शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
2
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
3
सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लाागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
4
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
5
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
6
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
7
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
8
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
9
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
10
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
11
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
12
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
13
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
14
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
15
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
16
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
17
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
18
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
19
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
20
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळमुक्तीचा खिर्डी पॅटर्न; पाच वर्षांपासून गाव टँकरमुक्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 22:45 IST

शासकीय विहिरीजवळ पुनर्भरण केल्यानं मुबलक पाणीपुरवठा

खुलताबाद (जि. औरंगाबाद) : तालुक्यातील खिर्डी गावच्या शासकीय पाणीपुरवठ्याच्या विहिरीजवळ विहीर पुनर्भरण कार्यक्रम राबविल्याने खिर्डी गाव गेल्या पाच वर्षांपासून टँकरमुक्त झाले असून आजही गावास एक दिवसाआड मुबलक पाणीपुरवठा केला जात आहे.खिर्डी गावास मावसाळा येथील रंगमहाल तलावातील शासकीय पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या अनेक वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे गावास तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. परंतु ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या अथक परिश्रमामुळे मावसाळा रंगमहाल तलाव परिसरातील विहिरीजवळ विहिर पुनर्भरण करण्यात आले. त्याचबरोबर विहिरीजवळ खड्डे खोदून या खड्ड्यात दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जामदरी तलावातून पाणी आणून ते पाणी परिसरातील खड्ड्यात सोडल्याने विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झाली व गेल्या पाच वर्षांपासून विहिरीस भरपूर पाणी असल्याने ग्रामस्थांना ते एक दिवसाआड मुबलक प्रमाणात पुरविण्यात येत आहे. यंदा पाऊस झाला नाही तरी या शासकीय पाणीपुरवठा विहिरीस मुबलक पाणी असल्याचे सरपंच कृष्णा चव्हाण व प्रगतशील शेतकरी दत्तू धोत्रे यांनी सांगितले. गेल्या वर्षी ग्रामपंचायतीने शासकीय पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ पाच लाख रुपये खर्च करून दोन बुडक्या विहिरी खोदल्या तसेच त्यात आडवे बोअर घेतले. त्यामुळे या बुडक्या विहिरीचे पाणी विहीर पुनर्भरण कार्यक्रमास वापरून गावकऱ्यांना नळाद्वारे एकदिवसाआड पुरविले जात आहे. त्यामुळे खिर्डी गाव गेल्या पाच वर्षांपासून टँकरमुक्त झाले आहे. 

टॅग्स :water shortageपाणीकपातAurangabadऔरंगाबादdroughtदुष्काळ