शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

'लबाडांनो पाणी द्या' आंदोलनाचा समारोप आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल मोर्चाने

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 13:09 IST

छत्रपती संभाजीनगरातील लबाडांनो पाणी द्या आंदोलनाचा समारोप महापालिकेवर हल्लाबोल मोर्चाने

छत्रपती संभाजीनगर: शहर पाणी प्रश्नावर १३ एप्रिल पासून उद्धवसेनेचे लबाडांनो पाणी द्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनांचा समारोप आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली १६ मे रोजी महापालिकेवर हल्लाबोल माेर्चा नेऊन करण्यात येणार आहे,अशी माहिती विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी गुरूवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

आ. दानवे म्हणाले की, तीन महिन्यात शहराचा पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देणारे भाजप, शिंदेसेना आता गप्प आहे. महापालिकेला ८३० कोटी रुपये कर्ज घेण्यास भाग पाडत आहे. मात्र मनपाची कर्ज फेडण्याची ऐपत नाही. जायकवाडी प्रकल्पात जॅकवेलचे काम केवळ १५ जण करीत आहेत. यावरुन किमान दिड वर्ष तरी जॅकवेलचे काम पूर्ण होणार नाही,असे दिसते. नवीन पाणी पुरवठा योजना हा विषय स्वतंत्र आहे.  आम्ही शहराला उपलब्ध होणाऱ्या १४० एमएलडी पाण्याचे नियोजन नसल्याने शहरवासियांना १२ ते १३ दिवसाआड पाणी मिळते, याकडे मनपाचे लक्ष वेधले. आंदोलनानंतर आज शहरवासियांना ६ ते ७ दिवसाआड पाणी मिळत आहे. १३ एप्रिलपासून सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनात पक्षाचे शेकडो पदाधिकारी सहभागी झाले. शिवाय सामान्य जनतेनेही आमच्या आंदोलनात सहभाग नोंदविल्याचे आ. दानवे म्हणाले.१६ मे रोजी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पैठणगेट येथून महापालिकेवर हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार असल्याचे दानवे यांनी नमूद केले. या पत्रकार परिषदेला पक्षाच्या उपनेत्या ज्योती ठाकरे, अस्मिता गायकवाड, छाया शिंदे , सुनीता देव, सुकन्या भोसले ,बाळासाहेब थोरात,ज्ञानेश्वर डांगे यांची  उपस्थिती होती.

११५ वॉर्डात हल्लाबोल पदयात्रा आणि बैठकाया आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात ९ ते १२मे दरम्यान पक्षाचे पदाधिकारी ११५ वॉर्डात हल्लाबोल पदयात्रा काढणार आहेत. शिवाय१० रोजी शहरातील ६० चौकात १० चित्ररथ लागतील. तेथे तीन मिनिटांचे रेकॉर्ड केलेले भाषणाची ऑडिओ सादर होईल. आणि रॅप साँग वाजविण्यात येईल. शिवाय ६० उपशहरप्रमुख तीन दिवसांत ५८० बैठका घेणार आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAditya Thackreyआदित्य ठाकरेagitationआंदोलन