शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातात कोयताच! शिक्षण विभागाची उदासीनता

By विजय सरवदे | Updated: December 3, 2022 18:44 IST

नोव्हेंबर महिना उलटून गेला. परंतु अजूनही ऊसतोडीसाठी स्थलांतरित झालेल्या मजुरांच्या पाल्यांसाठी म्हणावी तेवढी हंगामी वसतिगृहे सुरू झालेली नाहीत.

औरंगाबाद : एकही मूल शाळाबाह्य राहू नये म्हणून २००९ मध्ये बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा आला; पण या कायद्याची अंमलबजावणी खरेच होती का? या कायद्यानुसार स्थलांतरित, शाळेत न जाणाऱ्या प्रत्येक मुलाला शाळेत सक्तीचे व मोफत शिक्षण देणे बंधनकारक आहे. मात्र, आजही जिल्ह्यातील हजारो मुलं उसाच्या फडात आपल्या पालकांना मदत करीत आहेत. याचे सोयरसुतक शिक्षण विभागाला नाही.

नोव्हेंबर महिना उलटून गेला. परंतु अजूनही ऊसतोडीसाठी स्थलांतरित झालेल्या मजुरांच्या पाल्यांसाठी म्हणावी तेवढी हंगामी वसतिगृहे सुरू झालेली नाहीत. सध्या जिल्ह्यात अवघी चारच वसतिगृहे सुरू आहेत. ऊसतोडीसाठी स्थलांतरित होणाऱ्या मजुरांची जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजारांहून अधिक मुलं आहेत. मागील दोन वर्षे कोरोनामुळे शाळा बंद होत्या. जिल्हा बॉर्डर ओलांडण्यास बंदी होती. त्यामुळे ऊसतोड मजुरांच्या मुलांना दुसऱ्याकडे ठेवण्याची वेळ आली नव्हती. त्याच्या अगोदरच्या शैक्षणिक वर्षात सन २०१९-२० मध्ये जिल्ह्यात १५ हंगामी वसतिगृहे सुरू करण्यात आली होती. तेथे हजारो मुलांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

यंदा पैठण आणि कन्नड या दोनच तालुक्यांत प्रत्येकी दोन-दोन वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. त्यापैकी पैठण तालुक्यातील अब्दुलापूर तांडा येथे १००, गेवराई बाशी येथे ७४, कन्नड तालुक्यात अंबाला येथे १९३, तर लंगडा तांडा येथे ६५ अशा एकूण ४३२ मुलांची व्यवस्था हंगामी वसतिगृहांत करण्यात आली आहे. ज्या शाळेत आपल्या पालकांसोबत स्थलांतरित होणारी २० पेक्षा जास्त मुलं असतील, तेथेच हंगामी वसतिगृह सुरू करण्याचा नियम असल्याचे शिक्षण विभागाचे अधिकारी सांगतात. मग, अनेक शाळांतील अशा २० पेक्षा कमी मुलांची संख्या असेल, तर त्यांच्याबाबत शिक्षण विभागाकडे नियोजन नाही. अधिकारी तसेच शिक्षकांनी ऊसतोड मजुरांना भरवसा दिल्यामुळे त्यांनी आपली लहान मुलं वृद्ध नातेवाइकांकडे ठेवली. पण, त्यांना लागणारे भोजन, शालेय साहित्य देण्याचे औदार्य शिक्षण विभागाने दाखविले नाही. त्यामुळे अनेक पालकांनी आपली मुलं सोबत नेणेच पसंत केले आहे. आता ही मुलं उसाच्या फडात आपल्या आई-वडिलांना मदत करत आहेत.

निवासी वसतिगृहे नाहीतसध्या सुरू करण्यात आलेली हंगामी वसतिगृह म्हणजे ती निवासी वसतिगृहे नाहीत. त्या वसतिगृहांत नोंद झालेल्या विद्यार्थ्यांना शालेय समितीने दोनवेळच्या जेवणाची सोय करायची. दुपारी त्यांना पोषण आहाराची खिचडी द्यायची. नातेवाइकांकडे राहणाऱ्या मुलांनी जेवणासाठी शाळेत यायचे, त्यालाच हंगामी वसतिगृह संबोधले जाते.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSugar factoryसाखर कारखानेEducationशिक्षण