शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

वाचन संस्कृती रुजविणारा ‘किड्स कॉर्नर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 17:14 IST

लहान मुलांना अवांतर वाचनाची आवड लावणे, हा एकमेव उद्देश

- रुचिका पालोदकर औरंगाबाद : आजची मुले अवांतर पुस्तके  वाचत नाहीत, त्यांना वाचनाची गोडी अजिबातच नाही, अशी ओरड अनेक पालक करीत आहेत; पण मुळात बहुतांश मुलांना हल्ली पालकच वाचताना दिसत नाहीत. त्यामुळे वाचन करायचे असते, हे मुलांना कळणार तरी कसे, म्हणूनच आजच्या मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी जीवन विकास ग्रंथालयातर्फे मागील दोन वर्षांपासून ‘किड्स कॉर्नर’ सुरू करण्यात आला आहे. 

‘वाचन संस्कृती जपूया, संस्कार धन वाढवूया...’ या ब्रीदवाक्यानुसार याठिकाणी काम होते. संगीता मंडलिक आणि प्रियंका डसगावकर वाचन कक्षाचे काम पाहतात. याविषयी अधिक सांगताना त्या म्हणाल्या की, दोन वर्षांपूर्वी वाचन प्रेरणा दिनापासून आम्ही या कक्षाची सुरुवात केली. लहान मुलांना अवांतर वाचनाची आवड लावणे, हा एकमेव उद्देश यामागे आहे. दररोज सायंकाळी ६ ते ७ या वेळेत हा वाचन कक्ष सुरू असतो. यावेळी शाळकरी मुलांनी यावे आणि या कक्षात खास मुलांसाठी ठेवण्यात आलेले हवे ते पुस्तक वाचावे, असा दिनक्रम असतो; पण अनेकदा मुले पुस्तक वाचून कंटाळलेली दिसायची म्हणून मग आम्ही याला पूरक असे अनेक उपक्रम या कक्षात सुरू केले, असे मंडलिक यांनी सांगितले.

या वाचन कक्षांतर्गत मुलांना कसे आणि काय वाचावे यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येते. अनेकदा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ मंडळींना, शहरातील साहित्यिकांना आमंत्रित केले जाते. बऱ्याचदा मंडलिक आणि डसगावकर या स्वत: मुलांना विविध पुस्तकांतील कथा वाचून दाखवितात. मराठीसोबतच इंग्रजी वाचनाची सवयही मुलांना लावली जाते. विविध बौद्धिक खेळांचे आयोजन केले जाते, तसेच वर्षभर दिन विशेषानुसार विविध स्पर्धा घेऊन मुलांना कथा सांगण्याची, भाषण करण्याची तसेच संवादकौशल्य विकसित करण्याची संधी दिली जाते. अनेक दा काही व्हिडिओ दाखवूनही मुलांना गोष्टी सांगितल्या जातात. 

सर्व शाळकरी विद्यार्थ्यांसाठी उपक्रमहा उपक्रम सर्व शाळकरी विद्यार्थ्यांसाठी खुला आहे. वाचन संस्कृती रुजविण्यासाठी पालक, शिक्षकांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. केवळ विद्यार्थ्यांना दोष देऊन उपयोग नाही. दोन वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे; पण तरी अजूनही बाल कक्षात येऊन वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय नाही. सोशल मीडियाच्या भपक्यापासून मुलांना दूर न्यायचे असेल, तर अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे गरजेचे आहे.- संगीता मंडलिक

टॅग्स :Studentविद्यार्थीAurangabadऔरंगाबादSocial Mediaसोशल मीडिया