शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

नुसती चर्चा; उपाय नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 10:49 IST

शहराला मागील एक महिन्यापासून कचऱ्याचा प्रश्न भेडसावत असताना पुन्हा एकदा महापालिका सर्वसाधारण सभेत तब्बल दोन तास चर्चा करण्यात आली. यातून ठोस असा कोणताच निर्णय घेण्यात आला नाही.

औरंगाबाद : शहराला मागील एक महिन्यापासून कचऱ्याचा प्रश्न भेडसावत असताना पुन्हा एकदा महापालिका सर्वसाधारण सभेत तब्बल दोन तास चर्चा करण्यात आली. यातून ठोस असा कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. नाशिक येथील एक संस्था मंगळवारपासून रस्त्यावर पडलेल्या कच-यावर जागीच प्रक्रिया करणार असल्याची घोषणा करण्यात आली. आता हा प्रयोग कितपत यशस्वी होतो हे लवकरच दिसून येईल.

सोमवारी सकाळी ११.३० वाजता सभेला सुरुवात होताच सवयीनुसार नगरसेवकांनी कच-यावर हल्लाबोल केला. सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. काहींनी प्रशासनाला यातून मार्ग कसा काढायचा, याचा सल्लाही दिला. ज्या वॉर्डांमध्ये ओला व सुका कचरा वेगळा करून ओल्या कच-यावर प्रक्रिया सुरू आहे त्या लोकप्रतिनिधींनी आमचा आदर्श घ्यावा, असेही नमूद केले. प्लास्टिक, कॅरिबॅगवर शंभर टक्के बंदी घालावी, अ‍ॅक्शन प्लॅन तयार करावा, आदी असंख्य मागण्या करण्यात आल्या. या चर्चेत नगरसेवकांनी भाग घेतला. दीड तासाच्या चर्चेनंतर प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांनी माईकचा ताबा घेतला.

शहरातील रस्त्यावर फक्त एक हजार मेट्रिक टन कचरा असल्याचा दावा त्यांनी केला. कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी ८६ कोटींचा डीपीआर मंजूर झाला आहे. यामध्ये नारेगाव येथील कच-यावर प्रक्रिया करण्याचा उल्लेख नाही. नारेगावच्या कच-यावर ५० कोटींपेक्षा अधिक रक्कम लागेल. ती मनपा फंडातून करावी लागणार आहे. सध्या साचलेल्या कच-यावर प्रक्रिया करण्याचे मोठे आव्हान आहे. नाशिकच्या कुंभमेळ्यात ज्या संस्थेने काम केले त्या संस्थेला पाचारण करण्यात आले असून, मंगळवारपासून ही संस्था काम करणार आहे. कचरा वेचकांना मानधन देऊन काम करून घेतले जाणार आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वॉर्डनिहाय बैठका घेण्यात येतील.उद्या डीपीआरची अंमलबजावणी करायची तर २७ ठिकाणी कचºयावर प्रक्रिया करणा-या मशीन कुठे लावणार, हा मोठा प्रश्न, असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिकाcommissionerआयुक्त