शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

असा आहे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेल्या अनुराधा पाटील यांचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 14:11 IST

सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या अनुराधातार्इंनी पहूर येथील आर. टी. लेले हायस्कू ल येथून शालेय शिक्षण घेतले.

‘कदाचित अजूनही’ हा अनुराधा पाटील यांचा पाचवा कविता संग्रह असून, तो २०१७ साली प्रकाशित झाला. यामध्ये विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या एकूण ५० कविता आहेत. याव्यतिरिक्त त्यांची दिगंत (कविता संग्रह), २. तरीही (कविता संग्रह), दिवसेंदिवस (कविता संग्रह), वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ (कविता संग्रह), नवसाला पावली डॉक्टरीण  (प्रौढ साक्षरांसाठी दीर्घकथा), दरअसल (कविता संग्रह, हिंदी अनुवाद) ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ‘अनुराधा पाटील री टाळवीं मराठी कवितावां’ हा त्यांच्या कवितांचा राजस्थानी अनुवादही प्रसिद्ध झाला आहे. 

अनुराधा पाटील यांचा जन्म पहूर (ता. जामनेर, जि. जळगाव) या गावी ५ एप्रिल १९५३ साली झाला. सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या अनुराधातार्इंनी पहूर येथील आर. टी. लेले हायस्कू ल येथून शालेय शिक्षण घेतले. कविता लिहिणे, वक्तृत्व या गोष्टी शालेय जीवनापासूनच बहरत होत्या. मराठीचे प्राध्यापक असलेले कौतिकराव ठाले पाटील यांच्याशी विवाह झाल्यानंतर कविता लिखाणाला आणखीनच प्रोत्साहन मिळत गेले आणि एक प्रगल्भ कवयित्री म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्या. मागील ४५ वर्षांपासून अनुराधातार्इंचे लिखाण अविरतपणे सुरू आहे.

निवडक पुरस्कार1981 ‘दिगंत’ कविता संग्रहासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे सर्वोत्कृष्ट काव्यलेखन पुरस्कार.1986  ‘तरीही’ साठी मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद या संस्थेचा पहिला नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार.1986 ‘तरीही’साठी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या संस्थेचा पहिला कविवर्य कुसुमाग्रज काव्य पुरस्कार.1993  ‘तरीही’ ला महाराष्ट्र राज्य सरकारचा १९८६- ८७ या वर्षाचा उत्कृष्ट काव्यलेखनाचा केशवसुत काव्य पुरस्कार.1993 ‘दिवसेंदिवस’ला बहिणाबाई प्रतिष्ठान, पुणे या संस्थेचा उत्कृष्ट काव्यलेखनासाठी कवी ना. धों. महानोर काव्य पुरस्कार.1994 ‘दिवसेंदिवस’ला महाराष्ट्र फाऊंडेशन, न्यूयॉर्क, अमेरिका या संस्थेचा पहिला ललित वाङ्मय लेखनाचा पुरस्कार.2011  मराठवाडा साहित्य परिषदेचा कविवर्य कुसुमाग्रज वाङ्मय पुरस्कार.2011 कवी हरिश्चंद्र राय साहनी- दु:खी काव्य पुरस्कार, जालना.2011 बहिणाबाई मेमोरिअल ट्रस्ट आणि जैन फाऊंडेशन, जळगाव या संस्थेचा ‘बहिणाबाई सर्वोत्कृष्ट लेखिका जीवनगौरव वाङ्मय पुरस्कार’.2013 महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कविवर्य भा. रा. तांबे पुरस्कार.2014 साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट, मुंबई या संस्थेचा ‘दरअसल’ या अनुवादाला विंदा करंदीकर राष्ट्रीय पुरस्कार.2018 पळसखेडे येथून दिला जाणारा पहिला ‘रानगंध’ पुरस्कार. 

सन्मान : साहित्य अकादमी पुरस्कार निवडीसाठी तज्ज्ञ परीक्षक.2006 साली ‘अनुराधा पाटील यांची कविता’ या नावाने डॉ. दादा गोरे यांनी संपादित केलेला २७२ पानांचा ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्यात अनेक मान्यवरांचे लेख आहेत.2019 साहित्य अकादमीच्या पूर्वोत्तरी आणि पश्चिमी भारतीय भाषा लेखिका संमेलनाच्या उद्घाटक 

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग२००६  व २००८ मध्ये जागतिक लेखक संमेलनात मान्यवर मराठी कवी म्हणून पाश्चिमात्य व पौर्वात्य देशांतील निरनिराळ्या भाषांतील कवींसोबत मराठीचे प्रतिनिधित्व.२०१३ साली मराठवाडा साहित्य परिषदेचे ‘अनुराधा पाटील यांची कविता’ या विषयावर दोन दिवसांचे चर्चासत्र झाले होते. त्यात एकूण १४ अभ्यासकांनी त्यांच्या कवितेच्या सामर्थ्याचा, वेगळेपणा आणि मर्यादांचा निरनिराळ्या अंगांनी विचार केला. तसेच विविध शहरांमध्ये आणि साहित्य परिषदांमध्ये त्यांच्या कवितांवर चर्चासत्रे आयोजित केलेली आहेत. 

साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात संस्थात्मक कार्य1977-80 मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणी सदस्य2000-04 महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्य2003-07 कोलकाता येथील भारतीय भाषा परिषद या संस्थेवर मानद सल्लागार सदस्य

टॅग्स :literatureसाहित्यmarathiमराठीAurangabadऔरंगाबाद