शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

पावसाअभावी खरीप गेले, आता अवकाळीने रब्बीचे नुकसान; मराठवाड्यात १०७ मंडळात अतिवृष्टी

By विकास राऊत | Updated: November 28, 2023 11:36 IST

मराठवाड्यातील २ हजार १४० गावांतील रब्बी पिकांवर अवकाळी संकट

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात रविवारी रात्रीपासून आज पहाटेपर्यंत अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली. अतिवृष्टीमुळे रबी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरत्या वर्षांत कमी पावसामुळे सहा जिल्ह्यांतील तर दोन जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे खरीप पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. रबी हंगामाच्या पेरण्यांचा अंतिम टप्पा असतानाच अवकाळी पावसाने पिकांचे माती केली. विभागातील १०७ मंडळातील सुमारे २ हजार १४० गावांतील रबी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विभागीय प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनाम्यानंतर वस्तुस्थिती समाेर येईल. विभागात सुमारे ८ हजार ५५० गावे असून ४२५ मंडळ आहेत. त्यातील १०७ मंडळे रविवार २६ रोजी झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यात आली.

छत्रपती संभाजीनगर : ६४० गावांत नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३२ मंडळात पावसाने थैमान घातले. ६४० गावांमध्ये रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात उस्मानपुरा ७४ मि.मी., भावसिंगपुरा ८५ मि.मी., कांचनवाडी ७९ मि.मी., चौका ८६ मि.मी., कचनेर ६८ मि.मी., पंढरपूर ७३.७५ मि.मी., अडूळ ९३.५० मि.मी., बिडकीन ६८.२५ मि.मी., पाचोड ६८ मि.मी., मांजरी ६८.२५. मि.मी., भेंडाळा ६९ मि.मी., तुर्काबाद ७८.५० मि.मी., वाळुज ७३.७५ मि.मी., डोणगाव ९९.७५ मि.मी., असेगाव ६७.२५ मि.मी., शिवूर ८७.५० मि.मी., गारज ७६ मि.मी., महालगाव ७०.७५ मि.मी., जानेफळ ६८ मि.मी., कन्नड ६७ मि.मी., चाफानेर ६७ मि.मी., देवगाव ७२.२५ मि.मी., पिशोर ८६.२५ मि.मी., नाचनवेल ७९.५० मि.मी., चिंचोली लिंबाजी ६६.७५ मि.मी., वेरुळ १०७.५० मि.मी., सुलतानपूर १०३.७५ मि.मी., बाजारसावंगी ८६ मि.मी., गोळेगाव ६६.५० मि.मी., आमठाण ७३.२५ मि.मी., बोरगाव ७७.२५ मि.मी. तर फुलंब्रीमध्ये ८९.५० मि.मी. पावसाची नोंद झाली.

जालना : ५४० गावांना अतिवृष्टीचा दणका जालना जिल्ह्यात २७ मंडळांतील ५४० गावांना अवकाळी पावसाचा दणका बसला. त्यात भोकरदन ९५.७५ मि.मी., पिंपळगाव ७२.५० मि.मी., केदरखेडा ७५.७५ मि.मी., जाफ्राबाद ७१.७५ मि.मी., कुंभारजारा ७७.७५ मि.मी., टेंभूर्णी ८०.५० मि.मी., जालना शहर १०४.२५ मि.मी., वाघरुळ १३२.२५ मि.मी., नेर ७६.२५ मि.मी., शेवाळी ८१.५० मि.मी., रामनगर ७८.५० मि.मी., पाचनवड ७८.५० मि.मी., जामखेड ७२.५० मि.मी., रोहिलगड ८१.५० मि.मी., गोंदी ७० मि.मी., वडीगोद्री ७२.७५ मि.मी., वाटूर ६८.७५ मि.मी.,बदनापूर ९३.२५ मि.मी., शेलगाव १३२ मि.मी., बावणे ९२.५० मि.मी., रोशनगाव ९०.५० मि.मी., तिर्थपूरी ९०.२५ मि.मी., कु. पिंपळगाव ७२.५० मि.मी., अंतरवाली ७१.७५ मि.मी., तळणी ७४.२५ मि.मी., ढोकसाळ ७७.२५ मि.मी., पांगरी ८३.५० मि.मी. तर तलवाडा मंडळात ७५.२५ मि.मी. पावसाची नोंद झाली.

परभणीत : ४६० गावांना अवकाळीचा फटकापरभणी जिल्ह्यातील २३ मंडळातील ४६० गावांतील रबी हंगामाला अवकाळीचा फटका बसला आहे. त्यात परभणी १०२.५० मि.मी., जांब ७०.७५ मि.मी., झरी ७२ मि.मी., सिंगनापूर ७६.२५ मि.मी., पिंगळी ७६ मि.मी., केसापुरी ७२.५० मि.मी., जिंतूर १२९.७५ मि.मी., संगावी ८४ मि.मी., बामणी ८२ मि.मी., बोरी ८८.७५ मि.मी., अडगाव १०२.७५ मि.मी., चारठाण ७५.५० मि.मी., वाघी १००.७५ मि.मी., दुधगाव ८३.२५ मि.मी., पूर्णा ९७.७५ मि.मी., तडकळस ९१.७५ मि.मी., लिमाळा ६८.२५ मि.मी., कंठेश्वर ७५ मि.मी., चुडावा ९४.५० मि.मी., देऊळगाव ७६.७५ मि.मी., कुपटा ९४.५० मि.मी., कोलहा ७६.७५ मि.मी. तर तडबोरगाव मंडळात ६९ मि.मी. पावसाची नोंद झाली.

हिंगोलीत २४० तर बीडमध्ये २० गावांत नुकसानहिंगोली जिल्ह्यात १२ मंडळातील २४० गावांत अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. त्यात हिंगोली ७२.२५ मि.मी., बासंमबा ७०.२५ मि.मी., दिग्रस ८५ मि.मी., माळहिवरा ६६ मि.मी., कळमनुरी ७३.२५ मि.मी., वाकोडी ८३.७५ मि.मी., नांनदापूर ७९.२५ मि.मी., हत्ता ७४ मि.मी., औंढा ८३.५० मि.मी., येहाळेगाव ८७ मि.मी., सालना ८३ मि.मी. तर जावळा मंडळात ८७.५० मि.मी. पाऊस झाला. बीड जिल्ह्यात तलवाडा मंडळात ७५.२५ मि.मी. पाऊस झाला.

नांदेड जिल्ह्यात २४० गावांना तडाखानांदेड जिल्ह्यातील १२ मंडळातील २४० गावांतील रबी पिकांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला. यात नांदेड शहर ६८ मि.मी., लिंम्बगाव ९९ मि.मी., तारोडा ८२.२५ मि.मी., नाळेश्वर ७०.७५ मि.मी., उस्माननगर ७६.२५ मि.मी., सोनखेड ७६.२५ मि.मी., शेवडी ७४ मि.मी., कालमबार ७६.२५ मि.मी., ताम्सा ६५.२५ मि.मी., अर्धापूर ७७.५० मि.मी. तर दाभाड मंडळात ६९ मि.मी. पावसाची नोंद झाली.

टॅग्स :RainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादNandedनांदेड