शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

जेईई अ‍ॅडव्हान्सचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2016 00:48 IST

औरंगाबाद : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) विविध संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जॉर्इंट एंट्रन्स एक्झामिनेशन (जेईई) अ‍ॅडव्हान्सड् परीक्षेचा निकाल

औरंगाबाद : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) विविध संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जॉर्इंट एंट्रन्स एक्झामिनेशन (जेईई) अ‍ॅडव्हान्सड् परीक्षेचा निकाल आज रविवारी आॅनलाईन जाहीर झाला. शहरातील नारायणा आणि गायकवाड क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी भरीव यश संपादन केले आहे. २२ मे रोजी झालेल्या या परीक्षेला १ लाख ४७ हजार विद्यार्थी बसले होते. यातील ३६ हजार ५६६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यामध्ये ४ हजार ५७० मुली आहेत. जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत जोधपूरच्या अमान बन्सलने ३७२ गुण मिळवून देशात अव्वल स्थान पटकावले आहे. एकूण सात विभागांपैकी आयआयटी मुंबईसाठी सर्वाधिक ८,८१० विद्यार्थी पात्र झाले असून, त्यापाठोपाठ आयआयटी मद्राससाठी ६,७०२ विद्यार्थी आणि आयआयटी दिल्लीसाठी ५,९४१ विद्यार्थी पात्र झाले आहेत. यंदा पहिल्यांदाच औरंगाबाद शहरास जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी केंद्र मिळाले होते. औरंगाबादेत सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालय, देवगिरी महाविद्यालय आणि जेएनईसी, या तीन केंद्रांवर झालेल्या परीक्षेला बाराशेहून अधिक विद्यार्थी बसले होते. यंदा ही परीक्षा आयआयटी गुवाहाटीद्वारे आयोजित करण्यात आली होती. २० जून ते १९ जुलैदरम्यान आयआयटी प्रवेशासाठीची अर्ज प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. (जेईई सविस्तर वृत्त/पान ५ वर)