शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरण सलग तिसऱ्या वर्षी भरले; अठरा दरवाज्यातून ९४३२ क्युसेकने गोदापात्रात विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2021 14:46 IST

Jayakwadi Dam जायकवाडी धरणातून विसर्ग करण्यात आल्याने गोदाकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

पैठण : जायकवाडी धरणाचा जलसाठा ९५% पेक्षा जास्त झालेला असताना पाणलोटक्षेत्रातून १,३८,००० क्युसेस अशी मोठ्या क्षमतेने आवक सुरू असल्याने जायकवाडी धरणाचे अठरा दरवाजे बुधवारी सकाळी अकरा वाजून सात मिनिटांनी अर्धा फुटाने वर उचलून ९४३२  क्युसेसने  गोदापात्रात  विसर्ग सुरु करण्यात आला. आवक लक्षात घेता टप्याटप्याने विसर्गात वाढ केली जाईल असे मुख्य अभियंता विजय घोगरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान गोदावरी पात्रात विसर्ग केल्याने गोदावरी दुथडी भरून प्रवाही झाली आहे. सलग तीसऱ्या वर्षी धरणातून विसर्ग करण्यात आला आहे.

गोदावरी नदीच्या पात्रात विसर्ग सुरु करण्यात आल्याने प्रशासनाच्या वतीने गोदाकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या धरणात एक लाख ३८ हजार क्युसेसने पाण्याची आवक सुरु असून धरण ९५ टक्के भरल्याने परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून प्रशासनाने आज धरणातून  विसर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या हस्ते धरणात दाखल झालेल्या नविन पाण्याचे विधीवत जलपुजन करुन दरवाजे उघडण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संभाजी गव्हाणे,मुख्य अभियंता विजय घोगरे, कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उप कार्यकारी अभियंता प्रेरणा बागुल, ज्ञानदेव शिरसाट, उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे,  तहसीलदार चंद्रकांत शेळके, न.प. मुख्याधिकारी संतोष आगळे, शाखा अभियंता विजय काकडे, बंडु अंधारे, गणेश खराडकर, राजाराम गायकवाड आदी उपस्थिती होते.

गेल्या पंधरा दिवसांपासून जायकवाडी धरणात पाण्याची सातत्याने जोरदार आवक होत असून बुधवारी सकाळी जवळपास १३८००० क्युसेस क्षमतेने धरणात आवक सुरू झाली त्यातच धरणाचा जलसाठा ९५% पेक्षा जास्त झाला, यामुळे तातडीने सकाळी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार धरणाचे  १० ते २७ या क्रमांकाचे दरवाजे सहा ईंचाने वर उचलून प्रतेकी ५२४ क्युसेस असा एकूण ९४३२ क्युसेस विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात आला.

औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाचे पाणी धरणात दाखल होत असताना नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातील दारणा ४३१६, गंगापूर १०५२१कश्यपी २१५० व नांदूरमधमेश्वर वेअर मधून ४५०८२ क्युसेस असा मोठा विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात आला आहे. दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातील भंडारदरा ५५४०, नीळवंडे ७१३३ ,ओझर वेअर ५७११ व मुळा धरणातून ३२५५ क्युसेस असा विसर्ग प्रवरा नदीत करण्यात आला आहे. दोन्ही जिल्ह्यातील पाणी जायकवाडी धरणात दाखल होणार असल्याने बुधवारी सायंकाळ पर्यंत जायकवाडी धरणातून टप्याटप्याने विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले.जायकवाडी धरणातून विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीला पुर आला असून गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादRainपाऊस