शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीआधी जुन्या नेत्यांना पुन्हा पक्षात घेणार का? जयंत पाटलांनी थेटच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 17:13 IST

Jayant Patil : विधानसभा निवडणुकीआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार पुन्हा शरद पवार यांच्या पक्षात येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.

Jayant Patil ( Marathi News ) : लोकसभेच्या निवडणुका संपल्या. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले तर महायुतीला अपेक्षित जागा जिंकता आल्या नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकाच जागेवर विजय झाला. आता राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. दरम्यान, आता विधासभा निवडणुकीआधी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार पुन्हा शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.

मोठी बातमी: ७ जुलैपासून विठ्ठलाचं २४ तास दर्शन; मुख्यमंत्र्यांना दिले आषाढीच्या महापूजेचे निमंत्रण

जयंत पाटील म्हणाले, जुन्या नेत्यांना परत घेणे आता ही आमची प्रायोरिटी नाही. पण, जे कार्यकर्ते परत येऊ इच्छितात. जे सत्तेत गेलेले नाहीत किंवा ज्यांचा सत्ता मिळवण्यासाठी वापर झालेला आहे. असे काही घटक आहेत. ते वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात आहेत. आमच्याकडे नवीन चेहरेही यायला लागले आहेत. तरुण मुलं, तरुण कार्यकर्ते पुढं यायला लागले आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघाचा विचार करुन योग्य तो विचार करु, असंही जयंत पाटील म्हणाले. 

"आमच्या पक्षाला मधल्या काळात मोठ्या प्रमाणात त्रास झाला. त्यामुळे जे पक्षासाठी योग्य आहे तोच निर्णय घेऊ, असंही पाटील म्हणाले. फक्त संपर्क करणे, यावर बोलणे योग्य नाही. ज्यावेळी रिझल्ट येईल त्यावेळी यावर बोलेन, असंही पाटील म्हणाले.  

विधानसभा निवडणुकीत आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल. शिवसेनेलाही उद्धव ठाकरे यांच्यामुळे चांगला प्रतिसाद मिळेल. विधानसभा निवडणुकीत तिनही पक्षांना चांगला प्रतिसाद मिळेल, काही दिवसातच जागावाटपावर चर्चा होणार आहे, असंही आमदार जयंत पाटील म्हणाले. 

महाविकास आघाडीतील कुठल्याही पक्षाने मुख्यमंत्रिपदाबाबक भाष्य करणे टाळले पाहिजे

यावेळी बोलताना जयंत पाटील यांना पत्रकारांनी मुख्यमंत्रिपदाबाबत प्रश्न उपस्थित केला. यावेळी जयंत पाटील म्हणाले, जयंत पाटील किंवा अ , ब, क मुख्यमंत्री याच्यात कुठल्याही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्वारस्य ठेवू नये. आम्ही सत्तेवर आलो पाहिजे हे स्वारस्य पहिले पाहिजे. आज कुठल्याही पक्षाने मुख्यमंत्रिपदाबाबक भाष्य करणे टाळले पाहिजे, असंही जयंत पाटील म्हणाले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस