शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

पालिका-नागरिकांत समन्वयाचा अभाव !

By admin | Updated: January 18, 2015 00:32 IST

बीड : नगरपालिका व नागरिकांमध्ये समन्वयच नाही. त्यामुळे सुविधा सोयीस्कर होण्याऐवजी अडचणीच्या ठरत आहेत.

बीड : नगरपालिका व नागरिकांमध्ये समन्वयच नाही. त्यामुळे सुविधा सोयीस्कर होण्याऐवजी अडचणीच्या ठरत आहेत. केरकचरा, पाणी यासाठी पालिकेने योग्य नियोजन केले पाहिजे शिवाय नागरिकांनीही जबाबदाऱ्या ओळखायला हव्यात. पालिका व नागरिकांत समन्वय असेल तरच शहराचा गाडा व्यवस्थित चालू शकतो, असा निष्कर्ष ‘लोकमत’च्या वतीने शनिवारी आयोजित केलेल्या परिसंवादात निघाला. अवैध नळजोडण्या घेणाऱ्यांनी वैध करुन घ्याव्यात. स्वत:हून नळजोडण्या घेण्यासाठी पुढे यावे़ पाणीपुरवठा पाच दिवसांवरुन दोन दिवसावर आणण्याचा प्रयोग यापूर्वी केला होता;पण त्यामुळे अधिकच पाणी वाया जाऊ लागले. त्यामुळे हा प्रयोग थांबवावा लागला़- एम़ एस़ वाघ, पाणीपुरवठा अभियंता‘मुलभुत गरजा व समस्या’ या विषयावर आधारित परिसंवादात नगरसेवक अमृत सारडा, पालिकेचे स्वच्छता निरीक्षक युवराज कदम, पाणीपुरवठा अभियंता एम. एस. वाघ, अ‍ॅड. करुणा टाकसाळ, सामाजिक कार्यकर्ते ललित आब्बड, अमर नाईकवाडे, पंकज कुटे, डॉ. अनिल बारकूल यांचा सहभाग होता. ‘लोकमत’ने शहरातील पाणीटंचाई व कचरा हे दोन विषय ‘फोकस’ केले होते. त्यानुषंगाने झालेल्या परिसंवादात व्यवस्थापनापासून ते नागरिकांच्या जबाबदाऱ्या व करावयाचे उपाय यावर मनमोकळी चर्चा झाली. अधिकारी म्हणाले, नागरिकांचे सहकार्य नाही. अवैध नळजोडण्या आहेत. कारवाया करायला गेल्यावर लोेक तलवारी घेऊन अंगावर धावून येतात. नगरसेवक म्हणाले, मनुष्यबळ वाढवून सेवा सुरळीत करण्यात येईल. सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिकेला जबाबदार धरले. कचरा उचलून नेत नाहीत. पाणी पाच दिवसाला दोन तास सोडण्याऐवजी एक दिवसाआड एकच तास सोडावे. वकील, डॉक्टरांनीही पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन नागरिकांच्या जबाबदाऱ्यांवर प्रकाशझोत टाकला.तोट्या नाहीत, वसुलीही कमीपाणीपुरवठा विभागाचे अभियंता एम. एस. वाघ यांनी सांगितले,बीड शहराला २५ एमएलडी पाण्याचीगरज आहे. प्रत्यक्षात २८ एमएलडी पाणी सोडले जाते. तीन एमएलडी पाणी लिकेज व इतर कारणांमुळे वाया जाते. एका कुटुंबाला ६७५ लिटर पाणी देणे आवश्यक आहे;पण त्यापेक्षा जास्त पाणी दिले जाते. कुठे जादा दाबाने पाणी जाते तर कुठे कमी. मात्र, प्रत्येकवेळी पालिकेला दोष देणे उचित नाही. कारण अनेकदा वीज सुरळीत नसते. त्यामुळे पुरवठ्यावर परिणाम होतो. पालिकेकडून लिकेज दुरुस्ती केली जाते. काही ठिकाणी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून लिकेज आहे तसेच ठेवले जातात. फक्त पाणी वाया जाऊ नये म्हणून तोट्या बसविलेल्या आहेत. काळी जण नळाला विद्युतपंप बसवितात. गरजेपुरतेचे पाणी घेतले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.पालिकेकडे नाही नियोजन सामाजिक कार्यकर्ते पंकज कुटे यांनी पालिकेच्या कुचकामी यंत्रणेवर बोट ठेवले. कचरा वेळेवर उचलत नाहीत, घंटागाड्या उशिरा येतात. सकाळी सहा ते आठ या वेळेत महिला साफसफाई करुन कचरा फेकून देतात. काहीवेळा घंटागाड्या सकाळी दहानंतर येतात. तोपर्यंत काही महिला कामावर निघून जातात. घंटागाडी येऊनही उपयोग नाही. (प्रतिनिधी)