शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
3
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
4
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
5
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
6
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
7
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
8
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
9
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
10
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
11
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
12
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
13
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
14
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
15
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
16
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
17
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
18
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
19
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
Daily Top 2Weekly Top 5

लातूरकरांना ‘लिंबोटी’ची आस !

By admin | Updated: August 3, 2014 01:16 IST

आशपाक पठाण , लातूर लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पातील पाणीसाठा अपुरा पडत आहे़

 

आशपाक पठाण , लातूरलातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पातील पाणीसाठा अपुरा पडत आहे़ गेल्या पाच वर्षांपासून लातूरकरांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे़ विकासाच्या मार्गावर असलेल्या शहराला पाणीटंचाई बाधा ठरत आहे़दरवर्षी पाण्यासाठी ओरड होत असल्याने यंदा महानगरपालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी नांदेड जिल्ह्यातील लिंबोटी धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी ३३४ कोटींचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे़ मात्र, जवळपास ९० किलोमीटरची योजना पुर्णत्वास येणार की नाही? यावर शंका व्यक्त केली जात आहे़पाणीटंचाईमुळे शहराच्या विकासाची गती थंडावलेली आहे़ नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची तारांबळ सुरू आहे़ ५ लाखांवर लोकसंख्या असलेल्या शहराला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे़ गेल्या दोन वर्षांपासून पावसाळ्यातही शहराला आठवड्यातून एकवेळा पाणीपुरवठा करण्यात आला आहे़ आता महिन्यातून एकवेळा पाणीपुरवठा करण्याची वेळ आल्याने लातूरच्या पाणीप्रश्नांवर प्रशासन यावर्षी सतर्क झाले आहे़ त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनाही यावर्षी टंचाईच्या झळा लागल्याने पर्यायी पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत़ मात्र, लोहा तालुक्यातील लिंबोटी येथून जवळपास ९० किलोमीटरचे अंतर असलेल्या या योजनेचा प्रस्ताव पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवाकडे १४ जुलै रोजी पाठविण्यात आला आहे़ सध्या मनपा व एमजेपीने कच्चा आराखडा तयार प्रस्ताव दिला असून राज्य शासनाकडून यावर काय निर्णय त्यावर पुढील भूमिका ठरणार आहे़ लातूर शहराची भविष्य काळातील गरज पाहता सदर पूरक पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान किंवा केंद्र शासनाच्या योजनेतून मंजूर करावा, अशी मागणी केली आहे़ तीन वर्षांपासून टंचाईच्या झळा़़़लातूर शहराची पाण्याची गरज लक्षात घेऊन विविध टप्प्यात योजना राबविण्यात आल्या आहेत़ त्यात साई व नागझरी येथील मांजरा नदीवरील बंधाऱ्यावरून २००५ मध्ये योजना कार्यान्वित करण्यात आली़ मांजरा धरण क्षेत्रात गेल्या तीन वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली नाही़ परिणामी, लातूरकरांना पाण्यासाठी दरवर्षी उन्हाळ्यात भटकंतीची वेळ आली आहे़ नळाला येणारे पाणी अपुरे असल्याने विकतचे पाणी पिण्याची वेळ आली आहे़ तीन वर्षांपासून झळा सहन करणाऱ्या लातूरकरांना आता मात्र लिंबोटीचा झरा दाखविण्यात येत आहे.

नुसतीच अपेक्षा..लातूर शहरासाठी शाश्वत व शहराची पाण्याची गरज लक्षात घेता मोठ्या क्षमतेचा व नजीकचा पर्याय म्हणून लिंबोटी जलसिंचन प्रकल्पाशिवाय मनपाकडे पर्याय सध्यातरी उपलब्ध नाही़ त्यामुळे नांदेड जिल्ह्यातून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे़ लिंबोटीच्या पाण्यावर लातूरकरांनी आस ठेवली आहे़ मात्र, प्रकल्पाला शासनाची मान्यता मिळणे व त्यानंतर नांदेडकरांकडून होकार मिळणे, यावर प्रकल्पाचे भविष्य अवलंबून आहे़ सध्या तरी प्रशासनाने लातूरकरांना लिंबोटीच्या पाण्याची आस दाखविली आहे़