शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

लेबर कॉलनीवासीयांनो, आता दोन महिन्यांचा आत घरे रिकामी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2022 14:04 IST

याचिका खंडपीठाने फेटाळली, कोविड महामारीचा विचार करून दोन महिन्यांचा अवधी दिला

औरंगाबाद : औरंगाबादेतील लेबर काॅलनी ही ३३८ घरांची वसाहत जमीनदोस्त/ निष्कासित करण्याच्या नोटिसीला आव्हान देणारी याचिका औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एस. डी. कुलकर्णी यांनी गुरुवारी फेटाळली. मात्र, सध्याच्या कोविड महामारीचा विचार करून खंडपीठाने तेथील रहिवाशांना शासकीय घरे रिक्त करण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी दिला आहे.

१९५२ साली औरंगाबादसह लातूर, बीड, परभणी इ. सहा शहरांमध्ये ‘लेबर कॉलन्या’ उभारण्यात आल्या होत्या. त्यापैकी औरंगाबादेत सुमारे २२ एकर जागेवर ३३८ घरे बांधण्यात आली होती. अतिरिक्त आयुक्तांनी ३१ ऑक्टोबर, २०२१ रोजी लेबर कॉलनीत एका होर्डिंगवर ती मालमत्ता जमीनदोस्त/ निष्कासित करण्याची नोटीस प्रसिद्ध केली होती. त्यामुळे वसाहत जमीनदोस्त/निष्कासित करण्याच्या नोटिसीला कॉलनीतील रहिवाशांनी ॲड. प्रज्ञा तळेकर यांच्यामार्फत खंडपीठात आव्हान दिले होते.

याचिकाकर्त्यांचा युक्तिवादत्या वसाहतीमधील घरांची कुठलीही वैज्ञानिक चाचणी न करताच मालमत्ता निष्कासित करण्याची नोटीस सार्वजनिक ठिकाणी लावली. ही कृती उच्च न्यायालयाच्या यापूर्वी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रकरणात दिलेल्या आदेशाविरुद्ध आहे. वसाहतीबाहेरून केवळ पाहणी करून (व्हिज्युअल ऑब्जर्व्हेशन) त्या आधारे निष्कासनाच्या नोटिसा बजावल्या आहेत. महापालिकेने पावसाळ्यापूर्वी मनपा हद्दीतील सर्व जुन्या इमारतींचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ व वैज्ञानिक चाचणी करूनच कारवाई करणे आवश्यक आहे. १९५२ साली औरंगाबादसह लातूर, बीड, परभणी इ. सहा शहरांमध्ये ‘लेबर कॉलन्या’ उभारण्यात आल्या होत्या. त्यापैकी औरंगाबादेतील लेबर कॉलनीशिवाय इतर पाच शहरांतील घरे राहणाऱ्यांनाच नाममात्र दराने मालकी हक्काने दिल्याचा युक्तिवाद ॲड. तळेकर यांनी केला होता. ती मालमत्ता जमीनदोस्त/निष्कासित करण्याची नोटीस रद्द करा, येथील रहिवाशांची याचिका फेटाळणारा ९९ सालचा आदेश रद्द करा, शासनाने ती मालमत्ता संपादित करून, रहिवाशांना मालकी हक्काने द्यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती.

शासनाचा युक्तिवादशासनातर्फे ज्येष्ठ विधिज्ज्ञ आर. एन. धोर्डे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, लेबर कॉलनी ही शासनाची मालमत्ता आहे. शासनाला त्या जागेची आवश्यकता आहे. तो परिसर महापालिकेच्या हद्दीत असल्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे महापालिकेला पत्र देण्यात आले होते. केवळ जनतेच्या माहितीस्तव सार्वजनिक ठिकाणी नोटीस प्रसिद्ध केली. ती मालमत्ता शासनाच्या मालकीची असल्यामुळे कोणालाही वैयक्तिक नोटीस बजावली नाही. त्यामुळे नोटीस बजावली नसल्याच्या मुद्द्यावर केलेली याचिका दाखल करून घेण्यास योग्य नाही. सबब याचिका फेटाळावी, अशी विनंती त्यांनी केली होती. सुनावणीअंती ३ डिसेंबर २०२१ रोजी खंडपीठाने याचिका निकालासाठी राखून ठेवली होती. गुरुवारी खंडपीठाने आदेश घोषित केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ