शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

परळी औष्णिक केंद्रासाठी जायकवाडीचे पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 17:23 IST

औरंगाबाद, जालना, परभणी जिल्ह्यांतील लाभक्षेत्राला फायदा 

पैठण (जि. औरंगाबाद) : जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून परळी औष्णिक विद्युत केंद्रासाठी रविवारी दुपारी १०० क्युसेकचा विसर्ग करण्यात आला. दरम्यान, येत्या २४ तासांत टप्प्याटप्प्याने या विसर्गात वाढ करण्यात येईल, असे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आल्याने  या कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. जायकवाडीच्या पाणीपातळीत ८० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली असून, धरणात आवकही ६० हजार क्युसेकपेक्षा जास्त सुरू असल्याने जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण, शाखा अभियंता संदीप राठोड, बुद्धभूषण दाभाडे, आर. ई. चक्रे  आदींनी कालव्याचे दरवाजे उघडून १०० क्युसेक क्षमतेने विसर्गास प्रारंभ केला. दुपारी २ वाजेच्या सुमारास पुन्हा १०० क्युसेक क्षमतेने विसर्ग वाढवून तो २०० क्युसेक करण्यात आला. 

 

100 तीन दिवसांनी  पोहोचणार पाणीबीड जिल्ह्यातील परळी येथील औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी जायकवाडीच्या जलसाठ्यात आरक्षण आहे. नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्राचे तीन संच गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याने विद्युत केंद्राने डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडावे, अशी मागणी जायकवाडी प्रशासनाकडे नोंदविली होती. जायकवाडी  भरत आल्याने विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले. जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून सोडलेले पाणी खडका धरणात पोहोचण्यासाठी साधारणपणे ३ दिवस लागतात. 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबादBeedबीड