शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जालना रोडचे झाले तळे; नॅशनल हायवे ॲथॉरिटीने केलेला १३ कोटींचा खर्च खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 14:23 IST

Rain in Aurangabad : कनेक्टिव्हिटी नसणे, काम अर्धवट असण्याचा फटका सामान्य औरंगाबादकरांना बसला.

ठळक मुद्देसाइड ड्रेनमधून पाणी वाहून न गेल्याने रोड तुंबला साइड ड्रेन बांधले पण कनेक्टिव्हिटीच दिली नाही

- विकास राऊत

औरंगाबाद : नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (एनएचएआय) जालना रोडवरील साचणारे पाणी वाहून नेण्यासाठी १३ कोटींतून बांधलेल्या साइड ड्रेनचा खर्च खड्ड्यात गेल्याचे मंगळवारी रात्री ( Rain in Aurangabad ) झालेल्या पावसाने सिद्ध केले. साइड ड्रेनमधून पाणी वाहून न गेल्यामुळे पूर्ण रोडवर पाणी तुंबल्याने वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला. शिवाय रोडवर पाणी साचून राहिल्याने वाहने बंद पडली. त्या साइड ड्रेनला पूर्ण कनेक्टिव्हिटी न दिल्यामुळे पाणी रस्त्यावर तुंबल्याची माहिती समोर आली आहे. मुकुंदवाडी, हायकोर्टसमोर, सेव्हन हिल, चिकलठाणा या भागात काम अर्धवट आहे. कनेक्टिव्हिटी नसणे, काम अर्धवट असण्याचा फटका मंगळवारी सामान्य औरंगाबादकरांना बसला. दोन फुटांहून अधिक पाणी रस्त्यावर साचल्यामुळे वाहनचालकांची तारांबळ झाली. ( Lake on Jalna Road in Aurangabad; 13 crore spent by National Highway Authority in the pit) 

दीड वर्षांपासून चिकलठाणा ते महावीर चौकापर्यंत जालना रोडच्या दोन्ही बाजूला साइड ड्रेन टाकण्याचे काम सुरू आहे. सृष्टी कन्स्ट्रक्शन प्रा.लि. ही संस्था ते काम करीत आहे. मिळेल त्या जागेत दीड बाय दीड मीटरचे काम कंत्राटदाराने केले आहे. अजूनही ते काम पूर्ण झालेले नाही. कमी पाऊस झाल्यास साइड ड्रेन पूर्ण भरून जाते. त्यामुळे त्यातून पाणी वाहून गेल्याचे दिसते; परंतु मंगळवारी झालेल्या पावसाने त्या कामाचे पितळ उघडे पाडले. जालना रोडवर कुठेही कनेक्शन न दिल्यामुळे त्यातून पाणी वाहून गेलेच नाही. रस्त्यावरील पाणी रोडच्या डाव्या बाजूंनी असलेल्या उतारावरून नागरी वसाहतींकडे वळले. त्यामुळे नवीन शहरातील अनेक भागांत पाणी तुंबले.

एनएचएआयचा दावा असाएनएचएआयच्या सूत्रांनी दावा केला की, साइड ड्रेनचे काम पूर्ण होत आले आहे. कमी पाऊस झाला तेव्हा पूर्ण पाणी गेले. मंगळवारी रात्री पावसाचा जोर जास्त होता, त्यामुळे पाणी जाऊ शकले नाही. कनेक्टिव्हिटी न दिल्यामुळे त्या ड्रेन पूर्ण क्षमतेने काम करीत नाहीत. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठीच त्या साइड ड्रेन बांधलेल्या आहेत. त्याला इतर कुठलीही कनेक्टिव्हिटी दिलेली नाही. १८ महिन्यांत काम संपण्याची मुदत आहे. जमिनीखाली इतर युटिलिटी खूप आहेत. त्यामुळे कामाला उशीर होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा - महापालिका अगोदरच आर्थिक संकटात, त्यात तिसऱ्या लाटेचा आर्थिक भार

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसhighwayमहामार्ग