शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत गोपीनाथ गडावरून भागवत कराडांची यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 13:24 IST

Janashirwad Yatra of Bhagwat Karad in Marathawada : डॉ. भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेबाबत मुंडे भगिनी काय भूमिका घेतात, याकडे कार्यकर्त्यांसह सर्वांचेच लक्ष लागले होते.

ठळक मुद्दे१६ ऑगस्टपासून होणार सुरुवात गोपीनाथ गडावर जाऊन आशीर्वाद घेणार

औरंगाबाद : केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड ( Bhagwat Karad) यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील भाजपची जनआशीर्वाद यात्रा ( Janashirwad Yatra) १६ ऑगस्टपासून काढण्यात येणार असून, या यात्रेला माजी मंत्री पंकजा मुंडेंचीही ( Pankaja Munde) उपस्थिती राहणार आहे. ( Janashirwad Yatra of Bhagwat Karad from Gopinath Gad in the presence of Pankaja Munde) 

चार दिवसांपूर्वी दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे एक बैठक झाली. या बैठकीला औरंगाबादचे स्थानिक पदाधिकारीदेखील गेले होते. त्या बैठकीत जनआशीर्वाद यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. त्यात माजी मंत्री पंकजा यांच्या नाराजीबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी मुंडे यांना संपर्क करून यात्रेच्या आयोजनाची माहिती दिली. मुंडे या गोपीनाथगडावर यात्रेचे स्वागत करणार आहेत.

बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. त्यामुळे त्या नाराज असल्याचे बोलले जात आहे. यातूनच त्यांचे समर्थकदेखील नाराज झाल्याचे बोलले गेले. त्यामुळे डॉ. कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेबाबत मुंडे भगिनी काय भूमिका घेतात, याकडे कार्यकर्त्यांसह सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान, बीडमधील भाजप पदाधिकाऱ्यांना अद्याप यात्रेच्या नियोजनाबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसल्याचे समजते.

असा आहे जनआशीर्वाद यात्रेचा मार्ग१६ ऑगस्ट रोजी परळी आणि गोपीनाथगडावरून या यात्रेची सुरुवात होणार आहे. यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्याच्या उद्देशाने भाजपने नवनिर्वाचित डॉ. कराड यांच्या नेतृत्वात ही जनआशीर्वाद यात्रा काढण्याची तयारी केली आहे. १६ रोजी परळी, गोपीनाथगड, गंगाखेड, पालम, लोहा, नांदेड असा यात्रेचा मार्ग असून, दुसऱ्या दिवशी (१७ जुलै) नांदेड, अर्धापूर, कळमनुरी ते हिंगोली मार्गावरून यात्रा जाईल. १८ ऑगस्ट रोजी हिंगोली, जिंतूर आणि परभणी या मतदारसंघांतून १९ रोजी परभणी, मानवत, पाथ्री, सेलू, परतूर, वाटूर ते जालन्यापर्यंत यात्रा येईल. २० रोजी जालना ते बदनापूर, शेकटा, करमाड, चिकलठाणा ते औरंगाबाद असा यात्रेचा मार्ग आहे. २१ रोजी औरंगाबाद मार्गे दौलताबाद, खुलताबाद, वेरूळ, हतनूर ते कन्नडपर्यंत यात्रा जाईल, अशी माहिती प्राथमिकदृष्ट्या समोर आली आहे.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBeedबीडBhagwat Karadडॉ. भागवतPankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपा