शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

त्रासाकडे दुर्लक्ष करणे पडले महागात;कशीश हत्याकांडाच्या 'क्राईम सीन' मधून अनेक बाबींचा उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 15:25 IST

Kashish murder Case: महाविद्यालयीन विद्यार्थिनी कशीशचा २१ जून रोजी रचनाकार कॉलनीतील रिकाम्या प्लॉटमध्ये ओढत नेऊन शरणसिंग याने निर्घृणपणे खून केला होता.

औरंगाबाद : महाविद्यालयीन विद्यार्थिनी सुखप्रीत कौर ऊर्फ कशीशच्या हत्येचा क्राईम सीन शहर पोलिसांनी शुक्रवारी तयार केला. यामध्ये आरोपी शरणसिंग सेठी याने घटनेच्या दिवशी सकाळपासून तिचा पाठलाग केलेल्या घटनाही चित्रित केल्या आहेत. दरम्यान, आरोपीची पोलीस कोठडी संपल्यामुळे तपास अधिकाऱ्यांनी शरणसिंगला न्यायालयात हजर केले असता, त्यास २ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एस. डी. कुऱ्हेकर यांनी दिले.

महाविद्यालयीन विद्यार्थिनी कशीशचा २१ जून रोजी रचनाकार कॉलनीतील रिकाम्या प्लॉटमध्ये ओढत नेऊन शरणसिंग याने निर्घृणपणे खून केला होता. त्यास गुन्हे शाखा पोलिसांनी २२ जून रोजी लासलगावात अटक केली. न्यायालयाने सुरुवातीला त्यास २७ मेपर्यंत पोलीस कोठडी दिली. ही मुदत शुक्रवारी संपत असल्यामुळे तपास अधिकारी निरीक्षक अविनाश आघाव यांनी आरोपीला न्यायालयात हजर केले. सहायक सरकारी वकील दत्तात्रय काठुळे यांनी अधिक तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. ही मागणी न्यायाधीशांनी मान्य केली. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस आयुक्तांनी निरीक्षक आघाव यांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना केली आहे. ही एसआयटी अतिशय वेगवान पद्धतीने आरोपीच्या विरोधातील पुरावे जमा करीत आहेत. निरीक्षक आघाव, सायबरचे निरीक्षक गौतम पातारे, उस्मानपुऱ्याच्या निरीक्षक गीता बागवडे, सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांनी शुक्रवारी घटनास्थळावर घटनेच्या दिवशी घडलेला सीन तयार केला. आरोपी कशीशच्या पाठीमागे एकतर्फी कसा लागलेला होता. त्याविषयी आरोपीला घेऊन चित्रण केले. याशिवाय गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कल्याण शेळके, पवन इंगळे, अमोल म्हस्के, अजित दगडखैर यांच्यासह वेदांतनगरचे उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंडे हे गुन्ह्यातील विविध पुरावे जोडण्यासाठी काम करीत आहेत.

१५ पेक्षा अधिक जबाब नोंदवलेतपास पथकांनी गुन्ह्याशी संबंधित असलेल्या १५ पेक्षा अधिकजणांचे जबाब नोंदवले आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तींनाही साक्षीदार करण्यात येणार आहे. तसेच आरोपीच्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडून त्याची माहिती नोंदवली आहे.

आरोपीने हातावर गोंदवले नावआरोपी शरणसिंग याने एकतर्फी प्रेम करतानाच स्वत:च्या हातावर कशीश हे नाव गोंदवून घेतले होते. तसेच त्याने काही महिन्यांपूर्वी हातावर चाकूने वार करून कशीशला ब्लॅकमेल केल्याचेही समोर आले आहे.

दुर्लक्ष करणे पडले महागातआरोपी कशीशला अनेक महिन्यांपासून त्रास देत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. घटनेच्या दिवशीही त्याने विविध ठिकाणी तिच्यासोबत वाद घातला. या सर्व घटनांकडे कशीशने दुर्लक्ष केल्यामुळे आरोपीची हिंमत अधिक वाढली. कशीश आपली होऊ शकत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने तिचा खून केल्याचे चौकशीत समोर आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू