शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

नारेगाव ग्रामस्थांची कचरा डेपोसाठी औरंगाबाद मनपास  अखेरची मुदतवाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 6:31 PM

नारेगाव भागातील शेतकर्‍यांनी कचर्‍याच्या प्रश्नावर महापालिकेला आता अखेरची एक महिना मुदतवाढ दिली आहे. १६ फेबु्रवारीनंतर एकही ट्रक नारेगाव कचरा डेपोवर येऊ देणार नाही, अशी भूमिका रविवारी शेतकर्‍यांनी मांडकी येथील मारुती मंदिरात घेतली.

ठळक मुद्दे कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने मागील तीन महिन्यांमध्ये कोणताच ठोस निर्णय घेतला नाही. परदेश वार्‍या आणि विविध महापालिकांनी सुरू केलेले प्रकल्प पाहण्यातच प्रशासन दंग आहे. १६ फेबु्रवारीनंतर एकही ट्रक नारेगाव कचरा डेपोवर येऊ देणार नाही, अशी भूमिका रविवारी शेतकर्‍यांनी घेतली

औरंगाबाद : नारेगाव भागातील शेतकर्‍यांनी कचर्‍याच्या प्रश्नावर महापालिकेला आता अखेरची एक महिना मुदतवाढ दिली आहे. १६ फेबु्रवारीनंतर एकही ट्रक नारेगाव कचरा डेपोवर येऊ देणार नाही, अशी भूमिका रविवारी शेतकर्‍यांनी मांडकी येथील मारुती मंदिरात घेतली. कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने मागील तीन महिन्यांमध्ये कोणताच ठोस निर्णय घेतला नाही. परदेश वार्‍या आणि विविध महापालिकांनी सुरू केलेले प्रकल्प पाहण्यातच प्रशासन दंग आहे.

१९८३-८४ पासून महापालिका नारेगाव येथील गट नं. ७८, ७९ मधील ४४ एकर जागेवर कचरा टाकत आहे. मागील ३४ वर्षांमध्ये महापालिकेने कचर्‍यावर प्रक्रिया करणारा कोणताही प्रकल्प सुरू केला नाही. एक प्रकल्प सुरू केला होता, तो अल्पावधीतच बंद पडला. सध्या नारेगावात २० हजार टनांपेक्षा जास्त कचरा साचलेला आहे. कचर्‍याच्या दुर्गंधीमुळे पंचक्रोशीतील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहेत. कचर्‍यामुळे चिकलठाणा विमानतळाच्या व्यवस्थापनाने विमान धावपट्टीवर उतरताना, उड्डाण घेताना पक्ष्यांचा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार केली होती. दूषित कचर्‍यामुळे नारेगाव व आसपासच्या गावांमधील पिण्याचे पाणी दूषित होत असल्याची तक्रार प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली आहे. आठ वर्षांपूर्वी खंडपीठानेही कचरा डेपो दुसरीकडे न्यावा, असे आदेश महापालिकेला दिले आहेत. मात्र, आजपर्यंत महापालिकेने यासंदर्भात कोणतेच ठोस पाऊल उचलले नाही.

ठोस निर्णय नाहीनारेगावच्या शेतकरी आंदोलनाला तीन महिने होत आले तरी मनपाने कोणताच ठोस निर्णय घेतला नाही. चीन दौरा, मुंबई दौरा करण्यात आला. प्रभागनिहाय कचर्‍यावर प्रक्रिया करणे, नारेगाव येथील कचरा नष्ट करण्यासाठी कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

तीन दिवस आंदोलन१३ आॅक्टोबर २०१७ रोजी कचरा डेपोच्या विरोधात अनेक गावांतील  शेतकर्‍यांनी उपोषण केले होते. याचा परिणाम म्हणून तीन दिवस महापालिकेची एकही गाडी नारेगाव कचरा डेपोवर येऊ शकली नव्हती. १५ आॅक्टोबर रोजी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मध्यस्थी करून तीन महिन्यांची मुदत मनपाला दिली. उद्या १६ जानेवारीर रोजी ही मुदत संपत आहे.

संक्रांतीच्या दिवशी निर्णयरविवारी कचरा डेपो हटाव आंदोलन समितीची एक बैठक मांडकी येथील मारुती मंदिरात घेण्यात आली. बैठकीत सर्वानुमते मनपाला आणखी एक महिन्याची मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. १६ फेब्रुवारीनंतर महापालिकेची वाहने कचरा डेपोत न येऊ देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी भाऊसाहेब गायके, डॉ. विजय डक, विष्णू भेसर, राजू भेसर, रावसाहेब चौथे आदींसह पदाधिकारी हजर होते.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद