शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

‘ती जात हलकी... आम्ही वरचे’ हा भाव सोडून ‘वंचिता’ला निवडून द्यायचे आहे, हे लक्षात ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 19:35 IST

वंचितालाही सत्तेत पाठवायचे आहे व त्यालाही निवडून द्यायचे आहे

ठळक मुद्देबंजारा समाजाच्या विविध ३० संघटनांचा पाठिंबा वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास

औरंगाबाद : ती जात हलकी, आम्ही त्यांच्यापेक्षा वरचे किंवा श्रेष्ठ, अशी एकमेकांबद्दलची भावना सोडून देऊन इतर वंचितालाही सत्तेत पाठवायचे आहे व त्यालाही निवडून द्यायचे आहे, हे लक्षात ठेवून विधानसभा निवडणुकीत मतदान झाल्यास वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही आणि आताचे जेवढे प्रश्न आहेत, ते सुटल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास आज येथे नेते अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिला. 

ते राधाकृष्ण मंगल कार्यालयात बंजारा समाज सत्ता संपादन मेळाव्यात बोलत होते. यानिमित्ताने मंगल कार्यालयाचे दोन्ही हॉल महाराष्ट्रभरातून आलेल्या बंजारा समाजबांधवांनी भरून गेले होते. बंजारा समाजाच्या विविध ३० संघटनांनी आज बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीला जाहीर पाठिंबा दिला व एकूण ४० जागांची मागणी केली. ज्या मतदारसंघात ५० हजारांहून अधिक बंजारा समाजाची संख्या आहे, तेथे ही तिकिटे दिली जावीत, अशी मागणी यावेळी प्रा. पी.टी. चव्हाण यांनी केली. हल्ली जो उठतो तो बाळासाहेबांना भेटतो आणि तिकिटाची मागणी करतो. तिकिटे देताना शहानिशा केली जावी आणि गोर बंजारा समन्वय समितीची शिफारस ग्राह्य धरावी, असे आजच प्रा. पी.टी. चव्हाण व राजपालसिंग राठोड यांनी सांगून ठेवले, तर माजी नगरसेवक कृष्णा बनकर यांनी आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केल्याबरोबर, औरंगाबाद मध्यमधून बौद्ध उमेदवारास तिकीट दिले जावे, अशी मागणी केली. 

नियोजित वेळेपेक्षा तब्बल अडीच तास उशिरा मेळावा सुरू झाला. तोपर्यंत नरेंद्र राठोड व संचाने क्रांतिकारी गीते गाऊन उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले. सूत्रसंचालक अंबरसिंग चव्हाण यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. पाहुण्यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. एकाच मोठ्या हारात मंचावरील सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. बाळासाहेब व खा. इम्तियाज जलील यांचे स्वागत ‘बंजारा लेणे’ देऊन करण्यात आले. दोघांनीही हे लेणे शेवटपर्यंत काढले नाही. प्रल्हाद राठोड, सौ. बनकर, शारदा चव्हाण, तुषार राठोड, सुनील चव्हाण, चुनीलाल जाधव, अनिल चव्हाण, मोतीलाल चव्हाण, डॉ. कृष्णा राठोड, मनोहर चव्हाण, आयेशा आत्माराम राठोड, महेश तांबे, अतिश रामराव राठोड, सुमित चव्हाण, अरविंद चव्हाण, दिनेश राठोड, नरेंद्र राठोड आदींना संविधानाची प्रत देऊन आंबेडकर यांनी ‘वंचित’मध्ये प्रवेश दिला. ‘मी कोण... मी कोण, बाळासाहेब बाळासाहेब’ अशा घोषणा यावेळी निनादत होत्या.प्राचार्य ग.ह. राठोड यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणाऱ्या ‘प्रतिभावंत’ या गौरव अंकाचे प्रकाशन बाळासाहेबांच्या हस्ते करण्यात आला.

बंद करो ये प्रवेश...यावेळी बोलताना खा. इम्तियाज जलील यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना सल्ला दिला की, अब ये प्रवेश बंद करो. क्योंकि अब पुरा महाराष्ट्रही आपके साथ आ गया है. (टाळ्या) मेळाव्यात जलील हे उशिरा आले आणि लोकसभा अधिवेशनाला जायचं आहे, म्हणून भाषण करून निघूनही गेले. ते मंचावर आले आणि त्यांना जागा देण्यासाठी एक-एक जण खुर्ची रिकामा करूलागला. बाळासाहेबांच्या शेजारी बसलेले राजपालसिंग राठोडही उठत होते; पण बाळासाहेबांना राजपालसिंग यांना उठू नका, असा इशारा केला आणि राजपालसिंगांच्या बाजूला जलील यांना बसावे लागले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAurangabadऔरंगाबाद