शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

दुष्काळमुक्तीचा खिर्डी पॅटर्न; पाच वर्षांपासून गाव टँकरमुक्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 22:45 IST

शासकीय विहिरीजवळ पुनर्भरण केल्यानं मुबलक पाणीपुरवठा

खुलताबाद (जि. औरंगाबाद) : तालुक्यातील खिर्डी गावच्या शासकीय पाणीपुरवठ्याच्या विहिरीजवळ विहीर पुनर्भरण कार्यक्रम राबविल्याने खिर्डी गाव गेल्या पाच वर्षांपासून टँकरमुक्त झाले असून आजही गावास एक दिवसाआड मुबलक पाणीपुरवठा केला जात आहे.खिर्डी गावास मावसाळा येथील रंगमहाल तलावातील शासकीय पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या अनेक वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे गावास तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. परंतु ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या अथक परिश्रमामुळे मावसाळा रंगमहाल तलाव परिसरातील विहिरीजवळ विहिर पुनर्भरण करण्यात आले. त्याचबरोबर विहिरीजवळ खड्डे खोदून या खड्ड्यात दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जामदरी तलावातून पाणी आणून ते पाणी परिसरातील खड्ड्यात सोडल्याने विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झाली व गेल्या पाच वर्षांपासून विहिरीस भरपूर पाणी असल्याने ग्रामस्थांना ते एक दिवसाआड मुबलक प्रमाणात पुरविण्यात येत आहे. यंदा पाऊस झाला नाही तरी या शासकीय पाणीपुरवठा विहिरीस मुबलक पाणी असल्याचे सरपंच कृष्णा चव्हाण व प्रगतशील शेतकरी दत्तू धोत्रे यांनी सांगितले. गेल्या वर्षी ग्रामपंचायतीने शासकीय पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ पाच लाख रुपये खर्च करून दोन बुडक्या विहिरी खोदल्या तसेच त्यात आडवे बोअर घेतले. त्यामुळे या बुडक्या विहिरीचे पाणी विहीर पुनर्भरण कार्यक्रमास वापरून गावकऱ्यांना नळाद्वारे एकदिवसाआड पुरविले जात आहे. त्यामुळे खिर्डी गाव गेल्या पाच वर्षांपासून टँकरमुक्त झाले आहे. 

टॅग्स :water shortageपाणीकपातAurangabadऔरंगाबादdroughtदुष्काळ