‘जलयुक्त उदगीर’ला मिळाला जनाधार
By Admin | Updated: May 5, 2016 00:26 IST2016-05-05T00:19:04+5:302016-05-05T00:26:18+5:30
उदगीर : पालिकेच्या मालकीचे राज्यातील एकमेव बनशेळकी तलाव़़़ देवर्जन अन् भोपणी प्रकल्पातूनही उदगीरसाठी पाण्याच्या योजना़़़

‘जलयुक्त उदगीर’ला मिळाला जनाधार
उदगीर : पालिकेच्या मालकीचे राज्यातील एकमेव बनशेळकी तलाव़़़ देवर्जन अन् भोपणी प्रकल्पातूनही उदगीरसाठी पाण्याच्या योजना़़़ बोअर, हातपंपांची कमी नाही़़़ तरीही उदगीर यंदा न भूतो परिस्थितीतून जात आहे़ भीषण टंचाईने त्रासलेल्या उदगीरातीलच काही युवक दोन दिवसांपूर्वीच एकत्र आले अन् त्यांनी जलयुक्त उदगीरची संकल्पनेवर चर्चा केली़ त्यास मूर्त रुप देण्यासाठी बैैठकही घेतली़ त्यात अवघ्या तासाभरात तब्बल ९ लाख रुपये जमा झाले़
उदगीर शहर सध्या भीषण पाणीटंचाईस सामोरे जात आहे़ या शहरासाठी तत्कालीन मुख्यमंत्री स्व़यशवंतराव चव्हाण यांनी बनशेळकी येथे तलावास मंजुरी दिली अन् काम पूर्ण झाल्यानंतर ते पालिकेच्या मालकीचे करुनही टाकले़ या तलावातूनच बरीच वर्षे उदगीरकरांची तहान भागली़ परंतु, वाढता विस्तार, लोकसंख्या या घटकांमुळे पाणीपुरवठा अपुरा ठरु लागला़ त्यानंतर भोपणी प्रकल्पातून अन् देवर्जन प्रकल्पातून योजना घेण्यात आल्या़ मात्र, बनशेळकी व भोपणी प्रकल्प यंदा पूर्णपणे कोरडे पडले़ तर देवर्जन प्रकल्प कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे़ त्यामुळे उदगीरच्या टंचाईत भर पडली आहे़ नागरिक मिळेल तेथून पाणी मिळवीत आहेत़
दरम्यान, या टंचाईतून बोध घेत उदगीरमधील मनोज पुदाले, उत्तम मोरे, रवी मलगे या तीन युवकांनी एकत्र येवून ‘जलयुक्त उदगीर’चा संकल्प मांडला़ मित्रमंडळींकडे चर्चा केल्यानंतर त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला़ त्यांच्या मित्रमंडळींनी ५ लाख रुपये जमवले़ यानंतर या उपक्रमास सार्वजनिक रुप देण्यासाठी या युवकांनी उदगीरकरांना बैैठकीसाठी आवाहन केले़ त्यास चांगला प्रतिसाद मिळून अवघ्या तासाभरात एकूण ९ लाख रुपये जमा झाले़ आता मदतीचा ओघ वाढविण्यासाठी समित्या स्थापन करुन उदगीरातील दानशुरांकडे या कामास हातभार लावण्यासाठी विनंती करण्याचे काम सुरु झाले आहे़
जमा होणाऱ्या रकमेतून बनशेळकी तलावात गाळ उपश्याचे काम हाती घेतले जाणार आहे़ जवळपास १० फुट खोलीपर्यंत हा उपसा करण्याचा मानस बैैठकीत मान्यवरांनी व्यक्त केला़ त्यातून निघणारा गाळ शेतकऱ्यांना मोफत काढून देण्यात येणार आहे़ गाळ उपश्यासाठी लागणारी यंत्रणा व त्याचा खर्च ही समिती लोकसहभागातून जमलेल्या रकमेतून करणार आहे़ शेतकऱ्यांना केवळ वाहतुकीचा खर्च करावयाचा आहे़ या कामास गती देवून ते ५ मे पासून सुरु करण्यात येणार असल्याचे समितीने सांगितले़(वार्ताहर)
जलयुक्त उदगीरसाठी बोलाविण्यात आलेल्या बैैठकीत मनोज पुदाले १ लाख, प्रदीप कापसे ५० हजार, शंकर मुक्कावार ५० हजार तर गोपाळ मुक्कावार, विजयकुमार भीमाशंकर पारसेवार, नितीन भेंडे, उत्तम मोरे, रवी मलगे, मनोज धावडे, मनोज कोटलवार, रामदास जळकोटे, अभिजीत पुदाले यांनी मिळून ३ लाख रुपये असे एकूण ५ लाख रुपये देण्याची घोषणा केली़ त्यानंतर शिवाजी गुरुडे यांनी औद्योगिक वसाहतीकडून १ लाख तर उदगीर अर्बन बँकेकडून ५१ हजार, अशोकराव पाटील एकंबेकर यांनी किसान शिक्षण प्रसारक मंडळाकडून १ लाख, रमेश अंबरखाने यांनी ५१ हजार, विनोद टवाणी यांनी ५१ हजार, वकील संघाचे अध्यक्ष अॅड़दत्ता पाटील यांनी २१ हजार, डॉ़संजय कुलकर्णी यांनी २१ हजार, राम मोतीपवळे यांनी ४२००, सुरेश पाटील नेत्रगावकर यांनी दोन टिप्पर देण्याचे जाहीर केले़