शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कलारंगच्या ‘काव्यधारा’: तू पत्र जाळल्यावर मी राख झालो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 7:32 PM

प्रेमाचा कायम ‘अनुशेष’ राहिलेल्या तरुणांच्या दु:खापासून ते पोराबाळांसाठी मरमर करणार्‍या आई-बापाच्या उतारवयातील यातना मांडणार्‍या कवितांचा शहरवासीयांनी अस्सल साहित्यानंद लुटला.

औरंगाबाद : प्रेमाचा कायम ‘अनुशेष’ राहिलेल्या तरुणांच्या दु:खापासून ते पोराबाळांसाठी मरमर करणार्‍या आई-बापाच्या उतारवयातील यातना मांडणार्‍या कवितांचा शहरवासीयांनी अस्सल साहित्यानंद लुटला. निमित्त होते कलारंग सांस्कृतिक मंचतर्फे आयोजित ‘काव्यधारा’ या राज्यस्तरीय काव्यसंमेलनाचे.

तापडिया नाट्यमंदिरात मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी (दि.२६) पार पडलेल्या या कार्यक्रमात राज्यभरातील नऊ निमंत्रित कवींनी सहभाग नोंदविला.  खालापूरच्या विशाल उशिरेने ‘बाप’ नावाच्या कवितेतून घामात अश्रू लपविणार्‍या बापाची कहाणी मांडत सुरवात केली.   बापावर लिहायचे राहून गेल्याची सल व्यक्त करताना तो म्हणतो, ‘आमचे मळे फुलवले, पण तुझे शिवार करपले.’ पोराबाळांसाठी कायमच तोट्यात जाणारा बाप मोठा व्यापारी, या शब्दांनी रसिकांची भरभरून दाद मिळवली. बेळगावच्या पूजा भडांगे हिने ‘पानाच्या अंगावरती शहारलेला काटा गं’ कविता सादर केली.

रायगडचा युवा गझलकार बंडू अंधेरेने प्रिया प्रकाश वॉरियरचा संदर्भ देत सुरुवात केली, ‘तिच्या रोखून नजरेला नजर, मी चाललो होतो, तिने मारला डोळा, मी लाजलो होतो.’ यावर तरुण रसिकांनी तुडुंब भरलेल्या सभागृहाचा ‘माहोल’च ढवळला . प्रेमवीरांना ‘ठेवू नको इतका विश्वास पापण्यावर’ असा सल्ला देताना तो म्हणाला, ‘तू पत्र जाळल्यावर मी राख झालो.’  प्रेमात ‘कमनशिबी’ ठरलेल्यांचे दु:ख शब्दांत कैद करीत कोल्हापूरचा उमेश सुतार म्हणाला की, ‘तुझ्या आठवणी छळत नाही मला, तुझ्या आठवणींना मीच छळतो.’ ‘तोवर प्रेम करीन’ या कवितेत तो म्हणतो, ‘माझ्या प्रेमाची बँक सतत बुडीत आहे, सव्याज परतफेड करेपर्यंत प्रेम करीन मी, काळजाचे ठोके नाराज होईपर्यंत प्रेम करीन मी.’

तसेच मुंबईची यामिनी दळवी, यवतमाळची स्नेहा ढोल, अंबाजोगाईचा अविनाश भारती, हिंगोलीचा ध. सू. जाधव आणि स्थानिक कवी नीलेश चव्हाण यांनीही कविता सादर केल्या. निवेदक नीलेश चव्हाणने नीरव मोदीपासून ‘पकोड्या’पर्यंत कोपरखळ्या मारत सर्वांना खळखळून हसविले. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद