शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

केरळचा औषधी पुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:19 IST

केरळमधील पूरस्थितीमुळे तेथील वाहतूक ठप्प झाली असून, त्याचा औरंगाबादेतील औषधी उत्पादक कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. येथून दररोज २५ ते ३० ट्रक औषधी केरळमध्ये विक्रीसाठी जात असे. मागील आठ दिवसांपासून एकही ट्रक केरळला रवाना झाला नाही.

ठळक मुद्देदररोज जाणारे ३० ट्रक थांबले : टायर, ट्यूबसाठी लागणारे रबर, मसाल्याची आवक घटली

प्रशांत तेलवाडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केरळमधील पूरस्थितीमुळे तेथील वाहतूक ठप्प झाली असून, त्याचा औरंगाबादेतील औषधी उत्पादक कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. येथून दररोज २५ ते ३० ट्रक औषधी केरळमध्ये विक्रीसाठी जात असे. मागील आठ दिवसांपासून एकही ट्रक केरळला रवाना झाला नाही. तसेच कंडोम व टायर, ट्यूब बनविण्यासाठी लागणारे रबर आणि मसाल्याच्या आवकवरही परिणाम झाला आहे.मुसळधार पावसामुळे केरळमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. भूस्खलन आणि दरडी कोसळल्याचा परिणाम येथील औद्योगिक वसाहतीलाही जाणवू लागला आहे. येथील औषधी कंपन्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. औरंगाबादमध्ये औषधींच्या ५ ते ७ मोठ्या कंपन्या आहेत. तर ५० ते ७० च्या आसपास मध्यम व लहान प्रकारातील औषध निर्मिती युनिट आहेत. औषधी उत्पादक उद्योजक कमांडर अनिल सावे यांनी सांगितले की, वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांची मिळून दररोज २५ ते ३० ट्रक औषधी केरळ राज्यात जाते. मात्र, मागील आठ दिवसांपासून एकही ट्रक केरळकडे रवाना झाली नाही. याचा आर्थिक फटका औषधी कंपन्यांना बसत आहे. ही औषधी दुसऱ्या राज्यांकडे वळविण्यात येत आहे. जे. के. अ‍ॅन्सेल कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक बी. डी. भूमकर यांनी सांगितले की, केरळ, कर्नाटक व तामिळनाडूमधून रबर येथे येते. त्यातील ८० टक्के रबरची निर्मिती एकट्या केरळात होते. महिनाभरात सुमारे १५ ट्रक लॅटेक्स रबर येथील औद्योेगिक वसाहतीत मागविले जाते. केरळमधून रबर येत नसले तरी कर्नाटक व तामिळनाडूचा पर्याय आहे. पण केरळच्या परिस्थितीचा रबरच्या आवकवर परिणाम निश्चित जाणवेल. टायर व ट्यूब बनविण्यासाठीही केरळ राज्यातून रबर मोठ्या प्रमाणात शहरात आणले जाते. कंपनीतील एका अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार महिनभरात १०० टनपेक्षा अधिक रबर केरळातून येत असते. टायर मोल्डिंगसाठीही या रबराचाच वापर होतो. माल वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष फय्याज खान म्हणाले की, औषधी व इतर उत्पादने घेऊन येथून दररोज ७० ते ८० ट्रक केरळला जात असतात. मात्र, अतिवृष्टीमुळे एकही ट्रक केरळात गेला नाही.इलायची, काळीमिरी, जायफळ, सुंठ, सुपारी महागलीइलायची, काळीमिरी, जायफळ, गोटा खोबरा, सुपारी उत्पादनात केरळ राज्य अग्रेसर आहे. यासंदर्भात मसाल्याचे व्यापारी शिवनारायण तोतला यांनी सांगितले की, इलायचीचा नवीन हंगाम सध्या सुरू आहे. मात्र, अतिवृष्टीने आवक थांबली असून, तेथील उत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, ५०० रुपयांनी इलायची महागली असून शुक्रवारी १५५० ते २००० रुपये प्रतिकिलोने विक्री झाली. ३० ते ४० रुपयांनी काळीमिरीचे भाव वाढून ५५० ते ७०० रुपये किलो झाले.जायपत्री १०० रुपयांनी वधारून १२०० ते १६०० रुपये किलो, सुंठमध्ये ४० रुपये वाढून २४० ते ३०० रुपये किलो तर किलोमागे १० ते २० रुपये वाढून सुपारी ३०० ते ३६० रुपयांना विकत आहे. खोबरा गोटा कर्नाटक, तामिळनाडूतूनही येत असल्याने खोबºयात भाववाढ झाली नाही. तसेच २० ते ३० टक्के चहापत्तीही केरळातून येते, पण आसाममधूनही चहापत्ती येत असल्याने परिणाम नाही.

टॅग्स :medicineऔषधंAurangabadऔरंगाबादKeralaकेरळ