शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

जायकवाडी धरण @ ६६.५४%; नाशिक, नगर जिल्ह्यातून ५७ हजार क्युसेसने आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 19:42 IST

पावसाने उघडीप दिल्याने अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून होणारा विसर्ग घटवून नाममात्र करण्यात आले तर नाशिक जिल्ह्यातील विसर्ग काही प्रमाणात कमी करण्यात आले.

ठळक मुद्दे१२ तासात धरणाच्या जलसाठ्यात पाच टक्के अशी भरघोस वाढ

पैठण ( औरंगाबाद ) :  नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणसमुहातून मंगळवारी मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आल्याने बुधवारी सकाळपासून जायकवाडी धरणात ५७४५७ क्युसेस अशी मोठ्या क्षमतेने आवक सुरू आहे. १२ तासात धरणाच्या जलसाठ्यात पाच टक्के अशी भरघोस वाढ झाली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने तेथील धरणसमुहातून होणारे विसर्ग बुधवारी सायंकाळी ६ वाजता घटविण्यात आले आहेत अशी माहिती धरण नियंत्रण कक्षातून देण्यात आली. 

नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून मोठ्या प्रमाणावर झालेल्या विसर्गामुळे गोदावरी ४० हजार.क्युसेस क्षमतेने वहात असून अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून झालेल्या विसर्गामुळे प्रवरा नदीही २७ हजार क्युसेस अशी प्रवाही झाली आहे. अहमदनगरचे पाणी आज सकाळी ९ वाजता जायकवाडी धरणात येऊन धडकले. यामुळे दोन्ही नद्यांचे मिळून जायकवाडी धरणात ५७४५७ अशी मोठ्या क्षमतेने आवक झाली. दरम्यान, पावसाने उघडीप दिल्याने अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून होणारे विसर्ग  घटवून नाममात्र करण्यात आले तर नाशिक जिल्ह्यातील विसर्ग काही प्रमाणात कमी करण्यात आले.  बुधवारी सायंकाळी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा १४२५ क्युसेस, निळवंडे ६८५ क्युसेस व ओझर वेअर मधून १०९३ क्युसेस असा नाममात्र विसर्ग प्रवरेत करण्यात येत आहे. 

हेही वाचा - मराठवाड्यात ४२ ठिकाणी ढगफुटी; २० लाख ३९ हजार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

यामुळे प्रवरेच्या पाणीपातळीत घट होत आहे. नाशिक जिल्ह्यातील विसर्ग बुधवारी घटविण्यात आले असून दारणा २६७२क्युसेस, कडवा १२७२ क्युसेक्स, आळंदी ८० क्युसेस, वालदेवी ५९९ क्युसेस, गंगापूर ५५३ क्युसेस व नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यातून ८०४० क्युसेस असे विसर्ग सुरू आहेत. विसर्ग घटविण्यात आल्याने गोदावरीची पाणी पातळी काही प्रमाणात कमी होणार आहे. बुधवारी सायंकाळी ६ वा धरणाचा जलसाठा ६६.५४% एवढा झाला होता. दरम्यान गुरुवारी सकाळपर्यंत ७०% पेक्षा जास्त जलसाठा होईल अशी अपेक्षा धरण अभियंता विजय काकडे यांनी व्यक्त केली आहे. १५२२ जलक्षमता असलेल्या धरणाची पाणीपातळी १५१५.३४ फूट झाली असून धरणात एकूण जलसाठा २१८२.४४ दलघमी ( ७७.०६ टिएमसी ) तर उपयुक्त जलसाठा १४४४.४४४ दलघमी ( ५१ टिएमसी ) एवढा झाला आहे.

हेही वाचा - धक्कादायक ! औषधींसाठी रात्री मोजा २० हजार; दिवसा फक्त ४०० रुपये

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा