शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

नुसती चर्चा; उपाय नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 10:49 IST

शहराला मागील एक महिन्यापासून कचऱ्याचा प्रश्न भेडसावत असताना पुन्हा एकदा महापालिका सर्वसाधारण सभेत तब्बल दोन तास चर्चा करण्यात आली. यातून ठोस असा कोणताच निर्णय घेण्यात आला नाही.

औरंगाबाद : शहराला मागील एक महिन्यापासून कचऱ्याचा प्रश्न भेडसावत असताना पुन्हा एकदा महापालिका सर्वसाधारण सभेत तब्बल दोन तास चर्चा करण्यात आली. यातून ठोस असा कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. नाशिक येथील एक संस्था मंगळवारपासून रस्त्यावर पडलेल्या कच-यावर जागीच प्रक्रिया करणार असल्याची घोषणा करण्यात आली. आता हा प्रयोग कितपत यशस्वी होतो हे लवकरच दिसून येईल.

सोमवारी सकाळी ११.३० वाजता सभेला सुरुवात होताच सवयीनुसार नगरसेवकांनी कच-यावर हल्लाबोल केला. सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. काहींनी प्रशासनाला यातून मार्ग कसा काढायचा, याचा सल्लाही दिला. ज्या वॉर्डांमध्ये ओला व सुका कचरा वेगळा करून ओल्या कच-यावर प्रक्रिया सुरू आहे त्या लोकप्रतिनिधींनी आमचा आदर्श घ्यावा, असेही नमूद केले. प्लास्टिक, कॅरिबॅगवर शंभर टक्के बंदी घालावी, अ‍ॅक्शन प्लॅन तयार करावा, आदी असंख्य मागण्या करण्यात आल्या. या चर्चेत नगरसेवकांनी भाग घेतला. दीड तासाच्या चर्चेनंतर प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांनी माईकचा ताबा घेतला.

शहरातील रस्त्यावर फक्त एक हजार मेट्रिक टन कचरा असल्याचा दावा त्यांनी केला. कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी ८६ कोटींचा डीपीआर मंजूर झाला आहे. यामध्ये नारेगाव येथील कच-यावर प्रक्रिया करण्याचा उल्लेख नाही. नारेगावच्या कच-यावर ५० कोटींपेक्षा अधिक रक्कम लागेल. ती मनपा फंडातून करावी लागणार आहे. सध्या साचलेल्या कच-यावर प्रक्रिया करण्याचे मोठे आव्हान आहे. नाशिकच्या कुंभमेळ्यात ज्या संस्थेने काम केले त्या संस्थेला पाचारण करण्यात आले असून, मंगळवारपासून ही संस्था काम करणार आहे. कचरा वेचकांना मानधन देऊन काम करून घेतले जाणार आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वॉर्डनिहाय बैठका घेण्यात येतील.उद्या डीपीआरची अंमलबजावणी करायची तर २७ ठिकाणी कचºयावर प्रक्रिया करणा-या मशीन कुठे लावणार, हा मोठा प्रश्न, असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिकाcommissionerआयुक्त