शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

‘ती जात हलकी... आम्ही वरचे’ हा भाव सोडून ‘वंचिता’ला निवडून द्यायचे आहे, हे लक्षात ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 19:35 IST

वंचितालाही सत्तेत पाठवायचे आहे व त्यालाही निवडून द्यायचे आहे

ठळक मुद्देबंजारा समाजाच्या विविध ३० संघटनांचा पाठिंबा वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास

औरंगाबाद : ती जात हलकी, आम्ही त्यांच्यापेक्षा वरचे किंवा श्रेष्ठ, अशी एकमेकांबद्दलची भावना सोडून देऊन इतर वंचितालाही सत्तेत पाठवायचे आहे व त्यालाही निवडून द्यायचे आहे, हे लक्षात ठेवून विधानसभा निवडणुकीत मतदान झाल्यास वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही आणि आताचे जेवढे प्रश्न आहेत, ते सुटल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास आज येथे नेते अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिला. 

ते राधाकृष्ण मंगल कार्यालयात बंजारा समाज सत्ता संपादन मेळाव्यात बोलत होते. यानिमित्ताने मंगल कार्यालयाचे दोन्ही हॉल महाराष्ट्रभरातून आलेल्या बंजारा समाजबांधवांनी भरून गेले होते. बंजारा समाजाच्या विविध ३० संघटनांनी आज बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीला जाहीर पाठिंबा दिला व एकूण ४० जागांची मागणी केली. ज्या मतदारसंघात ५० हजारांहून अधिक बंजारा समाजाची संख्या आहे, तेथे ही तिकिटे दिली जावीत, अशी मागणी यावेळी प्रा. पी.टी. चव्हाण यांनी केली. हल्ली जो उठतो तो बाळासाहेबांना भेटतो आणि तिकिटाची मागणी करतो. तिकिटे देताना शहानिशा केली जावी आणि गोर बंजारा समन्वय समितीची शिफारस ग्राह्य धरावी, असे आजच प्रा. पी.टी. चव्हाण व राजपालसिंग राठोड यांनी सांगून ठेवले, तर माजी नगरसेवक कृष्णा बनकर यांनी आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केल्याबरोबर, औरंगाबाद मध्यमधून बौद्ध उमेदवारास तिकीट दिले जावे, अशी मागणी केली. 

नियोजित वेळेपेक्षा तब्बल अडीच तास उशिरा मेळावा सुरू झाला. तोपर्यंत नरेंद्र राठोड व संचाने क्रांतिकारी गीते गाऊन उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले. सूत्रसंचालक अंबरसिंग चव्हाण यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. पाहुण्यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. एकाच मोठ्या हारात मंचावरील सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. बाळासाहेब व खा. इम्तियाज जलील यांचे स्वागत ‘बंजारा लेणे’ देऊन करण्यात आले. दोघांनीही हे लेणे शेवटपर्यंत काढले नाही. प्रल्हाद राठोड, सौ. बनकर, शारदा चव्हाण, तुषार राठोड, सुनील चव्हाण, चुनीलाल जाधव, अनिल चव्हाण, मोतीलाल चव्हाण, डॉ. कृष्णा राठोड, मनोहर चव्हाण, आयेशा आत्माराम राठोड, महेश तांबे, अतिश रामराव राठोड, सुमित चव्हाण, अरविंद चव्हाण, दिनेश राठोड, नरेंद्र राठोड आदींना संविधानाची प्रत देऊन आंबेडकर यांनी ‘वंचित’मध्ये प्रवेश दिला. ‘मी कोण... मी कोण, बाळासाहेब बाळासाहेब’ अशा घोषणा यावेळी निनादत होत्या.प्राचार्य ग.ह. राठोड यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणाऱ्या ‘प्रतिभावंत’ या गौरव अंकाचे प्रकाशन बाळासाहेबांच्या हस्ते करण्यात आला.

बंद करो ये प्रवेश...यावेळी बोलताना खा. इम्तियाज जलील यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना सल्ला दिला की, अब ये प्रवेश बंद करो. क्योंकि अब पुरा महाराष्ट्रही आपके साथ आ गया है. (टाळ्या) मेळाव्यात जलील हे उशिरा आले आणि लोकसभा अधिवेशनाला जायचं आहे, म्हणून भाषण करून निघूनही गेले. ते मंचावर आले आणि त्यांना जागा देण्यासाठी एक-एक जण खुर्ची रिकामा करूलागला. बाळासाहेबांच्या शेजारी बसलेले राजपालसिंग राठोडही उठत होते; पण बाळासाहेबांना राजपालसिंग यांना उठू नका, असा इशारा केला आणि राजपालसिंगांच्या बाजूला जलील यांना बसावे लागले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAurangabadऔरंगाबाद