शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

केरळचा औषधी पुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:18 AM

केरळमधील पूरस्थितीमुळे तेथील वाहतूक ठप्प झाली असून, त्याचा औरंगाबादेतील औषधी उत्पादक कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. येथून दररोज २५ ते ३० ट्रक औषधी केरळमध्ये विक्रीसाठी जात असे. मागील आठ दिवसांपासून एकही ट्रक केरळला रवाना झाला नाही.

ठळक मुद्देदररोज जाणारे ३० ट्रक थांबले : टायर, ट्यूबसाठी लागणारे रबर, मसाल्याची आवक घटली

प्रशांत तेलवाडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केरळमधील पूरस्थितीमुळे तेथील वाहतूक ठप्प झाली असून, त्याचा औरंगाबादेतील औषधी उत्पादक कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. येथून दररोज २५ ते ३० ट्रक औषधी केरळमध्ये विक्रीसाठी जात असे. मागील आठ दिवसांपासून एकही ट्रक केरळला रवाना झाला नाही. तसेच कंडोम व टायर, ट्यूब बनविण्यासाठी लागणारे रबर आणि मसाल्याच्या आवकवरही परिणाम झाला आहे.मुसळधार पावसामुळे केरळमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. भूस्खलन आणि दरडी कोसळल्याचा परिणाम येथील औद्योगिक वसाहतीलाही जाणवू लागला आहे. येथील औषधी कंपन्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. औरंगाबादमध्ये औषधींच्या ५ ते ७ मोठ्या कंपन्या आहेत. तर ५० ते ७० च्या आसपास मध्यम व लहान प्रकारातील औषध निर्मिती युनिट आहेत. औषधी उत्पादक उद्योजक कमांडर अनिल सावे यांनी सांगितले की, वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांची मिळून दररोज २५ ते ३० ट्रक औषधी केरळ राज्यात जाते. मात्र, मागील आठ दिवसांपासून एकही ट्रक केरळकडे रवाना झाली नाही. याचा आर्थिक फटका औषधी कंपन्यांना बसत आहे. ही औषधी दुसऱ्या राज्यांकडे वळविण्यात येत आहे. जे. के. अ‍ॅन्सेल कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक बी. डी. भूमकर यांनी सांगितले की, केरळ, कर्नाटक व तामिळनाडूमधून रबर येथे येते. त्यातील ८० टक्के रबरची निर्मिती एकट्या केरळात होते. महिनाभरात सुमारे १५ ट्रक लॅटेक्स रबर येथील औद्योेगिक वसाहतीत मागविले जाते. केरळमधून रबर येत नसले तरी कर्नाटक व तामिळनाडूचा पर्याय आहे. पण केरळच्या परिस्थितीचा रबरच्या आवकवर परिणाम निश्चित जाणवेल. टायर व ट्यूब बनविण्यासाठीही केरळ राज्यातून रबर मोठ्या प्रमाणात शहरात आणले जाते. कंपनीतील एका अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार महिनभरात १०० टनपेक्षा अधिक रबर केरळातून येत असते. टायर मोल्डिंगसाठीही या रबराचाच वापर होतो. माल वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष फय्याज खान म्हणाले की, औषधी व इतर उत्पादने घेऊन येथून दररोज ७० ते ८० ट्रक केरळला जात असतात. मात्र, अतिवृष्टीमुळे एकही ट्रक केरळात गेला नाही.इलायची, काळीमिरी, जायफळ, सुंठ, सुपारी महागलीइलायची, काळीमिरी, जायफळ, गोटा खोबरा, सुपारी उत्पादनात केरळ राज्य अग्रेसर आहे. यासंदर्भात मसाल्याचे व्यापारी शिवनारायण तोतला यांनी सांगितले की, इलायचीचा नवीन हंगाम सध्या सुरू आहे. मात्र, अतिवृष्टीने आवक थांबली असून, तेथील उत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, ५०० रुपयांनी इलायची महागली असून शुक्रवारी १५५० ते २००० रुपये प्रतिकिलोने विक्री झाली. ३० ते ४० रुपयांनी काळीमिरीचे भाव वाढून ५५० ते ७०० रुपये किलो झाले.जायपत्री १०० रुपयांनी वधारून १२०० ते १६०० रुपये किलो, सुंठमध्ये ४० रुपये वाढून २४० ते ३०० रुपये किलो तर किलोमागे १० ते २० रुपये वाढून सुपारी ३०० ते ३६० रुपयांना विकत आहे. खोबरा गोटा कर्नाटक, तामिळनाडूतूनही येत असल्याने खोबºयात भाववाढ झाली नाही. तसेच २० ते ३० टक्के चहापत्तीही केरळातून येते, पण आसाममधूनही चहापत्ती येत असल्याने परिणाम नाही.

टॅग्स :medicineऔषधंAurangabadऔरंगाबादKeralaकेरळ