे जॉइंट व्यवस्थितपणे जोडण्यात आले नसल्याचे समोर येत आहे.

२,७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत शहराला पुरेसे पाणी मिळावे, या उदात्त हेतूने २०० कोटी रुपयांची जलवाहिनी अत्यंत घाईघाईत टाकण्यात आली. या जलवाहिनीतून शहराला ७५ एमएलडी पाणी मिळेल, असा दावा करण्यात आला होता. प्रत्यक्षात सहा महिन्यांपासून फक्त १८ ते २० एमएलडी पाणी येत आहे. सध्या ही जलवाहिनी टाकून शहराला फारसा दिलासा मिळालेला नाही. या जलवाहिनीसाठी २६ एमएलडी क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र फारोळा येथे तयार करण्यात येत आहे. दोन वर्षे होत आली तरी जलशुद्धीकरणाचे काम काही होईना. कंत्राटदाराला वारंवार मुदतवाढ दिल्यानंतरही हे काम होत नाही. त्यातच आता जलवाहिनीच्या गुणवत्तेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. गेवराई गाव येथे जलवाहिनीला लिकेज असल्याचे उघडकीस आले. त्यातून पाणी वाहत आहे. जलवाहिनी बंद केल्यावर दूषित पाणी पुन्हा त्यात जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अद्याप जलवाहिनी मनपाकडे हस्तांतरित केली नाही.

जलवाहिनीवर फक्त १ पंप सुरूमागील सहा महिन्यांपासून जलवाहिनीवर सध्या एकच पंप चालविण्यात येत आहे. त्यातून १८ ते २० एमएलडी पाणी जलवाहिनीतून येत आहे. जेव्हा तीन पंप सुरू करून ७५ एमएलडी पाणी जलवाहिनीतून आणण्याचे काम सुरू होईल, तेव्हा अनेक ठिकाणी जलवाहिनी फुटणार हे निश्चित. या जलवाहिनीचे जॉइंट अत्यंत कमकुवत दर्जाचे आहेत. फक्त एक पाईप दुसऱ्या पाईपमध्ये अडकवून सोडून देण्यात आले. प्रत्येक जॉइंट व्यवस्थित बसविला नसल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाWaterपाणीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर