शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडूत चेंगराचेंगरीमुळे गेला ३१ जणांचा जीव, अभिनेत्याला पाहण्याचा नादात मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
5
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
6
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
7
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
8
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
9
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
10
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
11
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
12
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
13
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
14
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
15
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
16
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
17
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
18
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
19
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
20
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी

नुसती चर्चा; उपाय नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 10:49 IST

शहराला मागील एक महिन्यापासून कचऱ्याचा प्रश्न भेडसावत असताना पुन्हा एकदा महापालिका सर्वसाधारण सभेत तब्बल दोन तास चर्चा करण्यात आली. यातून ठोस असा कोणताच निर्णय घेण्यात आला नाही.

औरंगाबाद : शहराला मागील एक महिन्यापासून कचऱ्याचा प्रश्न भेडसावत असताना पुन्हा एकदा महापालिका सर्वसाधारण सभेत तब्बल दोन तास चर्चा करण्यात आली. यातून ठोस असा कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. नाशिक येथील एक संस्था मंगळवारपासून रस्त्यावर पडलेल्या कच-यावर जागीच प्रक्रिया करणार असल्याची घोषणा करण्यात आली. आता हा प्रयोग कितपत यशस्वी होतो हे लवकरच दिसून येईल.

सोमवारी सकाळी ११.३० वाजता सभेला सुरुवात होताच सवयीनुसार नगरसेवकांनी कच-यावर हल्लाबोल केला. सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. काहींनी प्रशासनाला यातून मार्ग कसा काढायचा, याचा सल्लाही दिला. ज्या वॉर्डांमध्ये ओला व सुका कचरा वेगळा करून ओल्या कच-यावर प्रक्रिया सुरू आहे त्या लोकप्रतिनिधींनी आमचा आदर्श घ्यावा, असेही नमूद केले. प्लास्टिक, कॅरिबॅगवर शंभर टक्के बंदी घालावी, अ‍ॅक्शन प्लॅन तयार करावा, आदी असंख्य मागण्या करण्यात आल्या. या चर्चेत नगरसेवकांनी भाग घेतला. दीड तासाच्या चर्चेनंतर प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांनी माईकचा ताबा घेतला.

शहरातील रस्त्यावर फक्त एक हजार मेट्रिक टन कचरा असल्याचा दावा त्यांनी केला. कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी ८६ कोटींचा डीपीआर मंजूर झाला आहे. यामध्ये नारेगाव येथील कच-यावर प्रक्रिया करण्याचा उल्लेख नाही. नारेगावच्या कच-यावर ५० कोटींपेक्षा अधिक रक्कम लागेल. ती मनपा फंडातून करावी लागणार आहे. सध्या साचलेल्या कच-यावर प्रक्रिया करण्याचे मोठे आव्हान आहे. नाशिकच्या कुंभमेळ्यात ज्या संस्थेने काम केले त्या संस्थेला पाचारण करण्यात आले असून, मंगळवारपासून ही संस्था काम करणार आहे. कचरा वेचकांना मानधन देऊन काम करून घेतले जाणार आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वॉर्डनिहाय बैठका घेण्यात येतील.उद्या डीपीआरची अंमलबजावणी करायची तर २७ ठिकाणी कचºयावर प्रक्रिया करणा-या मशीन कुठे लावणार, हा मोठा प्रश्न, असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिकाcommissionerआयुक्त