शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
2
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
3
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
4
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
5
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
6
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
7
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
8
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
9
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
10
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
11
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
14
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
15
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
16
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
17
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
18
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
19
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
20
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय पथकाकडून ‘खिचडी’ची तपासणी

By admin | Updated: December 4, 2014 00:53 IST

उस्मानाबाद : खिचडीत लेंढ्या निघाल्या...तांदळामध्ये अळ्या...पालेभाज्यांचा वापर नाही...अशा नानाविध तक्रारी ग्रामस्थांतून होत होत्या.

उस्मानाबाद : खिचडीत लेंढ्या निघाल्या...तांदळामध्ये अळ्या...पालेभाज्यांचा वापर नाही...अशा नानाविध तक्रारी ग्रामस्थांतून होत होत्या. शासनाचे पोषण आहारावर कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही शाळकरी विद्यार्थ्यांना बेचव खिचडी खावी लागत असल्याची ओरडही होत होती. याच पार्श्वभूमीवर ‘खिचडी’ची तपासणी करण्यासाठी राज्यस्तरीय पथक दोन दिवसांपासून जिल्ह्यात शाळांवर जावून चौकशी करीत आहेत. त्यामुळे आता ‘बेचव’ खिचडीची पोलखोल होण्याच्या शक्यतेने पोषण आहाराच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढावी, पर्यायाने विद्यार्थ्यांना शाळेचा लळा लागावा, यासाठी शासनाच्या वतीने पोषण आहार ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना खिचडी पुरविली जाते. सुरूवातीचे काही दिवस ही योजना उत्तम पद्धतीने सुरू होती. परंतु, कालांतराने विशेषत: पोषण आहाराच्या दर्जाबाबात तक्रारी वाढू लागल्या. तसेच पोषण आहार शिजविताणा स्वच्छता पाळली जात नसल्याबाबतही ओरड होत होती. अनेकवेळा शिजविलेल्या खिचडीमध्ये लेंढ्या निघाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. खिचडीमध्ये निश्चित केलेल्या मेनुप्रमाणे पालेभाज्या वापरल्या जात नसल्याची ओरडही पालकांतून सातत्याने होते.दरम्यान, पोषण आहाराबाबत सातत्याने पालकांतून होत असलेली ओरड लक्षात घेवून शासनाने सदरील पोषण आहाराची (खिचडी) चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यामध्ये राज्यस्तरीय पथक मंगळवारी दाखल झाले आहे. या पथकाचे प्रमुख शिक्षक संचालक आहेत. पथकामध्ये राज्यस्तरावरील चार आणि जिल्ह्यातील चार सदस्यांचा समावेश आहे. दोन दिवसांमध्ये भूम, परंडा, लोहारा, उमरगा आणि तुळजापूर या तालुक्यांतील जवळपास प्रत्येकी तीन याप्रमाणे शाळांची तपासणी करण्यात आली आहे. यावेळी खिचडीची गुणवत्ता, स्वच्छता यासोबतच विद्यार्थ्यांची गुणवत्ताही तपासली जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पथकाच्या अचानक तपासणीमुळे पोषण आहाराच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)