शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

परळी औष्णिक केंद्रासाठी जायकवाडीचे पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 17:23 IST

औरंगाबाद, जालना, परभणी जिल्ह्यांतील लाभक्षेत्राला फायदा 

पैठण (जि. औरंगाबाद) : जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून परळी औष्णिक विद्युत केंद्रासाठी रविवारी दुपारी १०० क्युसेकचा विसर्ग करण्यात आला. दरम्यान, येत्या २४ तासांत टप्प्याटप्प्याने या विसर्गात वाढ करण्यात येईल, असे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आल्याने  या कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. जायकवाडीच्या पाणीपातळीत ८० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली असून, धरणात आवकही ६० हजार क्युसेकपेक्षा जास्त सुरू असल्याने जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण, शाखा अभियंता संदीप राठोड, बुद्धभूषण दाभाडे, आर. ई. चक्रे  आदींनी कालव्याचे दरवाजे उघडून १०० क्युसेक क्षमतेने विसर्गास प्रारंभ केला. दुपारी २ वाजेच्या सुमारास पुन्हा १०० क्युसेक क्षमतेने विसर्ग वाढवून तो २०० क्युसेक करण्यात आला. 

 

100 तीन दिवसांनी  पोहोचणार पाणीबीड जिल्ह्यातील परळी येथील औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी जायकवाडीच्या जलसाठ्यात आरक्षण आहे. नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्राचे तीन संच गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याने विद्युत केंद्राने डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडावे, अशी मागणी जायकवाडी प्रशासनाकडे नोंदविली होती. जायकवाडी  भरत आल्याने विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले. जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून सोडलेले पाणी खडका धरणात पोहोचण्यासाठी साधारणपणे ३ दिवस लागतात. 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबादBeedबीड