शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते, पुण्यात येऊन फडणवीसांचा दिखावा'; रवींद्र धंगेकरांचा आरोप
2
ज्या आजोबांनी बाळाची हमी दिली, त्यांचे छोटा राजनशी कनेक्शन; भावाशी संपत्तीवरून वाद, मित्रावर गोळीबार
3
'१२ वर्षांनी त्यांना जाग आली, माझ्यामुळे त्यांचे अनेक मंत्री घरी गेले'; अण्णा हजारेंचे शरद पवारांना प्रत्युत्तर
4
उपचारासाठी भारतात आलेले बांग्लादेशचे खासदार बेपत्ता; अखेरचं लोकेशन बिहारमध्ये, शोध सुरू
5
“त्यांनी चीन सीमेवर जावे अन् पाहून यावे”; हेमंत बिस्वा सरमा यांचा नाना पटोलेंवर पलटवार
6
Indigo Flight: ऐकावं ते नवल! विमानातही ट्रेनसारखा किस्सा; कन्फर्म सीटवर बसवला 'स्टँडबाय' प्रवासी, प्रकरण काय?
7
अनिर्बंध मुजोरीचा निबंध! मस्तवाल बाळ आणि संवेदनशून्य अधिकाऱ्यांना अद्दल घडवल्याशिवाय असले प्रकार थांबणार नाहीत
8
राजस्थान रॉयल्स ११ दिवस खेळला नाही; RCB च्या आजच्या सामन्यावर सुनिल गावस्करांची भविष्यवाणी
9
Buddha Purnima 2024: भगवान बुद्धांची प्रिय तिथी अर्थात बुद्ध पौर्णिमा कशी साजरी करायला हवी ते जाणून घ्या!
10
मोदी, सहानुभूती अन् जातीचे गणित; विविध मुद्द्यांभोवती फिरली निवडणूक, नेत्यांची अहोरात्र मेहनत तरीही धाकधूक कायम
11
उजनी धरण बॅकवॉटर बोट दुर्घटना; बुडालेल्या सहा जणांची नावे आली समोर; शोध कार्य पुन्हा केले सुरु
12
Paytm Q4 Results: रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचा 'पेटीएम'ला मोठा फटका, निव्वळ तोटा ५५० कोटींवर; महसुलातही मोठी घट
13
त्रिस्तरीय सुरक्षा भेदली, एक इसम थेट EVM ठेवलेल्या ठिकाणी पोहोचला; निलेश लंकेंचा आरोप काय?
14
नातवाला सोडविण्यासाठी आजोबांनी दिली हमी; बाल न्यायालयात १५ तासांत जामीन कसा मंजूर झाला?
15
ऑनलाइन क्रशला भेटायला २४०० किमी दूर पोहचली युवती; त्यानंतर जे घडलं तिने डोक्याला हात लावला
16
पीपीएफ आणि दर महिन्याची ५ तारीख, अचूक टायमिंग लक्षात ठेवा; 1 कोटीचा फंड जमा करू शकाल
17
पेट्रोल, डिझेल GST मध्ये? राज्यांवर बंधने? कसे असेल मोदी ३.० सरकार; प्रशांत किशोर यांनी केले ४ जूननंतरचे भाकीत
18
विशेष मुलाखत : देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी यंदाची निवडणूक अतिशय महत्त्वाची - अखिलेश यादव 
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची जबरदस्त सुरुवात; अल्ट्राटेकमध्ये तेजी, एसबीआय घसरला
20
काँग्रेस अन् भाजपने उद्योगपतींच्या फायद्याची धोरणे आखली; बसप अध्यक्षा मायावती यांचा आरोप

जालना रोडचे झाले तळे; नॅशनल हायवे ॲथॉरिटीने केलेला १३ कोटींचा खर्च खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 2:10 PM

Rain in Aurangabad : कनेक्टिव्हिटी नसणे, काम अर्धवट असण्याचा फटका सामान्य औरंगाबादकरांना बसला.

ठळक मुद्देसाइड ड्रेनमधून पाणी वाहून न गेल्याने रोड तुंबला साइड ड्रेन बांधले पण कनेक्टिव्हिटीच दिली नाही

- विकास राऊत

औरंगाबाद : नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (एनएचएआय) जालना रोडवरील साचणारे पाणी वाहून नेण्यासाठी १३ कोटींतून बांधलेल्या साइड ड्रेनचा खर्च खड्ड्यात गेल्याचे मंगळवारी रात्री ( Rain in Aurangabad ) झालेल्या पावसाने सिद्ध केले. साइड ड्रेनमधून पाणी वाहून न गेल्यामुळे पूर्ण रोडवर पाणी तुंबल्याने वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला. शिवाय रोडवर पाणी साचून राहिल्याने वाहने बंद पडली. त्या साइड ड्रेनला पूर्ण कनेक्टिव्हिटी न दिल्यामुळे पाणी रस्त्यावर तुंबल्याची माहिती समोर आली आहे. मुकुंदवाडी, हायकोर्टसमोर, सेव्हन हिल, चिकलठाणा या भागात काम अर्धवट आहे. कनेक्टिव्हिटी नसणे, काम अर्धवट असण्याचा फटका मंगळवारी सामान्य औरंगाबादकरांना बसला. दोन फुटांहून अधिक पाणी रस्त्यावर साचल्यामुळे वाहनचालकांची तारांबळ झाली. ( Lake on Jalna Road in Aurangabad; 13 crore spent by National Highway Authority in the pit) 

दीड वर्षांपासून चिकलठाणा ते महावीर चौकापर्यंत जालना रोडच्या दोन्ही बाजूला साइड ड्रेन टाकण्याचे काम सुरू आहे. सृष्टी कन्स्ट्रक्शन प्रा.लि. ही संस्था ते काम करीत आहे. मिळेल त्या जागेत दीड बाय दीड मीटरचे काम कंत्राटदाराने केले आहे. अजूनही ते काम पूर्ण झालेले नाही. कमी पाऊस झाल्यास साइड ड्रेन पूर्ण भरून जाते. त्यामुळे त्यातून पाणी वाहून गेल्याचे दिसते; परंतु मंगळवारी झालेल्या पावसाने त्या कामाचे पितळ उघडे पाडले. जालना रोडवर कुठेही कनेक्शन न दिल्यामुळे त्यातून पाणी वाहून गेलेच नाही. रस्त्यावरील पाणी रोडच्या डाव्या बाजूंनी असलेल्या उतारावरून नागरी वसाहतींकडे वळले. त्यामुळे नवीन शहरातील अनेक भागांत पाणी तुंबले.

एनएचएआयचा दावा असाएनएचएआयच्या सूत्रांनी दावा केला की, साइड ड्रेनचे काम पूर्ण होत आले आहे. कमी पाऊस झाला तेव्हा पूर्ण पाणी गेले. मंगळवारी रात्री पावसाचा जोर जास्त होता, त्यामुळे पाणी जाऊ शकले नाही. कनेक्टिव्हिटी न दिल्यामुळे त्या ड्रेन पूर्ण क्षमतेने काम करीत नाहीत. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठीच त्या साइड ड्रेन बांधलेल्या आहेत. त्याला इतर कुठलीही कनेक्टिव्हिटी दिलेली नाही. १८ महिन्यांत काम संपण्याची मुदत आहे. जमिनीखाली इतर युटिलिटी खूप आहेत. त्यामुळे कामाला उशीर होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा - महापालिका अगोदरच आर्थिक संकटात, त्यात तिसऱ्या लाटेचा आर्थिक भार

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसhighwayमहामार्ग