शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार'; इच्छुकांचे केंद्रीय मंत्री भागवत कराडांकडे लॉबिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 15:15 IST

जिल्ह्यातील अनेक आमदारांना मंत्री होण्याची इच्छा

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला हाताशी धरून राज्यात महाविकास आघाडी सरकारला खाली खेचण्यात भाजपला यश आल्यानंतर आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे, ते मंत्रिमंडळ विस्ताराकडे. आघाडी सरकारच्या विरोधात बंड करण्यात जिल्ह्यातील पाच शिवसेनेच्या आमदारांचा समावेश असून त्या सर्वांसह भाजपतील तीन आमदारांना मंत्रिपदी वर्णी लागण्याची इच्छा असून त्यातील अनेकांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्यामार्फत लॉबिंग करण्यास सुरुवात केली आहे.

आता शिंदे गटातील जिल्ह्यातील मंत्र्यांनीही डॉ. कराड यांच्याकडे मंत्री होण्यासाठी ‘शब्द’ टाकावा, यासाठी फोन करून विनवणी केल्याचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिवसेनेतून बंड करत बाहेर पडून मुख्यमंत्री झालेले शिंदे यांच्या गटात जिल्ह्यातील पाच आमदार सामील झाले आहेत. शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यात पाच आमदार आघाडीवर राहिले आहेत. त्यात दोन मंत्री सहभागी आहेत. त्यातील संदीपान भुमरे हे तर कॅबिनेट मंत्री आणि अब्दुल सत्तार हे राज्यमंत्री आहेत. बंडखोरीमुळे शिवसेनेने त्यांची मंत्रिपदे काढून घेतली, तरी या बंडखोर आमदारांनी आता मंत्रिमंडळात वर्णी लागावी, यासाठी लॉबिंग सुरू केले आहे. आ. संजय शिरसाट यांनी पालकमंत्रिपदावर दावा करण्यास सुरुवात केली असून आ. प्रदीप जैस्वाल यांनाही एखादे खाते मिळण्याची अपेक्षा आहे. आ. रमेश बोरनारे यांनाही मंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. शिरसाट आणि जैस्वाल यांनी डॉ.कराड यांना खील आमच्यासाठी ‘शब्द’ टाकण्याची विनंती केल्यामुळे मंत्रिमंडळात प्रचंड रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

केंद्रीय मंत्री काय म्हणाले...?शहरात कोण मंत्री होणार, यावर सध्या काही बोलता येणार नाही. ज्या दिवशी सत्तांतर झाले, त्या दिवशीपासून आ.अतुल सावे, प्रशांत बंब, हरिभाऊ बागडे इच्छुक आहेत. आ.संजय शिरसाट, आ. प्रदीप जैस्वाल यांचाही फोन आला. आमचे तीन इच्छुक आहेत. शिंदे गटातील दोघांनी फोन केला. पाच जण इच्छुक आहेत. याबाबत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील हे निर्णय घेतील.- डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थराज्यमंत्री

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBhagwat Karadडॉ. भागवत