शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

असा आहे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेल्या अनुराधा पाटील यांचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 14:11 IST

सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या अनुराधातार्इंनी पहूर येथील आर. टी. लेले हायस्कू ल येथून शालेय शिक्षण घेतले.

‘कदाचित अजूनही’ हा अनुराधा पाटील यांचा पाचवा कविता संग्रह असून, तो २०१७ साली प्रकाशित झाला. यामध्ये विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या एकूण ५० कविता आहेत. याव्यतिरिक्त त्यांची दिगंत (कविता संग्रह), २. तरीही (कविता संग्रह), दिवसेंदिवस (कविता संग्रह), वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ (कविता संग्रह), नवसाला पावली डॉक्टरीण  (प्रौढ साक्षरांसाठी दीर्घकथा), दरअसल (कविता संग्रह, हिंदी अनुवाद) ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ‘अनुराधा पाटील री टाळवीं मराठी कवितावां’ हा त्यांच्या कवितांचा राजस्थानी अनुवादही प्रसिद्ध झाला आहे. 

अनुराधा पाटील यांचा जन्म पहूर (ता. जामनेर, जि. जळगाव) या गावी ५ एप्रिल १९५३ साली झाला. सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या अनुराधातार्इंनी पहूर येथील आर. टी. लेले हायस्कू ल येथून शालेय शिक्षण घेतले. कविता लिहिणे, वक्तृत्व या गोष्टी शालेय जीवनापासूनच बहरत होत्या. मराठीचे प्राध्यापक असलेले कौतिकराव ठाले पाटील यांच्याशी विवाह झाल्यानंतर कविता लिखाणाला आणखीनच प्रोत्साहन मिळत गेले आणि एक प्रगल्भ कवयित्री म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्या. मागील ४५ वर्षांपासून अनुराधातार्इंचे लिखाण अविरतपणे सुरू आहे.

निवडक पुरस्कार1981 ‘दिगंत’ कविता संग्रहासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे सर्वोत्कृष्ट काव्यलेखन पुरस्कार.1986  ‘तरीही’ साठी मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद या संस्थेचा पहिला नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार.1986 ‘तरीही’साठी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या संस्थेचा पहिला कविवर्य कुसुमाग्रज काव्य पुरस्कार.1993  ‘तरीही’ ला महाराष्ट्र राज्य सरकारचा १९८६- ८७ या वर्षाचा उत्कृष्ट काव्यलेखनाचा केशवसुत काव्य पुरस्कार.1993 ‘दिवसेंदिवस’ला बहिणाबाई प्रतिष्ठान, पुणे या संस्थेचा उत्कृष्ट काव्यलेखनासाठी कवी ना. धों. महानोर काव्य पुरस्कार.1994 ‘दिवसेंदिवस’ला महाराष्ट्र फाऊंडेशन, न्यूयॉर्क, अमेरिका या संस्थेचा पहिला ललित वाङ्मय लेखनाचा पुरस्कार.2011  मराठवाडा साहित्य परिषदेचा कविवर्य कुसुमाग्रज वाङ्मय पुरस्कार.2011 कवी हरिश्चंद्र राय साहनी- दु:खी काव्य पुरस्कार, जालना.2011 बहिणाबाई मेमोरिअल ट्रस्ट आणि जैन फाऊंडेशन, जळगाव या संस्थेचा ‘बहिणाबाई सर्वोत्कृष्ट लेखिका जीवनगौरव वाङ्मय पुरस्कार’.2013 महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कविवर्य भा. रा. तांबे पुरस्कार.2014 साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट, मुंबई या संस्थेचा ‘दरअसल’ या अनुवादाला विंदा करंदीकर राष्ट्रीय पुरस्कार.2018 पळसखेडे येथून दिला जाणारा पहिला ‘रानगंध’ पुरस्कार. 

सन्मान : साहित्य अकादमी पुरस्कार निवडीसाठी तज्ज्ञ परीक्षक.2006 साली ‘अनुराधा पाटील यांची कविता’ या नावाने डॉ. दादा गोरे यांनी संपादित केलेला २७२ पानांचा ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्यात अनेक मान्यवरांचे लेख आहेत.2019 साहित्य अकादमीच्या पूर्वोत्तरी आणि पश्चिमी भारतीय भाषा लेखिका संमेलनाच्या उद्घाटक 

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग२००६  व २००८ मध्ये जागतिक लेखक संमेलनात मान्यवर मराठी कवी म्हणून पाश्चिमात्य व पौर्वात्य देशांतील निरनिराळ्या भाषांतील कवींसोबत मराठीचे प्रतिनिधित्व.२०१३ साली मराठवाडा साहित्य परिषदेचे ‘अनुराधा पाटील यांची कविता’ या विषयावर दोन दिवसांचे चर्चासत्र झाले होते. त्यात एकूण १४ अभ्यासकांनी त्यांच्या कवितेच्या सामर्थ्याचा, वेगळेपणा आणि मर्यादांचा निरनिराळ्या अंगांनी विचार केला. तसेच विविध शहरांमध्ये आणि साहित्य परिषदांमध्ये त्यांच्या कवितांवर चर्चासत्रे आयोजित केलेली आहेत. 

साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात संस्थात्मक कार्य1977-80 मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणी सदस्य2000-04 महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्य2003-07 कोलकाता येथील भारतीय भाषा परिषद या संस्थेवर मानद सल्लागार सदस्य

टॅग्स :literatureसाहित्यmarathiमराठीAurangabadऔरंगाबाद