शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

राज्यस्तरीय पथकाकडून ‘खिचडी’ची तपासणी

By admin | Updated: December 4, 2014 00:53 IST

उस्मानाबाद : खिचडीत लेंढ्या निघाल्या...तांदळामध्ये अळ्या...पालेभाज्यांचा वापर नाही...अशा नानाविध तक्रारी ग्रामस्थांतून होत होत्या.

उस्मानाबाद : खिचडीत लेंढ्या निघाल्या...तांदळामध्ये अळ्या...पालेभाज्यांचा वापर नाही...अशा नानाविध तक्रारी ग्रामस्थांतून होत होत्या. शासनाचे पोषण आहारावर कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही शाळकरी विद्यार्थ्यांना बेचव खिचडी खावी लागत असल्याची ओरडही होत होती. याच पार्श्वभूमीवर ‘खिचडी’ची तपासणी करण्यासाठी राज्यस्तरीय पथक दोन दिवसांपासून जिल्ह्यात शाळांवर जावून चौकशी करीत आहेत. त्यामुळे आता ‘बेचव’ खिचडीची पोलखोल होण्याच्या शक्यतेने पोषण आहाराच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढावी, पर्यायाने विद्यार्थ्यांना शाळेचा लळा लागावा, यासाठी शासनाच्या वतीने पोषण आहार ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना खिचडी पुरविली जाते. सुरूवातीचे काही दिवस ही योजना उत्तम पद्धतीने सुरू होती. परंतु, कालांतराने विशेषत: पोषण आहाराच्या दर्जाबाबात तक्रारी वाढू लागल्या. तसेच पोषण आहार शिजविताणा स्वच्छता पाळली जात नसल्याबाबतही ओरड होत होती. अनेकवेळा शिजविलेल्या खिचडीमध्ये लेंढ्या निघाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. खिचडीमध्ये निश्चित केलेल्या मेनुप्रमाणे पालेभाज्या वापरल्या जात नसल्याची ओरडही पालकांतून सातत्याने होते.दरम्यान, पोषण आहाराबाबत सातत्याने पालकांतून होत असलेली ओरड लक्षात घेवून शासनाने सदरील पोषण आहाराची (खिचडी) चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यामध्ये राज्यस्तरीय पथक मंगळवारी दाखल झाले आहे. या पथकाचे प्रमुख शिक्षक संचालक आहेत. पथकामध्ये राज्यस्तरावरील चार आणि जिल्ह्यातील चार सदस्यांचा समावेश आहे. दोन दिवसांमध्ये भूम, परंडा, लोहारा, उमरगा आणि तुळजापूर या तालुक्यांतील जवळपास प्रत्येकी तीन याप्रमाणे शाळांची तपासणी करण्यात आली आहे. यावेळी खिचडीची गुणवत्ता, स्वच्छता यासोबतच विद्यार्थ्यांची गुणवत्ताही तपासली जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पथकाच्या अचानक तपासणीमुळे पोषण आहाराच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)