शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

विधानसभा निवडणुकीआधी जुन्या नेत्यांना पुन्हा पक्षात घेणार का? जयंत पाटलांनी थेटच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 17:13 IST

Jayant Patil : विधानसभा निवडणुकीआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार पुन्हा शरद पवार यांच्या पक्षात येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.

Jayant Patil ( Marathi News ) : लोकसभेच्या निवडणुका संपल्या. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले तर महायुतीला अपेक्षित जागा जिंकता आल्या नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकाच जागेवर विजय झाला. आता राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. दरम्यान, आता विधासभा निवडणुकीआधी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार पुन्हा शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.

मोठी बातमी: ७ जुलैपासून विठ्ठलाचं २४ तास दर्शन; मुख्यमंत्र्यांना दिले आषाढीच्या महापूजेचे निमंत्रण

जयंत पाटील म्हणाले, जुन्या नेत्यांना परत घेणे आता ही आमची प्रायोरिटी नाही. पण, जे कार्यकर्ते परत येऊ इच्छितात. जे सत्तेत गेलेले नाहीत किंवा ज्यांचा सत्ता मिळवण्यासाठी वापर झालेला आहे. असे काही घटक आहेत. ते वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात आहेत. आमच्याकडे नवीन चेहरेही यायला लागले आहेत. तरुण मुलं, तरुण कार्यकर्ते पुढं यायला लागले आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघाचा विचार करुन योग्य तो विचार करु, असंही जयंत पाटील म्हणाले. 

"आमच्या पक्षाला मधल्या काळात मोठ्या प्रमाणात त्रास झाला. त्यामुळे जे पक्षासाठी योग्य आहे तोच निर्णय घेऊ, असंही पाटील म्हणाले. फक्त संपर्क करणे, यावर बोलणे योग्य नाही. ज्यावेळी रिझल्ट येईल त्यावेळी यावर बोलेन, असंही पाटील म्हणाले.  

विधानसभा निवडणुकीत आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल. शिवसेनेलाही उद्धव ठाकरे यांच्यामुळे चांगला प्रतिसाद मिळेल. विधानसभा निवडणुकीत तिनही पक्षांना चांगला प्रतिसाद मिळेल, काही दिवसातच जागावाटपावर चर्चा होणार आहे, असंही आमदार जयंत पाटील म्हणाले. 

महाविकास आघाडीतील कुठल्याही पक्षाने मुख्यमंत्रिपदाबाबक भाष्य करणे टाळले पाहिजे

यावेळी बोलताना जयंत पाटील यांना पत्रकारांनी मुख्यमंत्रिपदाबाबत प्रश्न उपस्थित केला. यावेळी जयंत पाटील म्हणाले, जयंत पाटील किंवा अ , ब, क मुख्यमंत्री याच्यात कुठल्याही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्वारस्य ठेवू नये. आम्ही सत्तेवर आलो पाहिजे हे स्वारस्य पहिले पाहिजे. आज कुठल्याही पक्षाने मुख्यमंत्रिपदाबाबक भाष्य करणे टाळले पाहिजे, असंही जयंत पाटील म्हणाले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस