हागणदारीमुक्तीत लातूर मराठवाड्यात प्रथम
By Admin | Updated: July 3, 2016 00:32 IST2016-07-02T23:54:25+5:302016-07-03T00:32:09+5:30
लातूर : जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता विभागांतर्गत स्वच्छ भारत मिशन अभियान राबविण्यात येते़ या अभियानांतर्गत जिल्ह्यातील

हागणदारीमुक्तीत लातूर मराठवाड्यात प्रथम
लातूर : जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता विभागांतर्गत स्वच्छ भारत मिशन अभियान राबविण्यात येते़ या अभियानांतर्गत जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतीपैकी आतापर्यंत २०४ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत़ मराठवाड्यात लातूर जिल्ह्याचा हागणदारीमुक्तीमध्ये प्रथम क्रमांक आला आहे़
लातूर जिल्ह्यात प्रारंभीच्या काळात संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत २००५ ते २०१२ पर्यंत स्वच्छतेसंदर्भातील विविध उपक्रम राबवून ग्रामीण भागात स्वच्छता जपण्याचे काम जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशनअंतर्गत करण्यात आले़ पुढे या अभियानात बदल होऊन २०१२ ते २०१४ कालावधीत निर्मल भारत अभियान म्हणून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली़
तर २ आॅक्टोबर २०१४ पासून नरेंद्र मोदी यांनी मिशन स्वच्छ भारत ही मोहीम नव्याने कार्यान्वित केली़ या मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना शौचालयाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान देऊन शौचालयाची कामे हाती घेतली़ तसेच ग्रामीण भागातील स्वच्छता जपण्यासाठी हागणदारीमुक्त चळवळ गतीमान केली़ या चळवळीत जनसामान्यांचा सहभाग वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने ग्रामीण भागात स्वच्छता अभियान कार्यक्षमपणे राबविण्यासाठी प्रभातफेऱ्या, पथनाट्य, जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले़ तसेच प्रबोधनात्मक प्रकाशित साहित्यही लोकापर्यंत वाटण्यात आले़ ग्रामीण भागातील नागरिकांनी आपले आरोग्य चांगले रहावे यासाठी या स्वच्छतेचे महत्व ओळखून या अभियानात सहभाग घेतला़
घरोघरी शौचालय ही संकल्पना राबवून नागरिकांनी शौचालयाचा वापर करावा ही मानसिकता ग्रामीण भागातील नागरिकांची बनविली़ त्याअंतर्गत नागरिकांनी टंचाईच्या काळातही घरोघरी शौचालये बांधली़ त्यामुळे जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतीपैकी २०४ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्यात यश आले आहे़ परिणामी मराठवाड्याच्या तुलनेत लातूर जिल्हा आघाडीवर आहे़
नांदेड जिल्ह्यात १३०८ ग्रामपंचायतीपैकी ६० हागणदारीमुक्त झाल्या आहेत़ उस्मानाबाद ६२२ पैकी ५२, औरंगाबाद ८५६ पैकी ७५, जालना ७७६ पैकी ४०, बीड १०२० पैकी ९१, परभणी ७०४ पैकी ११६, हिंगोली ५६५ पैकी ३८ झाल्या आहेत़
हागणदारीमुक्त ग्रामपंचायती़़़
४अहमदपूर ४७, औसा ३४, चाकूर २१, देवणी ११, जळकोट ११, लातूर १३, निलंगा २७, रेणापूर २३, शिरूर अनंतपाळ १२, उदगीर ५़ अहमदपूर तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतीपैकी ४७ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत़ जिल्ह्यातील भविष्यात सर्व ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्यासाठी मिशन स्वच्छ भारतअंतर्गत पाणी व स्वच्छता विभागांतर्गत काम सुरू आहे़