शहर प्रदूषणाच्या विळख्यात...
By Admin | Updated: December 7, 2015 01:05 IST2015-12-07T01:03:39+5:302015-12-07T01:05:47+5:30
राजकुमार जोंधळे ल,लातूर लातूर जिल्ह्यात रेशनच्या निळ््या रॉकेलचा काळा बाजार होत असल्याचे लोकमतने स्टींग आॅपरेशनव्दारे उघडीकीस आणले आहे. शहरात टमटम, आॅटोरिक्षा,

शहर प्रदूषणाच्या विळख्यात...
राजकुमार जोंधळे ल,लातूर
लातूर जिल्ह्यात रेशनच्या निळ््या रॉकेलचा काळा बाजार होत असल्याचे लोकमतने स्टींग आॅपरेशनव्दारे उघडीकीस आणले आहे. शहरात टमटम, आॅटोरिक्षा, ट्रक आणि दुचाकींमध्ये आता बिनधास्तपणे निळ््या रॉकेलचा इंधन म्हणून वापर केला जात आहे. परिणामी अख्खे शहर आता प्रदुषणाच्या विळख्यात अडकल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याला पायबंद घालणारी यंत्रणा मात्र निष्क्रय ठरली असून, प्रत्येक शहरात प्रदुषण रोखणारी ‘पीयूसी’ यंत्रणा बंधनकारक आहे. शहरात मात्र प्रशासनाच्या उदासिनतेमुळे वर्षभरात एकदाही पीयूसी मोहिम राबविण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
लातूर शहरातून खेड्या-पाड्यांतील वेगवेगळ््या मार्गावर धावणाऱ्या काळी-पिवळी प्रवासी वाहनांतूनही या रॉकेलचा वापर होत असल्याचे पुढे आले आहे. शहरातील वेगवेगळ््या भागात, चौकातून या काळी-पिवळी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करतात. याकडे संबंधित प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे. यातील कांही वाहनांत इंधन म्हणून रॉकेलचा वापर होतो, याबाबतची माहिती संबंधित यंत्रणांना असते, कारवाई मात्र केली जात नाही.
ट्रकमध्येही रॉकेलचा वापर...
शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या आॅटो आणि टमटममध्येही निळ््या रॉकेलाचा इंधन म्हणून सर्रासपणे वापर होत आहे. याकडे संबंधित प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. शहरात दरदिन १५०० अॅटो हे अधिकृत प्रवासी वाहतूक करतात. मात्र यातील ३५० आॅटो चालकांकडे प्रवासी वाहतुकीचा परवाना आहे. तर उर्वरित आॅटोचालकांनी खाजगी परवाने घेतले आहेत. यातील कांही आॅटोत इंधन म्हणून चक्क निळ््या रॉकेलचा वापर केला जात आहे.याबाबत संबंधित प्रशासनाकडून डोळेझाक होतेय. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या वतीने विविध स्वरुपाचे खटले दाखल केले जातात. महिन्याकाठी ८५ ते १०० खटले या वाहनधारकांवर दाखल केले जातात. त्यांच्याकडून दंडापोटी रोख रक्कम वसूल केली जाते. मात्र रॉकेल वापरावर कारवाई केली जात नसल्यामुळे प्रदुषण वाढत आहे़ त्यामुळे काळी-पिवळी, टमटम, आॅटो, ट्रक चालकांचे फावत असून, प्रदूषणाला खतपाणी मिळत आहे़