शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

खरिपाचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:19 IST

मराठवाड्यात आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस झाला असला तरी त्याचा खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर मोठा असा परिणाम होणार नाही. ५० टक्क्यांनी खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटेल, असा अहवाल विभागीय प्रशासनाने शासनाला पाठविला आहे.

ठळक मुद्दे मराठवाडा : कापूस, मका, सोयाबीनवर होणार परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यात आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस झाला असला तरी त्याचा खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर मोठा असा परिणाम होणार नाही. ५० टक्क्यांनी खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटेल, असा अहवाल विभागीय प्रशासनाने शासनाला पाठविला आहे.मराठवाड्यात आजवर ५९ टक्के पाऊस झाला आहे. १५ आॅगस्टनंतर सुरू झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून, पीक परिस्थिती सुधारत आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात पाऊस होऊनही पिकांवरील संकट कायम आहे. त्या तालुक्यात कापूस व मका पिकांत साधारणत: ५० टक्के उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. पैठण, फुलंब्री, गंगापूर तालुक्यांतही अशीच परिस्थिती आहे.सिल्लोड तालुक्यात खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादकतेत ३० ते ४० टक्के घट होण्याची शक्यता आहे.खुलताबाद, कन्नड, सोयगाव तालुक्यात पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र त्याचा फारसा फायदा होईल, अशी शक्यता नाही.बीड जिल्ह्यात १ महिन्याचा पावसाचा खंड पडला आहे. त्याचा विपरीत परिणाम पिकांवर झाला आहे. जालना जिल्ह्यातील पिकांनी माना टाकल्या होत्या; परंतु या आठवड्यातील पावसामुळे पिके तरली आहेत.पिकांची सद्य:स्थिती अशीमराठवाड्यात मक्याच्या पिकाची परिस्थिती उस्मानाबाद जिल्ह्यात चांगली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी खोड किडीचा प्रादुर्भाव दिसतो आहे. कापसावर कीड पडली आहे. जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत कापसाच्या पिकावर बोंडअळी दिसून येत आहे.तुरीच्या पानांवर अळ्यांचा प्रभाव दिसतो आहे. मुगाच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. उडदाच्या पिकावर काही जिल्ह्यात मावा पडला आहे. तर सोयाबीनच्या पिकावर पाने खाणाºया अळ्या दिसून येत आहेत. बाजरीच्या पिकाची परिस्थिती सुधारत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस