शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
4
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
5
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
6
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
7
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
8
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
9
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
12
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
13
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
14
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
15
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
16
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
17
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
18
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
19
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
20
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य

वैजापूर तालुक्यातील खरीप पिके करपली; रबी हंगामही धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 15:58 IST

वैजापूर तालुक्यात आतापर्यंत केवळ ५१.७३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच खरिपाची पिके हातातून गेली आहेत.

- मोबीन खान  वैजापूर (औरंगाबाद ) : वैजापूर तालुक्यात आतापर्यंत केवळ ५१.७३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच खरिपाची पिके हातातून गेली आहेत. दुसरीकडे आॅक्टोबर महिना सुरू झाला तरी मोठा पाऊस न झाल्याने येथील नदी, नाले, तलाव, मोठमोठे प्रकल्प कोरडेठाक आहेत. यामुळे बळीराजाने आगामी रबी हंगामाचीही आशा सोडल्याचे चित्र आहे. या परिस्थितीमुळे यंदा तालुक्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे, हे निश्चित आहे.

आतापर्यंत तालुक्यात ५१.७३ टक्के २६९.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  ३० सप्टेंबरपर्यंत पडणाऱ्या सरासरी पावसाच्या तुलनेत हा पाऊस ५१.७३ टक्के आहे. शासन स्तरावर यंदाचा पावसाळा ३० सप्टेंबरला संपला आहे. त्यामुळे सोमवारपासून पावसाच्या रोजच्या नोंदी घेणे बंद झाले आहे. वैजापूर तालुक्यात पावसाच्या या १२० दिवसांत ४८.२७ टक्क्यांची तूट आहे, अशा परिस्थितीत यावर्षीच्या खरीप पिकांसोबतच आगामी रबीची पिके उगवून येणार किंवा नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. सप्टेंबरनंतर बरसणाऱ्या पावसाची अवकाळी नोंद होते. शासनाच्या योजना व सवलती व तसेच पाऊस कमी असल्यास उपाययोजना या चार महिन्यांच्या आकडेवारीवरच आधारित असतात. तसेच या चार महिन्यांत तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास सुरू असतो. या कालावधीत पावसाची मंडळनिहाय नोंद घेण्यात येते. मात्र, ३० सप्टेंबरनंतर फक्त अवकाळी पाऊस आल्यासच नोंद घेण्यात येते.  

वैजापूर तालुक्यात या कालावधीत ५२० मि.मी. पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात २६९ मि.मी. पावसाची नोंद झाली. ही ५१.७३ टक्केवारी आहे. यामध्ये वैजापूर २८७, खंडाळा २४०, शिऊर २८०, लोणी खुर्द २२४, गारज १८९, नागमठाण २६७, बोरसर २७७, महालगाव ३२५, लाडगाव ३०३, लासूरगाव २९७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  पावसाची टक्केवारी पाहता जलसाठ्यांमध्ये समाधानकारक पाणी असेल असे दिसते. मात्र, प्रत्यक्षात पावसात सातत्य राहिले नसल्याने पाणी जमिनीमध्ये मुरले नाही़  त्यामुळे तालुक्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. त्यासाठी प्रशासनाला आतापासूनच उपाययोजना कराव्या लागणार आहे.

 उत्पादनात मोठ्या प्रमाणात घटसप्टेंबर अखेरपर्यंत पावसाची नोंद घेतली जात असली तरी गणेशोत्सवानंतर पाऊस येण्याची शक्यता कमीच असते. गणेशोत्सवानंतर ऊन पडत असल्याने कपाशी, मका आदी पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. 

११ प्रकल्पांत थेंबही नाही तालुक्यात पावसाअभावी ११ प्रकल्प कोरडे आहे, तर शहरातील नारंगी मध्यम प्रकल्प, कोल्ही मध्यम प्रकल्प, सटाणा व गाढेपिंपळगाव लघुप्रकल्प जोत्याखाली आहे. सद्य:स्थितीत केवळ मन्याड साठवण तलावात १२ टक्के साठा शिल्लक आहे. कमी पावसामुळे जमिनीतही आर्द्रता कमी असल्याने यंदाच्या रबीवर थेट परिणाम होणार आहे. एकंदरीत यंदा वेळीच उपाययोजना न केल्यास पिण्याच्या पाण्याची बिकट समस्या निर्माण होणार  आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसagricultureशेती