शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी मनसे उतरली रस्त्यावर

By Admin | Updated: May 24, 2014 01:38 IST2014-05-24T01:04:48+5:302014-05-24T01:38:31+5:30

घनसावंगी : शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घनसावंगी येथे शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

The kidnapper got down on the road for farmers' questions | शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी मनसे उतरली रस्त्यावर

शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी मनसे उतरली रस्त्यावर

घनसावंगी : शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घनसावंगी येथे शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. घनसावंगी तालुक्यातील ५२ गावे गारपिटग्रस्तांच्या यादीतून वगळण्यात आली. ती गावे पुन्हा समाविष्ट करण्यात यावी, प्रलंबित एक्स्प्रेस काल्याची मागणी पूर्ण करावी, शेतकर्‍यांना पीककर्ज तात्काळ उपलब्ध करून द्यावे, रास्त भावाने खते व बी-बियाणे उपलब्ध करून द्यावेत, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष सुनील आर्दड यांनी केले. आंदोलनात सहभागी झालेल्या काही कार्यकर्त्यांनी मुंडण करून, शासनाचा निषेध नोंदविला. यावेळी बोलताना आर्दड म्हणाले की, निवडणुका आल्या की राज्यकर्ते आश्वासनाची खैरात वाटतात, परंतु प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय शासन घेत नाही. घनसावंगी तालुक्यातील ५२ गावे प्रशासनाने पंचनामे करण्यापासून वगळली आहेत. ही गावे पुन्हा समाविष्ट करून शेतकर्‍यांना गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी. यावेळी तालुकाध्यक्ष अंकुश बोबडे, बळीराम खटके, गणेश बोराडे, हिराताई जाधवर, दिलीप राऊत, एकनाथ राठोड, दिगंबर आर्दड, भरत कंटुले, कैलास चौधरी, प्रकाश गहिरे, दिगंबर उगले, अर्जुन माळोदे, दिलीप पाटेकर, हरिभाऊ तांगडे, संतोष सोसे, अर्जुन थेटे, अर्जुन जाधव, सागर पवार, संजय सोळंके, कानिफनाथ सावंत, सुभाष परदेशी, बंडू उपाध्ये, विलास भुतेकर, कृष्णा कवडे, विठ्ठल आटोळे, कृष्णा पिसोरे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: The kidnapper got down on the road for farmers' questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.