शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:19 IST

मराठवाड्यात आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस झाला असला तरी त्याचा खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर मोठा असा परिणाम होणार नाही. ५० टक्क्यांनी खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटेल, असा अहवाल विभागीय प्रशासनाने शासनाला पाठविला आहे.

ठळक मुद्दे मराठवाडा : कापूस, मका, सोयाबीनवर होणार परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यात आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस झाला असला तरी त्याचा खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर मोठा असा परिणाम होणार नाही. ५० टक्क्यांनी खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटेल, असा अहवाल विभागीय प्रशासनाने शासनाला पाठविला आहे.मराठवाड्यात आजवर ५९ टक्के पाऊस झाला आहे. १५ आॅगस्टनंतर सुरू झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून, पीक परिस्थिती सुधारत आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात पाऊस होऊनही पिकांवरील संकट कायम आहे. त्या तालुक्यात कापूस व मका पिकांत साधारणत: ५० टक्के उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. पैठण, फुलंब्री, गंगापूर तालुक्यांतही अशीच परिस्थिती आहे.सिल्लोड तालुक्यात खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादकतेत ३० ते ४० टक्के घट होण्याची शक्यता आहे.खुलताबाद, कन्नड, सोयगाव तालुक्यात पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र त्याचा फारसा फायदा होईल, अशी शक्यता नाही.बीड जिल्ह्यात १ महिन्याचा पावसाचा खंड पडला आहे. त्याचा विपरीत परिणाम पिकांवर झाला आहे. जालना जिल्ह्यातील पिकांनी माना टाकल्या होत्या; परंतु या आठवड्यातील पावसामुळे पिके तरली आहेत.पिकांची सद्य:स्थिती अशीमराठवाड्यात मक्याच्या पिकाची परिस्थिती उस्मानाबाद जिल्ह्यात चांगली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी खोड किडीचा प्रादुर्भाव दिसतो आहे. कापसावर कीड पडली आहे. जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत कापसाच्या पिकावर बोंडअळी दिसून येत आहे.तुरीच्या पानांवर अळ्यांचा प्रभाव दिसतो आहे. मुगाच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. उडदाच्या पिकावर काही जिल्ह्यात मावा पडला आहे. तर सोयाबीनच्या पिकावर पाने खाणाºया अळ्या दिसून येत आहेत. बाजरीच्या पिकाची परिस्थिती सुधारत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस